शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

संवेदनांनी उजळूया दीप माणुसकीचे !

By किरण अग्रवाल | Updated: October 23, 2022 12:45 IST

Let's light the lamp of humanity with senses : यंदाच्या दिवाळीत बाजारात उसळलेली गर्दी व ग्राहकांचा उत्साह सकारात्मकतेचा सांगावा देत आहे.

 - किरण अग्रवाल

धुवाधार पावसाने घडवलेले नुकसान व पशूंवरील लम्पीच्या आजाराने आलेले धास्तावलेपण दूर सारून बळीराजा हिमतीने उभा राहिला असून, कोणतीही संकटे आपल्याला नाउमेद करू शकत नाहीत, असा संदेश त्यातून मिळून गेला आहे. आता याच सोबतीने समाजातील वंचित घटकांसाठी संवेदनांनी माणुसकीचा दीप लावण्याची गरज आहे.

 

संकटे व अडीअडचणींमुळे निराशा व हतबलता येते हे खरेच, परंतु सकारात्मक इच्छाशक्ती असली की त्यावर मात करणेही सहज शक्य बनते. यंदाच्या दिवाळीत बाजारात उसळलेली गर्दी व ग्राहकांचा उत्साह याच सकारात्मकतेचा सांगावा देत आहे.

 

निसर्ग आता बेकाबू होत चालला आहे म्हणायचे. यंदा मुसळधार व संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुराने बळीराजाला रडवलं आणि शेतातील पीक सडवलं. आपल्याकडे वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक दीड लाखापेक्षा अधिक शेतकरी नुकसानग्रस्त असून, अकोल्यात एक लाख 20 हजारावर, तर बुलडाणा जिल्ह्यात 12 हजारांवर शेतकरी नुकसानग्रस्तांच्या यादीत आहेत. आपल्या भागात कापूस व सोयाबीनचे अधिक पीक होते. त्यालाच या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. निसर्गाची ही अवकृपा कमी म्हणून की काय, गेल्या वेळी कोरोनाने छळले होते, तर यंदा लम्पी आजाराने पशुधन धोक्यात आले आहे; पण या संकटातून सावरत बळीराजा मोठ्या हिमतीने उभा राहिलेला दिसत आहे. त्यांची ही हिंमतच उमेदीचा प्रकाश पेरणारी आहे.

 

बळीराजाच्या या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनातर्फे जमा करण्यात येत आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान लक्षात घेता येऊ घातलेल्या रब्बीतील बियाणांसाठी राज्याचा कृषी विभाग अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावणार आहे. त्यासाठी महाबीजची यंत्रणा तयारीस लागली आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे शासकीय योजनांच्या बाबतीत बेभरवशाची स्थिती व चर्चा लक्षात घेता आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रहावर आधारित करून त्यांची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या विविध मंत्रालयांमध्ये 75 हजार तरुणांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. राज्यातील भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांना 964 कोटींची कर्जमाफीही घोषित झाली आहे. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत दिवाळी किट देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे, हे किट कालपर्यंत उपलब्ध झाले नव्हती म्हणून ओरड होती; परंतु आता त्या किटचेही समारंभपूर्वक वितरण सुरू झाले आहे.

 

बाजारातही चैतन्याची स्थिती असून, साऱ्याच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी ओसंडून वाहताना दिसत आहे. बाजारातील ही गर्दी समाज जीवनातील आनंद, उत्साह अधोरेखित करणारीच म्हणता यावी. ऋण काढून सण साजरे करणारे आपण आहोत, पण तसे असले तरी त्यासाठीही सकारात्मक मानसिकता असावी लागते. नैसर्गिक व आरोग्यविषयक संकटांना तोंड देऊन पुढे जात असताना ही सकारात्मकताच आयुष्यात सुखासमाधानाचा प्रकाश उजळणार आहे, म्हणून तिचे वेगळे महत्त्व आहे.

 

अंधार वाटांवर उजेड पेरणाऱ्या या बाबी दिवाळी अधिक प्रकाशमान करणाऱ्या आहेत; पण याचसोबत व्यवस्थांखेरीज व्यक्ती म्हणूनही प्रत्येकाने क्षमतेनुसार आपापली भूमिका निभावणे अपेक्षित आहे. समाजातील एक वर्ग असाही आहे ज्याला दोन वेळेच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत आहे. आदिवासी वाड्यापाड्यांवरील अनेक लहानगी बालकं थंडीत उघडीनागडी कुडकुडत असतात. त्यांना पुरेसे दोन घास मिळण्याची मारामार असल्याने ते कुपोषित ठरत आहेत, दिवाळीची मिठाई त्यांच्या नशिबी कुठून येणार? तेव्हा अशा वर्गासाठी संवेदनांनी माणुसकीचे दीप आपण उजळूया. समाजातील विविध संस्था व व्यक्ती त्यासाठी पुढे येऊन कोणी रद्दी विकून तर कोणी घरातील वापरलेले कपडे जमा करून त्यांच्यापर्यंत दिवाळीचा आनंद साकारण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, अशा संस्था व व्यक्तीसोबत आपलाही मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा दीप लावूया...