शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

तर्कदुष्ट मांडणी

By admin | Updated: February 18, 2016 06:47 IST

शरद पवार तार्किक बोलतात अशी त्यांची ख्याती आहे. पण मुस्लीम तरुणांबाबत त्यांनी मांडलेले विचार केवळ अतार्किकच नव्हे तर तर्कदुष्ट म्हणावे असेच आहेत.

सामान्यत: शरद पवार तार्किक बोलतात अशी त्यांची ख्याती आहे. पण मुस्लीम तरुणांबाबत त्यांनी मांडलेले विचार केवळ अतार्किकच नव्हे तर तर्कदुष्ट म्हणावे असेच आहेत. शैक्षणिक सुविधांअभावी मुस्लीम तरुण इसीससारख्या दहशतवादी संघटनांकडे आकर्षित होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. शिक्षण आणि त्याच्या माध्यमातून प्राप्त होणारा रोजगार यापासून मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर वंचित राहिला किंवा ठेवला गेला हे तर सर्वझातच आहे. त्यात नवे असे काही नाही. परिणामी या वास्तवावर व त्यामागील कारणांवर सातत्याने ऊहापोहदेखील होतच असतो. पण केवळ मुस्लीम समाजच शिक्षणापासून वंचित राहिला आहे असे नव्हे. अनुसूचित जमाती आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती यादेखील तितक्याच वंचित आहेत. मुस्लीम समाजाच्या तुलनेत त्यांचे देशाच्या लोकसंख्येतील प्रमाण कमी असल्याने त्याचा फार गवगवा होत नाही इतकेच. पण त्या वर्गातील तरुण दहशतवादाकडे झुकल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. मुळात संपूर्ण मुस्लीम समाजातील युवक दहशतवादाकडे झुकत असल्याचेही कोणाच्या निदर्शनास आलेले नाही. त्याबाबत सामाजिक माध्यमेच अधिक उथळपणा करीत असल्याचे मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. त्यातून देशातील काही गुप्तहेर संघटनांनी इसीसच्या जाळ्यात अडकलेल्या किंवा अडकू पाहाणाऱ्या ज्या मोजक्या मुस्लीम युवकाना ताब्यात घेतले ते केवळ शिक्षितच नव्हे तर उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेतलेले असल्याचे दिसून आले. म्हणजे येथेच पवारांचा तर्क ढासळून पडतो. परिणामी पवारांच्या तर्कानुसार शिक्षणाच्या अभावी का होईना मुस्लीम युवक दहशतवादी होत आहेत असे विधान करण्यात त्या समाजातील युवकांवर एक गर्भित आरोप आहे. त्यामुळे शिक्षणाचा अभाव आणि दहशतवादाचे आकर्षण यात संबंध नाही. तरीही पवार म्हणतात त्याप्रमाणे त्या समाजात शिक्षणाचा अभाव आहे हे खरेच. पण तो केन्द्र आणि राज्य सरकारांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे वा त्याकडे डोळेझाक केली आहे असा जो आरोप, आक्षेप वा निष्कर्ष पवार नोंदवितात त्यातील सरकार म्हणजे नेमके कोण? खुद्द शरद पवार दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत व केन्द्रातही ते मंत्री होतेच. मग त्यांनी याबाबत काय केले? की काही केले नाही म्हणून ही पश्चातबुद्धी?