शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

लोकल आणि ग्लोबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:05 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी काल नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या आरोग्य धोरणावर प्रचंड टीका केली.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी काल नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या आरोग्य धोरणावर प्रचंड टीका केली. स्टेंटच्या किमती कमी करून अ‍ॅन्जिओप्लास्टी स्वस्त झाल्याचे मिरवणारे राजकीय नेते स्वत: मात्र विदेशात जाऊन कसे उपचार करतात इथपासून तर अगदी देशातील आरोग्य सेवेचा डोलारा खासगी डॉक्टरांमुळेच कसा टिकून आहे, इथपर्यंत अनेक दावे त्यात होते. तसेच हे सरकार पदच्युत करण्याची क्षमता खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये आहे, असा इशाराही होता. एकूणच त्यांचे हे वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा काही कमी नव्हते. परंतु डॉक्टरांची संघटना चालविणाºया संघटनेच्या राष्टÑीय अध्यक्षावर ही वेळ का आली, यावर विचार होणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत नव्या विधेयकासह पंतप्रधानांच्या वक्तव्यातून डॉक्टरांना लक्ष्य केले जात असल्याने समोर आलेला हा एक संताप आहे. परंतु हा संताप शासन आणि खासगी डॉक्टर संघटनांमधील तणाव वाढविणाराही आहे. अर्थात त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे गंभीर आहेत. राष्टÑीय वैद्यकीय परिषदेची बरखास्ती, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकातील (एनएमसी) तरतुदी आणि सर्वाधिक महत्त्वाचा असा क्रॉसपॅथीचा त्यांनी केलेला ऊहापोह निश्चितच विचार करण्यासारखा आहे. होमिओपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा दिल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, ही शंका काही चुकीची नाही. आरोग्य धोरण ठरविताना शासन आयएमएला विश्वासात घेत नाही, अशी तक्रार आहे. पण हे सर्व मुद्दे शासनाशी चर्चा करुनही सोडविता घेऊ शकतील. यासाठी अशी टोकाची भूमिकाही असू नये. कारण शेवटी शासकीय आरोग्य सेवा असो वा खासगी त्यांचे मुख्य लक्ष्य हे या देशातील गरिबातील गरीब व्यक्तीला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच असावे किंबहुना हेच आहे. पण दुर्दैवाने आज आपल्या देशातील आरोग्य क्षेत्र पांगळे होत चालले आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील दरी प्रचंड वाढली असून अविश्वासाचे वातावरण आहे. अगदी गावखेड्यांपासून तर महानगरांपर्यंत हीच परिस्थिती आहे. मृतपाय शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांचे अवाढव्य शुल्क यात सामान्य माणूस पार पिचला जातोय. हा बदल का आणि कसा झाला, यामागील कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे. तसेच सरकारने खासगी आरोग्यसेवेबाबत काही कठोर निर्णय घेतले असतील तर त्याला नेमकी कुठली परिस्थिती कारणीभूत ठरली याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकल आणि ग्लोबलच्या या वादात गरीब रुग्णाचे मरण होऊ नये,एवढेच!