शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - शिकलेले शहाणे (?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:17 IST

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे.

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे. त्यांच्या घरात त्यांना त्यांच्या सर्व प्रथा पाळण्याचा अधिकार असला तरीही समाजाला आदर्श ठरू शकतील अशा व्यक्तींनी आपले सार्वजनिक व खासगी वर्तनही आदर्श ठेवणे अपेक्षित असते. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो. जसे अमिताभ बच्चनने एखाद्या मंदिरातील नंदीच्या कानात जाऊन सांगणे अयोग्य आहे तसेच खोलेबार्इंनी आपला पूजेचा स्वयंपाक सोवळ्यातून झाला पाहिजे असा आग्रह धरणे अयोग्यच आहे. या घटनेची एक बाजू ही तर दुसरी बाजू पोलिसांची. पाकीटमारी, साखळीचोरी अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून न घेता परस्पर मिटवण्याकडे पोलिसांचा कल असतो. तरीही मेधा खोले यांनी केलेली तक्रार त्यांना इतकी महत्त्वाची का वाटावी असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. त्यांच्यावर दबाव आणला गेला, खोलेबार्इंनी तो आणला असे सांगण्यात येत आहे. त्यात तथ्यांशही दिसतो आहे, मात्र तरीही पोलीस अशा दबावाला का बळी पडले हे शिल्लक उरतेच! त्यांनीच शहापणाने ‘हा तुमचा घरगुती मामला आहे, तो घरातच मिटवा, आम्ही त्यात पडणार नाही’ असे ठामपणे सांगितले असते तर इतके काही घडते ना! अधिक चितेंची बाब ही की तक्रार दाखल झाल्यानंतर समाजातून त्यावर झालेले चर्वितचर्वण! ते मूळ घटनेपेक्षाही चिंताजनक आहे. कोणी निर्मला यादव (या घटनेतील दुस-या महिला) यांच्या बाजूने तर कोणी खोले यांच्या. कोणी वैयक्तिक हक्क कसा महत्त्वाचा तर कोणी समाजाची मानहानी झाली म्हणून आक्रमक. काहींनी तर राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला. सोशल मीडियावरचा धुमाकूळ तर विचारूच नका. त्यातून समाजाला हानीकारक असे काही घडू शकते हेच त्यावरच्या लेखकरावांच्या गावी नाही. अनेकांनी तर थेट चारित्र्यहननाचाही प्रयत्न केला. तरी बरे आता असे प्रकार गुन्हा समजला जाणार आहेत. समाज शिकला म्हणजे शहाणा झाला असे नाही हेच यातून दिसून आले.