शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

त्यांना राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:41 IST

नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती.

नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती. मात्र आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपण तशी कारवाई करणार नाही अशी समंजस भूमिका घेतली आहे. त्याचवेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या लोकांना आपल्या राज्यात आश्रय देण्याची तयारी दर्शविली आहे. साऱ्या जगात आज निर्वासितांची समस्या मोठी आहे आणि त्यांची अतिशय हृदयद्रावक चित्रे आपण दूरचित्रवाहिन्यांवर पाहिलीही आहेत. ज्यांना मायभूमी नाही वा जे मायभूमीत परतू शकत नाहीत त्यांना आश्रय देणे याविषयी कायदे व नियम नसले तरी तशी संस्कृती जगात आहे. माणूस वा मनुष्य जात ही साºयांत सनातन बाब आहे. धर्मांचे आयुष्य तीन ते चार हजार वर्षांचे आणि देशांना तर जेमतेम पाचशे वर्षाहून मोठे आयुष्य नाही. जगातले दीडशेवर देश तर गेल्या शंभर वर्षात जन्माला आले. यातल्या कुणी कुणाला विरोध करायचा आणि कुणी कुणाला अडवायचे हा प्रश्न त्याचमुळे माणुसकी व संस्कृती यांच्याशी जुळला आहे. महत्त्व माणसांना, भूमीला की धर्मांना? दुर्दैवाने आजच्या काळाचे व त्यातील माणसांचे याविषयीचे निकष बदलले आहे. माणसाहून धर्म आणि त्याहूनही भूमी हे त्यांच्या पहिल्या क्रमांकाचे विषय झाले आहेत. भारतातील किती जणांना काश्मिरी जनतेविषयीचे प्रेम आहे आणि किती जणांना ती भूमीच तेवढी हवी आहे? रोहिंग्यांचा देश म्यानमार. ते मूळचे आदिवासी. कधीतरी इतिहासात ते मुसलमान झाले. पण म्यानमारच्या बौद्धांना ते चालत नाहीत. त्या देशाच्या सैनिकांनी जंगलातील श्वापदे मारावी तशी या रोहिंग्यांची शिकार केली. सिरिया, इराण, इराक आणि मध्य आशियातील मुसलमान निर्वासितांना निर्वासित कुणी केले? त्यांच्या धर्मातल्या कडव्या संघटनांनी. या संघटनांच्या लोकांना आपल्या धर्माच्या लोकांचे जीव घेणे, त्यांना निर्वासित करणे, त्यांच्यातील अल्पवयीन मुलींना भोगदासी बनविणे यात धार्मिक वा सामाजिकदृष्ट्या काही गैर वाटत नाही. भारतात नागरिकत्वाचे कायदे घटनानिर्मितीच्या काळातच झाले. त्यात जगभरातून येणाºया हिंदूंना नागरिकत्व देण्याची बाब आहे. कारण हिंदूंना दुसरा देश नाही. तरीही पाकिस्तानात हिंदू आहेत. त्यांची पूजास्थाने आहेत. बांगला देशात, म्यानमारपासून जपानपर्यंत आणि अमेरिका, कॅनडा, इंग्लंड व आॅस्ट्रेलियातही हिंदू भारतीय आहेत. खरे तर अमेरिका हा देशच निर्वासितांनी घडविला आहे. ही स्थिती आजच्या आताच्या राज्यकर्त्यांना बरेच काही सांगू व शिकवू शकणारी आहे. रोजी-रोटीसाठी आलेले, मोलमजुरी करणारे, चहाच्या मळ्यात काम करणारे अनेक नेपाळी व बांगला देशी लोक तेथे पिढ्यान्पिढ्या राहात आहे. अज्ञानामुळे नागरिकत्व वगैरे घेण्याच्या प्रयत्नात ते राहिले नाहीत. जी माणसे वर्षानुवर्षे व पिढ्यान्पिढ्या एका जागी राहतात, त्यांना वहिवाटीनेही काही हक्क प्राप्त होतात. त्यांना कायद्याचा बडगा दाखविणे व घटनेची कलमे त्यांच्यापुढे नाचविणे यात अर्थ नाही. त्यात कायदा असेल पण संस्कृती नाही आणि मनुष्यधर्म तर नाहीच नाही. या माणसांना सोबत घेऊन व सामावून घेणे हेच भारतीयत्वही आहे. ७० वर्षांपूर्वीचे कालबाह्य कायदे दाखवून त्या अभाग्यांना ‘तुम्ही देश सोडून जा’ असे म्हणण्यात दुष्टावाही आहे. तो भारताने करू नये. कारण त्यात सांस्कृतिक भारतीयत्व असणार नाही. ‘देश ही धर्मशाळा नाही’ हे सुभाषित ऐकायला चांगले आहे. पण घर आणि देश याखेरीज माणसांची आश्रयस्थाने दुसरी असतात तरी कोणती? तरीही माणसांना त्यांचीच वडिलोपार्जित भूमी नाकारत असेल तर त्या भूमीचा उपयोग तरी कोणता? शेवटी भूमी माणसांसाठी असते. तिला निर्दय होता येत नाही. तो माणसांचा दुर्गुण आहे. जी माणसे पिढ्यान्पिढ्या आसामचे वैभव वाढवीत राहिली त्यांना कायद्याचे कलम दाखवून निर्वासित व्हायला लावणे हा प्रकार किमान आपल्या देशाने करू नये.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी