शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - शिकलेले शहाणे (?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:17 IST

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे.

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे. त्यांच्या घरात त्यांना त्यांच्या सर्व प्रथा पाळण्याचा अधिकार असला तरीही समाजाला आदर्श ठरू शकतील अशा व्यक्तींनी आपले सार्वजनिक व खासगी वर्तनही आदर्श ठेवणे अपेक्षित असते. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो. जसे अमिताभ बच्चनने एखाद्या मंदिरातील नंदीच्या कानात जाऊन सांगणे अयोग्य आहे तसेच खोलेबार्इंनी आपला पूजेचा स्वयंपाक सोवळ्यातून झाला पाहिजे असा आग्रह धरणे अयोग्यच आहे. या घटनेची एक बाजू ही तर दुसरी बाजू पोलिसांची. पाकीटमारी, साखळीचोरी अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून न घेता परस्पर मिटवण्याकडे पोलिसांचा कल असतो. तरीही मेधा खोले यांनी केलेली तक्रार त्यांना इतकी महत्त्वाची का वाटावी असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. त्यांच्यावर दबाव आणला गेला, खोलेबार्इंनी तो आणला असे सांगण्यात येत आहे. त्यात तथ्यांशही दिसतो आहे, मात्र तरीही पोलीस अशा दबावाला का बळी पडले हे शिल्लक उरतेच! त्यांनीच शहापणाने ‘हा तुमचा घरगुती मामला आहे, तो घरातच मिटवा, आम्ही त्यात पडणार नाही’ असे ठामपणे सांगितले असते तर इतके काही घडते ना! अधिक चितेंची बाब ही की तक्रार दाखल झाल्यानंतर समाजातून त्यावर झालेले चर्वितचर्वण! ते मूळ घटनेपेक्षाही चिंताजनक आहे. कोणी निर्मला यादव (या घटनेतील दुस-या महिला) यांच्या बाजूने तर कोणी खोले यांच्या. कोणी वैयक्तिक हक्क कसा महत्त्वाचा तर कोणी समाजाची मानहानी झाली म्हणून आक्रमक. काहींनी तर राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला. सोशल मीडियावरचा धुमाकूळ तर विचारूच नका. त्यातून समाजाला हानीकारक असे काही घडू शकते हेच त्यावरच्या लेखकरावांच्या गावी नाही. अनेकांनी तर थेट चारित्र्यहननाचाही प्रयत्न केला. तरी बरे आता असे प्रकार गुन्हा समजला जाणार आहेत. समाज शिकला म्हणजे शहाणा झाला असे नाही हेच यातून दिसून आले.