शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

साहित्य अनुभूती-अभिव्यक्ती

By admin | Updated: October 13, 2016 01:23 IST

प्रत्येकाच्या वेगळ्या शैलीतून समाजचित्र उभे राहात आहे. लेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा उमटलेला ठसा म्हणजे शैली होय

प्रत्येकाच्या वेगळ्या शैलीतून समाजचित्र उभे राहात आहे. लेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा उमटलेला ठसा म्हणजे शैली होय. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या गोष्टींनी आपला साहित्यवृक्ष सर्वांगाने फुलायला हवा. बहरायला हवा. आपली मूळं दूरवर पसरवून जीवनरस मिळवणाऱ्या वृक्षासारखी साहित्यिकांची जीवनदृष्टी असायला हवी. अनुभवाची कलात्मक मांडणी करताना मात्र सत्याच्या विश्वापासून दूर जायला नको. कलेचे विश्व वेगळे आणि सत्याचे विश्व वेगळे असे होत नाही. कलेच्या विश्वाला सत्याच्या विश्वात नेऊन सत्यालाच कलात्मक रितीने मांडणे हीच खरी कल्पकता होय. वाङ्मयीन सत्य हेच अनुभवसत्य असायला हवे. तटस्थ चिंतन, सौंदर्यात्मक कल्पकता, आकृतीनिर्मिती, नवनिर्मिती, प्रतिभा आणि सर्जन हे वाङ्मय निर्मितीचे विविध पैलू आहेत. हे पैलू शब्दाशब्दातून व्यक्त व्हायला हवेत. प्रसिद्ध विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले होते की, ‘अभिजित साहित्यिकांच्या एकमुखी आधारावर कलात्मक जीवनभाष्य हेच अमर साहित्याचे लक्षण होय. जीवनावर भाष्य करण्यापूर्वी जीवनाचे यथार्थ आकलन झाले पाहिजे. त्यासाठी जीवनानुभवाच्या कक्षा विस्तीर्ण व्हायला हव्यात’. जीवन आणि साहित्य याचा निकटचा संबंध आहे, असे साने गुरुजी वारंवार सांगत. ते म्हणत, ‘जीवनातल्या अप्रगट शक्ती वाङ्मयात निर्माण होतात आणि वाङ्मयात वावरणाऱ्या वृत्ती जीवनात उमटतात. म्हणूनच आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके, बोलपट हे सारे जीवनाच्या ध्येयाला प्रत्यक्षात उमटविण्यासाठी आहेत.आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य लाभले आहे. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुक्तता किती घ्यायची हे आविष्कारभान लेखकाने ठेवायला हवे. इथे अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, परंपरा आहेत. आपल्या अविष्कार मुक्ततेने कुणाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जाऊ नयेत. वास्तववादाच्या नावाने पुन्हा नवे वाद निर्माण होऊ नयेत. कारण कोणत्याही वादाने वाद निर्माण करणारी मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी समाजऐक्य भंग करीत आहेत. हे वास्तव आहे. समाजात वावरताना आपल्या शब्दाने, लेखणीने कुणी तोडला जाणार नाही याची फार मोठी जबाबदारी साहित्यिकांवर अप्रत्यक्षात येत असते. खरे तर आपली लेखणी तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आहे, याचे भान राखणे हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ असू शकेल. -डॉ. रामचंद्र देखणे