शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

‘मेक इन इंडिया’चा सिंह - हिंमत आहे, पण ताकद कमी पडते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 10:40 IST

कच्च्या मालापासून ते वीज, वाहतूक व अन्य सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाल्या तर आणि तरच देशातील उत्पादन क्षेत्र चांगले काम करू शकेल! 

 

प्रा. नंदकुमार काकिर्डे, अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार -

केंद्र सरकारने  २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ धोरणाची घोषणा केली. दहा वर्षे पूर्ण केलेल्या या धोरणाचा आढावा घेतला तर काय दिसते? ‘मेक इन इंडिया’ ही घोषणा करताना सरकारने दोन महत्त्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवलेली होती- जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा किमान २५ टक्क्यांवर न्यावा अशी  अपेक्षा होती. उत्पादन क्षेत्रात  किमान दहा कोटी रोजगार निर्माण व्हावेत, असे दुसरे उद्दिष्ट होते.गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी पाहिली तर भारतातील उत्पादन क्षेत्राची वाढ मंद गतीने होऊन ती ५.५ टक्क्यांच्या घरात झालेली दिसते. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा  जेमतेम १५ ते १७ टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी तो १४ ते १५ टक्के होता. म्हणजे  त्यात अपेक्षित अशी २५ टक्क्यांपर्यंत  वाढ झाली नाही. दुसऱ्या बाजूला या क्षेत्रामध्ये रोजगार जवळजवळ वाढलेला नाही किंबहुना तो कमी झालेला दिसतो. गेल्या तीन दशकांमध्ये उत्पादन क्षेत्राचा जीडीपीमध्ये असलेला वाटा हा १५ ते १७ टक्क्यांच्याच घरात आहे.  तीन दशकांचा विचार करता या दशकामध्ये त्यात थोडीशी वाढ झालेली दिसते; पण त्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्पादन क्षेत्राच्या  वाढीचे मूल्यमापन करण्याच्या निकषात केलेला बदल. या पार्श्वभूमीवर देशातील उत्पादन क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी साधारणपणे १२.६ टक्क्यांच्या घरात होती. मात्र २०२२-२३ या वर्षात ही  टक्केवारी ११.४ टक्क्यांच्या घरात आहे. गेल्या दहा वर्षांत देशात एकूणच रोजगारनिर्मिती अपेक्षेपेक्षा कमी झालेली आहे व शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. गेल्या  तीन दशकांमध्ये देशातील एकूण उत्पादकतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या घसरलेले आहे.या विषयाला सकारात्मक बाजूही आहे. आज देशात जेवढे मोबाइल संच वापरले जात आहेत त्यापैकी जवळजवळ ९० ते ९५ टक्के संच भारतात तयार केलेले आहेत. आज आपण १.२० लाख कोटी रुपयांच्या मोबाइलची निर्यात करतो. संरक्षण क्षेत्राची निर्यात २१ हजार कोटींवर गेली आहे.  त्याचप्रमाणे तयार पोलादाच्या बाबतीत भारत आघाडीचा निर्यातदार झालेला असून, शाश्वत ऊर्जेच्या बाबतीतही आपण चौथे मोठे उत्पादक झालेलो आहोत. देशाच्या थेट परकीय गुंतवणुकीत जवळ जवळ ७० टक्के वाढ झालेली असून, गेल्या दहा वर्षांत आपण १६५.१ बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक आकर्षित केलेली आहे. केंद्र सरकारने १४ क्षेत्रांसाठी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना  जाहीर केल्याने यामध्ये १.४६ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक झाली, तर १२ ट्रिलियन रुपयांचे उत्पादन झाले. यामुळे ९ लाखांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. देशाच्या विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये तसेच औद्योगिक संरक्षणविषयक व वाहतूक विषयाच्या दृष्टिकोनातून विविध कॉरिडॉर निर्माण करण्यात आले. देशाच्या विविध भागात सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची निर्मितीही या योजनेखाली झालेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सौरशक्तीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करण्यात आल्या.परदेशी गुंतवणूक प्रामुख्याने सेवा क्षेत्रामध्ये आली, तुलनेने उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक कमी आली. देशभरात वाहतुकीचे कार्यक्षम जाळे पुरेसे सक्षम नसल्याचाही मोठा फटका देशातील उत्पादन क्षेत्राला बसलेला आहे. उद्योग क्षेत्राला खऱ्या अर्थाने चणचण जाणवत आहे ती कौशल्यपूर्ण कामगारांची. व्यवसाय करण्यास आवश्यक असणारी सुलभता अद्याप आपल्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रसामग्री व कच्च्या मालासाठी आपण परदेशावर अवलंबून असल्यामुळे आयातीचे प्रमाण  जास्त आहे. त्यात खंड पडला तर देशातील उत्पादन क्षेत्राला पूर्ण कार्यक्षमतेनुसार काम करता येत नाही.  विविध राज्यांमध्ये उत्पादनांसाठी आवश्यक असणारे क्लस्टर निर्माण करण्यात राज्य सरकारे अजूनही पुरेशी गंभीर नाहीत. त्यामुळे सेवा व पुरवठादारांना उत्पादकांना सेवा देण्यात बऱ्याच अडचणी येतात.  पायाभूत सुविधांची कमतरता, कच्चा माल-वीज आणि वित्त महाग असण्याचा प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होतो. कामगार कायद्यांमध्ये लवचीकता  नसल्याचा मोठा फटका उत्पादकांना बसतो. उत्पादन खर्च कमी ठेवून जागतिक दर्जाची उत्पादने बनवणे हे  मेक इन इंडियाचे ध्येय असले पाहिजे. अगदी कच्च्या मालापासून ते वीज, वाहतूक व अन्य सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या मिळाल्या तर आणि तरच देशातील उत्पादन क्षेत्र चांगले काम करू शकेल, अन्यथा ‘मेक इन इंडिया’चा सिंह ‘हिंमत आहे, पण ताकद कमी पडते’- अशा द्विधेत घोटाळत राहील! 

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडिया