शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

भाष्य - शिकलेले शहाणे (?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:17 IST

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे.

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे. त्यांच्या घरात त्यांना त्यांच्या सर्व प्रथा पाळण्याचा अधिकार असला तरीही समाजाला आदर्श ठरू शकतील अशा व्यक्तींनी आपले सार्वजनिक व खासगी वर्तनही आदर्श ठेवणे अपेक्षित असते. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो. जसे अमिताभ बच्चनने एखाद्या मंदिरातील नंदीच्या कानात जाऊन सांगणे अयोग्य आहे तसेच खोलेबार्इंनी आपला पूजेचा स्वयंपाक सोवळ्यातून झाला पाहिजे असा आग्रह धरणे अयोग्यच आहे. या घटनेची एक बाजू ही तर दुसरी बाजू पोलिसांची. पाकीटमारी, साखळीचोरी अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून न घेता परस्पर मिटवण्याकडे पोलिसांचा कल असतो. तरीही मेधा खोले यांनी केलेली तक्रार त्यांना इतकी महत्त्वाची का वाटावी असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. त्यांच्यावर दबाव आणला गेला, खोलेबार्इंनी तो आणला असे सांगण्यात येत आहे. त्यात तथ्यांशही दिसतो आहे, मात्र तरीही पोलीस अशा दबावाला का बळी पडले हे शिल्लक उरतेच! त्यांनीच शहापणाने ‘हा तुमचा घरगुती मामला आहे, तो घरातच मिटवा, आम्ही त्यात पडणार नाही’ असे ठामपणे सांगितले असते तर इतके काही घडते ना! अधिक चितेंची बाब ही की तक्रार दाखल झाल्यानंतर समाजातून त्यावर झालेले चर्वितचर्वण! ते मूळ घटनेपेक्षाही चिंताजनक आहे. कोणी निर्मला यादव (या घटनेतील दुस-या महिला) यांच्या बाजूने तर कोणी खोले यांच्या. कोणी वैयक्तिक हक्क कसा महत्त्वाचा तर कोणी समाजाची मानहानी झाली म्हणून आक्रमक. काहींनी तर राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला. सोशल मीडियावरचा धुमाकूळ तर विचारूच नका. त्यातून समाजाला हानीकारक असे काही घडू शकते हेच त्यावरच्या लेखकरावांच्या गावी नाही. अनेकांनी तर थेट चारित्र्यहननाचाही प्रयत्न केला. तरी बरे आता असे प्रकार गुन्हा समजला जाणार आहेत. समाज शिकला म्हणजे शहाणा झाला असे नाही हेच यातून दिसून आले.