शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

त्यांना राहू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:41 IST

नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती.

नागरिकांच्या राष्ट्रीय माहितीचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात आसामातील ४० लक्ष लोकांचा समावेश नाही. एकेकाळी अशा माणसांना तात्काळ देशाबाहेर काढले जावे अशी मागणी व तरतूद होती. मात्र आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपण तशी कारवाई करणार नाही अशी समंजस भूमिका घेतली आहे. त्याचवेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या लोकांना आपल्या राज्यात आश्रय देण्याची तयारी दर्शविली आहे. साऱ्या जगात आज निर्वासितांची समस्या मोठी आहे आणि त्यांची अतिशय हृदयद्रावक चित्रे आपण दूरचित्रवाहिन्यांवर पाहिलीही आहेत. ज्यांना मायभूमी नाही वा जे मायभूमीत परतू शकत नाहीत त्यांना आश्रय देणे याविषयी कायदे व नियम नसले तरी तशी संस्कृती जगात आहे. माणूस वा मनुष्य जात ही साºयांत सनातन बाब आहे. धर्मांचे आयुष्य तीन ते चार हजार वर्षांचे आणि देशांना तर जेमतेम पाचशे वर्षाहून मोठे आयुष्य नाही. जगातले दीडशेवर देश तर गेल्या शंभर वर्षात जन्माला आले. यातल्या कुणी कुणाला विरोध करायचा आणि कुणी कुणाला अडवायचे हा प्रश्न त्याचमुळे माणुसकी व संस्कृती यांच्याशी जुळला आहे. महत्त्व माणसांना, भूमीला की धर्मांना? दुर्दैवाने आजच्या काळाचे व त्यातील माणसांचे याविषयीचे निकष बदलले आहे. माणसाहून धर्म आणि त्याहूनही भूमी हे त्यांच्या पहिल्या क्रमांकाचे विषय झाले आहेत. भारतातील किती जणांना काश्मिरी जनतेविषयीचे प्रेम आहे आणि किती जणांना ती भूमीच तेवढी हवी आहे? रोहिंग्यांचा देश म्यानमार. ते मूळचे आदिवासी. कधीतरी इतिहासात ते मुसलमान झाले. पण म्यानमारच्या बौद्धांना ते चालत नाहीत. त्या देशाच्या सैनिकांनी जंगलातील श्वापदे मारावी तशी या रोहिंग्यांची शिकार केली. सिरिया, इराण, इराक आणि मध्य आशियातील मुसलमान निर्वासितांना निर्वासित कुणी केले? त्यांच्या धर्मातल्या कडव्या संघटनांनी. या संघटनांच्या लोकांना आपल्या धर्माच्या लोकांचे जीव घेणे, त्यांना निर्वासित करणे, त्यांच्यातील अल्पवयीन मुलींना भोगदासी बनविणे यात धार्मिक वा सामाजिकदृष्ट्या काही गैर वाटत नाही. भारतात नागरिकत्वाचे कायदे घटनानिर्मितीच्या काळातच झाले. त्यात जगभरातून येणाºया हिंदूंना नागरिकत्व देण्याची बाब आहे. कारण हिंदूंना दुसरा देश नाही. तरीही पाकिस्तानात हिंदू आहेत. त्यांची पूजास्थाने आहेत. बांगला देशात, म्यानमारपासून जपानपर्यंत आणि अमेरिका, कॅनडा, इंग्लंड व आॅस्ट्रेलियातही हिंदू भारतीय आहेत. खरे तर अमेरिका हा देशच निर्वासितांनी घडविला आहे. ही स्थिती आजच्या आताच्या राज्यकर्त्यांना बरेच काही सांगू व शिकवू शकणारी आहे. रोजी-रोटीसाठी आलेले, मोलमजुरी करणारे, चहाच्या मळ्यात काम करणारे अनेक नेपाळी व बांगला देशी लोक तेथे पिढ्यान्पिढ्या राहात आहे. अज्ञानामुळे नागरिकत्व वगैरे घेण्याच्या प्रयत्नात ते राहिले नाहीत. जी माणसे वर्षानुवर्षे व पिढ्यान्पिढ्या एका जागी राहतात, त्यांना वहिवाटीनेही काही हक्क प्राप्त होतात. त्यांना कायद्याचा बडगा दाखविणे व घटनेची कलमे त्यांच्यापुढे नाचविणे यात अर्थ नाही. त्यात कायदा असेल पण संस्कृती नाही आणि मनुष्यधर्म तर नाहीच नाही. या माणसांना सोबत घेऊन व सामावून घेणे हेच भारतीयत्वही आहे. ७० वर्षांपूर्वीचे कालबाह्य कायदे दाखवून त्या अभाग्यांना ‘तुम्ही देश सोडून जा’ असे म्हणण्यात दुष्टावाही आहे. तो भारताने करू नये. कारण त्यात सांस्कृतिक भारतीयत्व असणार नाही. ‘देश ही धर्मशाळा नाही’ हे सुभाषित ऐकायला चांगले आहे. पण घर आणि देश याखेरीज माणसांची आश्रयस्थाने दुसरी असतात तरी कोणती? तरीही माणसांना त्यांचीच वडिलोपार्जित भूमी नाकारत असेल तर त्या भूमीचा उपयोग तरी कोणता? शेवटी भूमी माणसांसाठी असते. तिला निर्दय होता येत नाही. तो माणसांचा दुर्गुण आहे. जी माणसे पिढ्यान्पिढ्या आसामचे वैभव वाढवीत राहिली त्यांना कायद्याचे कलम दाखवून निर्वासित व्हायला लावणे हा प्रकार किमान आपल्या देशाने करू नये.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी