शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Lok Sabha Election 2019 : वाचाळांची टोळी आणि लोकानुनय

By सुधीर महाजन | Updated: April 19, 2019 18:09 IST

राजकीय पक्षांचा थिल्लरपणा एवढा वाढला की त्यामुळे प्रगल्भता हा मुर्खपणा समजला जावा अशी वेळ आली.

- सुधीर महाजन

सार्वत्रिक निवडणुकीचे दोन टप्पे संपले तशी आरोप प्रत्यारोपांमध्ये एक विखार दिसायला लागला. जनकल्याणाच्या मुद्यांना बगल देत प्रत्येक पक्ष लोकभावनेला हात घालतांना दिसतो. लोकप्रियता मिळवण्यासाठी लोकानुनय करतांना सगळ्या पातळ्या सोडतांना दिसतो. भावनेला हात घालतांनाही कोणत्या स्तरापर्यंत जायचे याचा घरबंध राहिलेला नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही पाऊणशे वर्षाच्या उंबरठ्यावर आली आणि लवकरच शतकाकडे वाटचाल करू लागली. या काळात जो पोक्तपणा यायला पाहिजे होता तो आलेला नाही. राजकीय पक्षाच्या वागणुकीतून लोकशाही प्रगल्भ बनते; एक पोक्तपणा येतो; परंतु आपल्या देशातील राजकीय पक्षांचा थिल्लरपणा एवढा वाढला की त्यामुळे प्रगल्भता हा मुर्खपणा समजला जावा अशी वेळ आली. मत आणि सत्तेसाठी लोकानुनयाची पातळीही घसरली. 

गेल्या आठवड्यात योगी आदित्यनाथ, मायावती या दोन नेत्यांनी जी मुक्ताफळे उधळली ते पाहून सर्वोच्च न्यायालयालासुद्धा निवडणूक आयोगाला कानपिचक्या द्याव्या लागल्या. सर्वोच्च न्यायालयात झालेले कामकाज पाहिले तर आश्चर्यच वाटते. या दोन नेत्यांच्या भडक वक्तव्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली, याचे स्पष्टीकरण २४  तासांत द्यावे असा आदेश केला होता. हे करताना निवडणूक आयोगाची ‘अधिकार नसलेले आणि दंत विहित’ अशी संभावना निवडणूक आयोगानी केली. या दोघांनाही निवडणूक आयोगाने नोटीस दिली होती. मुदत उलटून गेल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. यावर न्यायालयाने आयोगाचे कान पिरगाळले. अशा प्रकरणात तुमचे कायदेशीर अधिकार काय आहेत? आता तुम्ही कोणती कारवाई करणार? असे प्रश्न न्यायालयाने विचारले होते. आता आम्ही नोटीस देऊ, तक्रार नोंदवू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळताच न्यायमूर्ती संतापले.

हा प्रसंग ताजा होता तोच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शहीद हेमंत करकरे यांच्यावरील विधानाने राजकीय वातावरण तापू लागले आहे, हे उदाहरणादाखल. कारण निवडणूक आचारसंहिता काय असते याची ओळख टी.एन. शेषन यांनी प्रथम देशाला करून दिली आणि जनतेलाही त्याचे महत्त्व पटले; परंतु कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागते आणि ते धाडस फारच कमी नोकरशहांमध्ये असते. कायदा कितीही कठोर असला तरी त्याचा वापर करणारी यंत्रणा बोटचेपी असेल तर कायदा निष्प्रभ ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशापर्यंत निवडणूक आयोगाचे हेच धोरण होते. 

लोकप्रिय घोषणा करण्यात राजकीय नेते नेहमीच आघाडीवर असतात. निवडणुकांमध्ये तर हे हमखास दिसते. ही काही आजची अवस्था नाही. १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी दिलेली ‘गरीबी हटाव’ची घोषणा किंवा १९७७ साली जयप्रकाश नारायण यांची ‘लोकशाही वाचवा’ची घोषणा या सगळ्या याच पठडीतल्या. इंदिरा गांधी यांनी ही घोषणा देताना गरिबांचे राजकारण करणाऱ्या डाव्यांना शह दिला तर पुढे विश्वनाथ प्रताप सिंगांनी बोफोर्स प्रकरणावर रान पेटवत भ्रष्ट्राचार मुक्तीचा नारा देत निवडणुक लढविली. २०१४ ची निवडणुकीतील ‘अच्छे दिन’ ही घोषणाही याच पठडीतील. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अपयशांवर बोट ठेवत ही घोषणा केली होती.

यावेळी अशा घोषणा नाहीत; पण राजकारण धर्म वादाकडे झुकत आहे. धर्माचा राजकारणासाठी उघडवापर ही काही नवी गोष्ट नाही. बाबरी पतनानंतर हे हुकुमाचे पान आहे. खरे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना सत्तेसाठी धर्मांचा वापर करता आला होता. फाळणीनंतर लोकभावनेला हात घालत त्यांनीही धर्माचे राजकारण केले असते तर ते आजच्या पेक्षा कितीतरी पटींनी यशस्वी ठरले असते; पण नेहरूंनी देशाला विज्ञानवादी, विकासाच्या दिशेने नेले, धर्मनिरपेक्ष राजकारणाचा पाया घातला. हे आजच्या परिस्थितीत विशेषत्वाने जाणवते. लोकभावनेला कधी हात घालायचा याचे भान ठेवावे लागते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद