शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शारीरिक उंची काय बघता, वैचारिक खुरगटलेपण त्यागण्याची खरी गरज!

By किरण अग्रवाल | Updated: September 30, 2021 11:55 IST

Need to give up ideological ugliness : कोरोनानंतरच्या जगण्याची परिमाणे बदलताना प्रस्तुत भूमिकेतून विचार केला जाणे व मानसिक उन्नयन घडून येणे गरजेचे ठरावे.

- किरण अग्रवाल

 आपल्याकडे उंची मोजण्याचे वा जोखण्याचे परिमाण म्हणून व्यक्तीच्या पद, पैसा, प्रतिष्ठेकडे पाहिले जाते; पण प्रत्यक्षात या सर्व गोष्टी असूनही वैचारिक खुरगटलेपण प्रत्ययास येणाऱ्या व्यक्ती कमी नसतात. काळ बदलला तशी काळाची आव्हानेही बदलली. मात्र, त्यातुलनेत मनुष्याची वैचारिक पातळी उंचावली का हा खरे तर प्रश्नच ठरावा. यातील उंचावणे हे फक्त आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक जाणीवेच्या दृष्टीनेही विचारात घेतले तर फारसे समाधानकारक चित्र समोर येत नाही. संवेदनांशी सांगड तुटली की, जाणिवा बोथट होतात, मग भौतिक अर्थाने कुणाचीही उंची कितीही मोठी भासत असली तरी ती थिटी पडल्याखेरीज राहत नाही. कोरोनानंतरच्या जगण्याची परिमाणे बदलताना प्रस्तुत भूमिकेतून विचार केला जाणे व मानसिक उन्नयन घडून येणे गरजेचे ठरावे.

 या अघळ पघळ प्रास्ताविकामागची पार्श्वभूमी अशी, की पीएलओएस वन या ओपन ॲक्सेस सायन्स जर्नलने अलीकडेच व्यक्तीच्या शारीरिक उंचीबाबत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष पुढे आले असून, समाजातील श्रीमंत आणि गरिबातील अंतर हे फक्त पैसा व साधनांच्याच बाबतीत नसून ते शारीरिक उंचीतही असल्याचे त्यात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत श्रीमंतांच्या सरासरी शारीरिक उंचीमध्ये विशेष फरक पडलेला नसला तरी गरिबांची सरासरी उंची मात्र कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. गरीब वर्गातील महिलांची सरासरी उंची ०.०५ सेंटिमीटरने वाढली तर श्रीमंत महिलांची सरासरी उंची ०.२३ सेंटिमीटरने वाढल्याचेही यातून समोर आले आहे. व्यक्ती व्यक्तींमधील भेदाभेदाची अगर विषमतेची दरी कोणकोणत्या पातळीवर किंवा संदर्भाने अनुभवास येते हेच यातून लक्षात यावे. अर्थात यातून घेता येणारा मुद्दा वेगळाच आहे, तो म्हणजे शारीरिक उंचीचे मोजमाप यानिमित्ताने पुढे आले असले तरी वैचारिक उंचीचे काय? ती कशी वाढणार किंवा त्यासाठी कसले प्रयत्न होणार?

 

कोरोनाच्या संकटाने जगण्याचे तंत्रच बदलून ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर तर शारीरिक उंचीपेक्षा संवेदना व जाणिवेच्या कक्षा उंचावणे अत्यंतिक गरजेचे बनले आहे. दुर्दैव असे की, शिक्षण व सुविधांनी माणूस पुढारला असला तरी पूर्वापार चालत आलेल्या समाजातील अनिष्ट अगर अविवेकी विचारांचे बुरसटलेपण संपलेले दिसत नाही. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा यासाठी गर्भातच अनेक नकोशींचा गळा घोटण्याचे पातक अजूनही सुरूच असल्याचे दिसते, तर नसत्या हव्यासापोटी मांत्रिका-तांत्रिकाकडून पोटच्या लेकराबाळांनाच बळी देण्याचे अघोरी प्रकारही अधूनमधून घडतच असतात. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची भांडी वेगळी ठेवून सदर भांडी त्या विद्यार्थ्यांनाच धुवावी लागत असल्याचा प्रकारही अलीकडेच समोर आला असून, या जातीय भेदभाव प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यासह अन्य दोघांना नोकरीतून काढून टाकण्याची वेळ आली. कुठे एकीकडे चंद्रावर घर करण्याची व मंगळावर पाणी शोधण्याची प्रगतता आणि दुसरीकडे ही असली वैचारिक दळभद्रीपणाची प्रकरणे?

 

म्हणूनच म्हणावेसे वाटते की, शारीरिक उंचीच्या अगर पद, पैसा व प्रतिष्ठेने मोजल्या जाणाऱ्या उंचीपेक्षा मानसिक, वैचारिक व बौद्धिक उंची वाढविण्याकडे लक्ष दिले जावयास हवे; पण ते तितकेसे होत नाही. शाळांमधील मूल्यशिक्षण परीक्षेपुरता उरले असून, घरातील आजी आजोबाही टीव्ही मालिकांमध्ये रमलेले दिसतात. मुला-नातवांना बोट धरून शिकवणार कोण? घरगड्यासही काका संबोधणारी व घरातील साफसफाई किंवा भांडे धुण्याच्या कामास असलेल्या भगिनीस काकू किंवा मावशी म्हणणारी मुलांची पिढी राहिली कुठे आता? एकुणात, शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातूनच सार्वत्रिक पातळीवरील विषमता दूर होऊ शकणारी असल्याने खरे तर याबाबतची उंची वाढविण्याकरिता गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.