शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोेंडवाड्याचे जगणे

By admin | Updated: October 24, 2016 04:08 IST

विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या गरीब आदिवासींच्या नव्या पिढ्यांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून राज्यात शासनातर्फे ठिकठिकाणी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या.

विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या गरीब आदिवासींच्या नव्या पिढ्यांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून राज्यात शासनातर्फे ठिकठिकाणी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या. आदिवासींची मुले या शाळांमधून शिकतील. त्यांची प्रगती होईल. एक समृद्ध जीवन त्यांना जगता येईल, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आज याच आश्रमशाळा तेथे शिकणाऱ्या निष्पाप बालकांसाठी कोंडवाडे झाल्या आहेत. येथील दुरवस्था बघितल्यावर या शाळा शिक्षणाचे द्वार आहे की मृत्यूचे, असा प्रश्न कुणालाही पडावा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर सोडाच त्यांच्या मूलभूत गरजासुद्धा येथे पूर्ण केल्या जात नाहीत. बहुतांश आश्रमशाळांमधील कारभार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल. माध्यमांनी वेळोवेळी तेथील दैनावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण शासनातील जबाबदार यंत्रणेला याची दखल घेण्याची गरज वाटली नाही. शेवटी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाच शासनाचे कान टोचावे लागले. गेल्या दहा वर्षात राज्यातील आश्रमशाळांमध्ये झालेले ७४० आदिवासी बालकांचे मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहेत. येथे शिकणाऱ्या मुलांची प्रगती, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी या आश्रमशाळांवर असताना केवळ शासनाच्या अनास्थेमुळे त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे, अशा कडक शब्दात आयोगाने शासनाला फटकारले असून चार आठवड्यात अहवाल मागितला आहे. एवढे घडल्यावरही निगरगट्ट लालफीतशाही हा प्रश्न गांभीर्याने घेणार की नाही याबद्दल साशंकता आहे. राज्यातील जवळपास ५२२ आश्रमशाळांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु येथील विद्यार्थ्यांची हेळसांड, अनारोग्य आणि त्यामुळे होणारे मृत्यू बघता हा पैसा नेमका जातो कुठे तेच कळत नाही. एखाद्या तुरुंगाप्रमाणे वातावरण असलेल्या या शाळांमध्ये असाह्य, गरीब आदिवासी मुलांच्या जीवनाचा खेळ केला जात असल्याचे अनेक घटनांमधून अधोरेखित झाले आहे. कुजून अळ्या झालेल्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने गोंदियाच्या एका आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यवतमाळच्या पाटणबोरीत तर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने मुलांना चक्क आपल्या शेतातील कामास जुंपले होते. आश्रमशाळांमधील ही परिस्थिती सुधारायची असल्यास त्या त्या भागांमध्ये नागरिकांचे गट स्थापन करावेत. हे दबाव गट आश्रमशाळांमधील कारभारावर देखरेख ठेवतील. स्थानिक आणि प्रामाणिक स्वयंसेवी संघटनांचीही या कार्यात मदत घेता येईल. शेवटी हा तेथे शिकणाऱ्या आदिवासी मुलांचा किंबहुना संपूर्ण आदिवासी बांधवांच्या विकासाचा प्रश्न आहे.