शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत संपादकीय - नागरी प्रदूषणाची व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 04:54 IST

सुखसमाधानाच्या शोधात निघालेल्या मानवसमूहाच्या अपेक्षांचा तो अटळ परिपाक आहे. मात्र इतक्या प्रचंड प्रमाणात जेव्हा लोकवस्तीची दाटी अत्यंत मर्यादित भागात होते,

गेल्या दोन दशकांच्या कालखंडात देशातील शहरीकरणाची प्रक्रिया अत्यंत गतिमान झालेली दिसते. २०११च्या जनगणनेनुसार देशाची ३१ टक्के लोकसंख्या (म्हणजे साधारण: ३८ कोटी लोक) जेमतेम ३.३ टक्के भूभागात - म्हणजे शहरांत निवास करून राहतेय. शिवाय शहरांच्या कडेने वाढणाऱ्या उपनगरी भागांत आणखीन २० कोटी लोक राहतायत. हे उपनगरी भाग कालांतराने शहरांशीच संलग्न होतात हे लक्षात घेतल्यास २०३० सालापर्यंत देशाची अर्धी लोकसंख्या शहरात राहत असलेली दिसेल. शहरीकरण ही अपरिहार्य प्रक्रिया आहे,

सुखसमाधानाच्या शोधात निघालेल्या मानवसमूहाच्या अपेक्षांचा तो अटळ परिपाक आहे. मात्र इतक्या प्रचंड प्रमाणात जेव्हा लोकवस्तीची दाटी अत्यंत मर्यादित भागात होते, तेव्हा अनेक समस्या स्वाभाविकपणे डोके वर काढतात आणि बघता बघता अक्राळविक्राळ रूप धारण करतात. पर्यावरण रक्षणाच्या वाटेवरले पांथस्थ शहरीकरणाची गती प्रदूषणाच्या प्रसाराद्वारे मोजत असतात. या मापनातून असे दिसून आलेय की जगातील सर्वांत प्रदूषणकारी अशा पाचशे शहरांत तब्बल २५ भारतीय शहरांचा समावेश आहे. याचे मूळ आहे नियोजनशून्य अशा विकास प्रक्रियेत. पूरक संसाधनांच्या उपलब्धतेचा विचार न करता केवळ काँक्रिटीकरणाचा विस्तार म्हणजे शहरीकरण ही धारणा जमीन आणि पाण्यासह सर्वच नैसर्गिक संसाधनांवर अनावश्यक दबाव टाकते आहे. साहजिकच पर्यावरणावरल्या आघातांची व्याप्ती वाढत चालली आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेला दर्जात्मक अधिष्ठान लाभावे यासाठी प्रशासकीय स्तरावर झालेले प्रयत्नही धेडगुजरी स्वरूपाचे होते. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान किंवा अगदी स्मार्ट सिटी अभियान अशा बºयाच योजना या दोन दशकांच्या कालखंडात राबवण्यात आल्या. पण त्या काही शहरीकरणातून उद्भवणाºया समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर समाधान शोधू शकलेल्या नाहीत. शहर जसे विस्तारत जाते तसा जुन्या साधनसुविधांवरला ताण असह्य होऊन या साधनसुविधांची कार्यक्षमता ढेपाळू लागते. साहजिकच त्याचे परिणाम पर्यावरणावर होतात. निरंतर सजगता आणि मूल्यांकनातून या सुविधांची उपयुक्तता तपासायला हवी. त्यातून त्यांच्या नूतनीकरणाचा वा त्यांना बदलण्याचा पर्याय उपलब्ध होत असतो. पण अशा प्रकारच्या मूल्यांकनाची व्यवस्था राजधानी दिल्ली धरून देशातील कोणत्याही महानगरांत नाही. मग अन्य शहरांची तर बातच सोडा. शहरीकरणाची नाळ औद्योगिकीकरणाशी जोडण्याची आपली सवयही शहरांचा श्वास गुदमरण्यास कारणीभूत ठरली आहे. औद्योगिकीकरणाची अनियंत्रित प्रक्रिया जल-वायू आणि जमिनीच्या प्रदूषणाचे कारण ठरते. त्यात भर पडते ती बांधकाम क्षेत्राच्या अनियंत्रित विस्ताराची. नागरी वस्त्यांसाठीच्या नियोजन आराखड्यांतून या विस्ताराची दखल घेतल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात हे आराखडे समस्यांची व्याप्ती वाढवत असतात. प्रशासकीय व्यवस्थेशी फटकून कागदावरल्या स्वप्नरंजनात रममाण होणे हेच आपल्या देशातल्या नागरी नियोजनाच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे. आजमितीस देशातल्या ७९३३ शहरांपैकी जेमतेम १४८५ शहरांचे स्वत:चे मास्टर प्लॅन - मग ते कागदावरले का असेनात - आहेत. अर्थात या आरेखनात पर्यावरणाला गौण स्थान असते. पर्यावरणाचा कैवार घेणाºया घटकांना चार हात दूर ठेवूनच आरेखन करायचे यावर राजकीय व्यवस्थेत एकमत असल्यामुळे, असे होणे स्वाभाविक आहे. हरित क्षेत्र, जलव्यवस्थापन, हवेचे व्यवस्थापन अशा आयामांसह नियोजन करण्याचे भान आतापर्यंत तरी कोणत्याच शहराने दाखवलेले नाही. मानवी व्यवहारातून उद्भवणाºया समस्यांची तोंडदेखली दखल हे नियोजन घेत असले तरी त्याची फलनिष्पत्ती जवळजवळ शून्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेल्या एका अहवालानुसार भारत दरवर्षी ४४ लाख नवे झोपडपट्टीवासी निर्माण करतो. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले हे घटकही साधनसुविधांवरला ताण वाढवत प्रदूषण वाढण्यात अजाणता योगदान देत असतात. मात्र नियोजन प्रक्रियेत त्यांना काडीचेही स्थान नसल्याने समस्यांची व्याप्ती वाढतच राहते. कल्पनाशून्य नियोजनाच्या पाशांतून आपली शहरे मुक्त झाली तरच नागरी प्रदूषणाला आळा बसेल.पूरक संसाधनांच्या उपलब्धतेचा विचार न करता काँक्रिटीकरणाचा विस्तार म्हणजे शहरीकरण ही धारणा जमीन आणि पाण्यासह सर्वच नैसर्गिक संसाधनांवर अनावश्यक दबाव टाकते. साहजिकच पर्यावरणावरल्या आघातांची व्याप्ती वाढत चालली आहे.