शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टांग्याचा घोडा आणि सत्तेचे मैदान

By admin | Updated: June 24, 2015 00:34 IST

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून

सुधीर महाजन -

टांग्याच्या घोड्यावर पैसे लावून त्याला रेसच्या मैदानात उतरविणे, हे साहस करणारा एक तर व्यवहारशून्य असू शकतो, नाही तर परिस्थितीशी दोन हात करून ती बदलण्याची धमक असणाराच. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यापैकी नेमक्या कोणत्या गटात बसतात हे काळच ठरवील. दहा-बारा वर्षांपासून बंद पडलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकून तो पुन्हा चालू करण्याची घोषणा बंब यांनी केली. यासाठी त्यांनी नऊ कोटी रुपये गुंतविल्याचीही चर्चा आहे. आज बोलायचे झाले तर बंब हे व्यापारी आहेत. त्यामुळे त्यांना व्यवहारज्ञान नाही, असे म्हणता येणार नाही. गंगापूर साखर कारखाना चालू करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले एवढे मात्र नक्की.सत्तेसाठी साखर कारखाना ताब्यात असावा हे सूत्र त्यामागे आहे. बंद कारखाना हा भाकड जनावराप्रमाणे असतो. त्याचा उपयोग नसतोच. उलट त्याचा सांभाळ करण्यासाठी पदरमोड करावी लागते. बंब हे दुसऱ्यांदा आमदार झाले आणि मराठा लॉबीमध्ये फूट पाडून त्यांनी नवीन समीकरण तयार केले. ही सत्ता टिकविण्यासाठी अशी सत्ता केंद्रे ताब्यात असणे आवश्यक असते. म्हणूनच बंद पडलेल्या अशा कारखान्याची निवडणूक लढणे हे प्रारंभी हास्यास्पद वाटत होते. त्यामुळेच हा मराठवाड्यात चर्चेचा विषय होता. दुष्काळी मराठवाड्यात २३ साखर कारखाने असले तरी त्यातील नफ्यात किती, हा प्रश्नच आहे आणि गेल्या काही वर्षांत तर जगभरातील साखर कारखानदारीच अडचणीत आली आहे. गंगापूरचा कारखाना हा तसा खूप जुना, १९५८ सालचा रघुनाथसेठ धूत यांनी स्थापन केलेला; पण लगेचच तो ब्रॅडी अँड कंपनीने खरेदी केला. पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकार चळवळ सुरू झाली आणि त्या काळातील धडाडीचे नेते बाळासाहेब पवारांनी तो सहकारात आणला. १९६८-६९ साली ते अध्यक्ष असताना पहिला गळीत हंगाम झाला.गंगापूर कारखाना हा सर्वांत जुना. खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचे वर्चस्व येथे सर्वाधिक काळ राहिले. अगदी परवाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगावकर यांचे सत्ताधारी पॅनल होते; पण अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव, गटातटाचे राजकारण आणि भ्रष्टाचार यामुळे डोणगावकरांना सभासदांनी सपशेल नाकारले. कारखाना बंद पडण्याच्या कारणांपैकी राजकारण हा सर्वांत मोठा भाग होता. बंद कारखाना आपल्या ताब्यात असावा यासाठी सारेच इरेला पेटले होते. सदाशिव गायकेंनी न्यायालयीन डावपेचात अडकविले, तर शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. ते एवढे की, एका सर्वसाधारण सभेतून डोणगावकरांना पळ काढावा लागला होता.कारखान्याभोवती तालुक्याचे राजकारण एवढे केंद्रिभूत झाले होते की, डोणगावकरविरोधकांनी या कारखान्याला ऊसच मिळू दिला नाही आणि गाळपाअभावी तो बंद पडला. डोणगावकरांना तो चालवता आला नाही आणि लोकांचा विश्वासही मिळवता आला नाही. कारखाना आज ४१ कोटी रुपये कर्जाच्या गाळात रुतलेला आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची प्रत्येकी दोन कोटी रुपयांची देणी आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांनी कारखाना चालू करण्याचे आश्वासन दिले. सभासदांनी नव्या घोड्यावर पैसे लावतात, तसे बंब यांना कौल दिला. कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. म्हणूनच अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी स्वत:कडे ठेवली. कारखान्याच्या मालकीची साडेतीनशे एकर जमीन आहे आणि तिच्यावर बंब यांचा डोळा आहे असा प्रचारही झाला. हा आरोप-प्रत्यारोपांचा उडालेला धुराळा आता पावसासोबत खाली बसला; पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. मराठवाड्यात पाणी नाही, जवळपास कायम दुष्काळी स्थिती आहे. भविष्याचा विचार करताना मराठवाड्यात उसाची लागवड करू नये, अशा मुद्यावर गंभीर चर्चा सुरू असताना बंद कारखान्याची निवडणूक राजकीय धुराळा उडविते, यातच सारे काही आले. राजकारणाचा एक डाव संपला आहे. आता बंब काय करतात एवढेच पाहायचे; कारण राजकारणाची लढाई जिंकण्यासाठी त्यांनी टांग्याच्या घोड्यावर मांड ठोकली आहे.