शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिवाला धोका!

By admin | Updated: January 18, 2016 00:12 IST

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. राजधानीत हिवाळ्यात हवेमध्ये कर्करोगाला चालना देणाऱ्या अतिसूक्ष्म धातूकणांचे प्रमाण प्रचंड असल्याचे ग्रीनपीसने केलेल्या शास्त्रीय अभ्यासात आढळून आले आहे. हवेत उडत असलेल्या, २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या अतिसूक्ष्म कणांना ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ या लघु नावाने ओळखले जाते. या कणांमध्ये नेमके कोणते घटक असतात याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी दिल्लीतील विविध शाळांमधील वर्गखोल्यांमधील संगणकांच्या पडद्यांवरील नमुने घेण्यात आले. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार वर्गखोल्यांमधील हवा भारतीय सुरक्षा मानकांच्या तुलनेत पाचपट, तर जागतिक आरोग्य संघटनेद्वारा निर्धारित मानकांच्या तुलनेत तब्बल अकरापट घातक आढळली! नमुन्यांमध्ये आर्सेनिक, शिसे, निकेल, मँगनिज, क्रोमियम आणि कॅडमियम या जड धातूंचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचे या अभ्यासातून निष्पन्न झाले. ‘पीएम टू पॉइंट फाइव्ह’ कण फुफ्फुसांमध्ये शिरतात आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. एवढेच नव्हे तर हे कण धमन्यांच्या आतमध्ये प्रवेश करून तिथे तळ ठोकतात आणि त्यामुळे धमन्या ताठर होऊन ह्वदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. या कणांपैकी शिसे आणि मँगनिजच्या कणांमुळे मुलांचा विकास खुंटतो, तर आर्सेनिक, निकेल, क्रोमियम आणि कॅडमियमच्या कणांमुळे कर्करोगाला चालना मिळते. या अतिसूक्ष्म कणांमुळे एकट्या अमेरिकेत इसवी सन २००० पासून दरवर्षी किमान २२ हजार ते ५२ हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. भारतातील हा आकडा निश्चितच किती तरी मोठा असेल. हे कण हवेत मिसळतात तरी कसे, या प्रश्नाचे उत्तर आहे खनिज तेल व कोळशाचे ज्वलन! वीज निर्मितीसाठी भारत विकसित देशांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात कोळशाचे ज्वलन करतो आणि प्रचंड लोकसंख्या व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी भारतातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या खूप मोठी आहे, हे लक्षात घेतले म्हणजे भारतीयांचा जीव किती मोठ्या संकटात आहे, हे सहज ध्यानात यावे!