शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना जागवूया, चला माणूस होऊया...

By किरण अग्रवाल | Updated: August 14, 2022 11:42 IST

Let's be sensible, let's be human $ निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते.

- किरण अग्रवाल 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया...

 काळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार? निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.

 राग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे... असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार? तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे?

 सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.

 या सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय? दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे...चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.