शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
6
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
7
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
8
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
9
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
10
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
11
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
12
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
13
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
14
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
15
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
16
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
17
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
18
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

संवेदना जागवूया, चला माणूस होऊया...

By किरण अग्रवाल | Updated: August 14, 2022 11:42 IST

Let's be sensible, let's be human $ निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते.

- किरण अग्रवाल 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया...

 काळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार? निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.

 राग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे... असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार? तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे?

 सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.

 या सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय? दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे...चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.