शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

टांग्याचा घोडा आणि सत्तेचे मैदान

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून

सुधीर महाजन -

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून ती बदलण्याची धमक असणाराच. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यापैकी नेमक्या कोणत्या गटात बसतात हे काळच ठरवील. दहा-बारा वर्षांपासून बंद पडलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून तो पुन्हा चालू करण्याची घोषणा बंब यांनी केली. यासाठी त्यांनी नऊ कोटी रुपये गुंतविल्याचीही चर्चा आहे. आज बोलायचे झाले तर बंब हे व्यापारी आहेत. त्यामुळे त्यांना व्यवहारज्ञान नाही, असे म्हणता येणार नाही. गंगापूर साखर कारखाना चालू करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले एवढे मात्र नक्की.सत्तेसाठी साखर कारखाना ताब्यात असावा हे सूत्र त्यामागे आहे. बंद कारखाना हा भाकड जनावराप्रमाणे असतो. त्याचा उपयोग नसतोच. उलट त्याचा सांभाळ करण्यासाठी पदरमोड करावी लागते. बंब हे दुसऱ्यांदा आमदार झाले आणि मराठा लॉबीमध्ये फूट पाडून त्यांनी नवीन समीकरण तयार केले. ही सत्ता टिकविण्यासाठी अशी सत्ता केंद्रे ताब्यात असणे आवश्यक असते. म्हणूनच बंद पडलेल्या अशा कारखान्याची निवडणूक लढणे हे प्रारंभी हास्यास्पद वाटत होते. त्यामुळेच हा मराठवाड्यात चर्चेचा विषय होता. दुष्काळी मराठवाड्यात २३ साखर कारखाने असले तरी त्यातील नफ्यात किती, हा प्रश्नच आहे आणि गेल्या काही वर्षांत तर जगभरातील साखर कारखानदारीच अडचणीत आली आहे. गंगापूरचा कारखाना हा तसा खूप जुना, १९५८ सालचा रघुनाथसेठ धूत यांनी स्थापन केलेला; पण लगेचच तो ब्रॅडी अँड कंपनीने खरेदी केला. पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकार चळवळ सुरू झाली आणि त्या काळातील धडाडीचे नेते बाळासाहेब पवारांनी तो सहकारात आणला. १९६८-६९ साली ते अध्यक्ष असताना पहिला गळीत हंगाम झाला.गंगापूर कारखाना हा सर्वांत जुना. खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचे वर्चस्व येथे सर्वाधिक काळ राहिले. अगदी परवाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगावकर यांचे सत्ताधारी पॅनल होते; पण अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव, गटातटाचे राजकारण आणि भ्रष्टाचार यामुळे डोणगावकरांना सभासदांनी सपशेल नाकारले. कारखाना बंद पडण्याच्या कारणांपैकी राजकारण हा सर्वांत मोठा भाग होता. बंद कारखाना आपल्या ताब्यात असावा यासाठी सारेच इरेला पेटले होते. सदाशिव गायकेंनी न्यायालयीन डावपेचात अडकविले, तर शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. ते एवढे की, एका सर्वसाधारण सभेतून डोणगावकरांना पळ काढावा लागला होता.कारखान्याभोवती तालुक्याचे राजकारण एवढे केंद्रिभूत झाले होते की, डोणगावकरविरोधकांनी या कारखान्याला ऊसच मिळू दिला नाही आणि गाळपाअभावी तो बंद पडला. डोणगावकरांना तो चालवता आला नाही आणि लोकांचा विश्वासही मिळवता आला नाही. कारखाना आज ४१ कोटी रुपये कर्जाच्या गाळात रुतलेला आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची प्रत्येकी दोन कोटी रुपयांची देणी आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांनी कारखाना चालू करण्याचे आश्वासन दिले. सभासदांनी नव्या घोड्यावर पैसे लावतात, तसे बंब यांना कौल दिला. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी स्वत:कडे ठेवली. कारखान्याच्या मालकीची साडेतीनशे एकर जमीन आहे आणि तिच्यावर बंब यांचा डोळा आहे असा प्रचारही झाला. हा आरोप-प्रत्यारोपांचा उडालेला धुराळा आता पावसासोबत खाली बसला; पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. मराठवाड्यात पाणी नाही, जवळपास कायम दुष्काळी स्थिती आहे. भविष्याचा विचार करताना मराठवाड्यात उसाची लागवड करू नये, अशा मुद्यावर गंभीर चर्चा सुरू असताना बंद कारखान्याची निवडणूक राजकीय धुराळा उडविते, यातच सारे काही आले. राजकारणाचा एक डाव संपला आहे. आता बंब काय करतात एवढेच पाहायचे; कारण राजकारणाची लढाई जिंकण्यासाठी त्यांनी टांग्याच्या घोड्यावर मांड ठोकली आहे.