शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

कोेंडवाड्याचे जगणे

By admin | Updated: October 24, 2016 04:08 IST

विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या गरीब आदिवासींच्या नव्या पिढ्यांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून राज्यात शासनातर्फे ठिकठिकाणी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या.

विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेल्या गरीब आदिवासींच्या नव्या पिढ्यांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून राज्यात शासनातर्फे ठिकठिकाणी आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या. आदिवासींची मुले या शाळांमधून शिकतील. त्यांची प्रगती होईल. एक समृद्ध जीवन त्यांना जगता येईल, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आज याच आश्रमशाळा तेथे शिकणाऱ्या निष्पाप बालकांसाठी कोंडवाडे झाल्या आहेत. येथील दुरवस्था बघितल्यावर या शाळा शिक्षणाचे द्वार आहे की मृत्यूचे, असा प्रश्न कुणालाही पडावा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर सोडाच त्यांच्या मूलभूत गरजासुद्धा येथे पूर्ण केल्या जात नाहीत. बहुतांश आश्रमशाळांमधील कारभार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल. माध्यमांनी वेळोवेळी तेथील दैनावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण शासनातील जबाबदार यंत्रणेला याची दखल घेण्याची गरज वाटली नाही. शेवटी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाच शासनाचे कान टोचावे लागले. गेल्या दहा वर्षात राज्यातील आश्रमशाळांमध्ये झालेले ७४० आदिवासी बालकांचे मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहेत. येथे शिकणाऱ्या मुलांची प्रगती, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची जबाबदारी सर्वस्वी या आश्रमशाळांवर असताना केवळ शासनाच्या अनास्थेमुळे त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे, अशा कडक शब्दात आयोगाने शासनाला फटकारले असून चार आठवड्यात अहवाल मागितला आहे. एवढे घडल्यावरही निगरगट्ट लालफीतशाही हा प्रश्न गांभीर्याने घेणार की नाही याबद्दल साशंकता आहे. राज्यातील जवळपास ५२२ आश्रमशाळांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु येथील विद्यार्थ्यांची हेळसांड, अनारोग्य आणि त्यामुळे होणारे मृत्यू बघता हा पैसा नेमका जातो कुठे तेच कळत नाही. एखाद्या तुरुंगाप्रमाणे वातावरण असलेल्या या शाळांमध्ये असाह्य, गरीब आदिवासी मुलांच्या जीवनाचा खेळ केला जात असल्याचे अनेक घटनांमधून अधोरेखित झाले आहे. कुजून अळ्या झालेल्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने गोंदियाच्या एका आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यवतमाळच्या पाटणबोरीत तर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने मुलांना चक्क आपल्या शेतातील कामास जुंपले होते. आश्रमशाळांमधील ही परिस्थिती सुधारायची असल्यास त्या त्या भागांमध्ये नागरिकांचे गट स्थापन करावेत. हे दबाव गट आश्रमशाळांमधील कारभारावर देखरेख ठेवतील. स्थानिक आणि प्रामाणिक स्वयंसेवी संघटनांचीही या कार्यात मदत घेता येईल. शेवटी हा तेथे शिकणाऱ्या आदिवासी मुलांचा किंबहुना संपूर्ण आदिवासी बांधवांच्या विकासाचा प्रश्न आहे.