शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘एलबीटी’चे त्रांगडे

By admin | Updated: August 7, 2015 21:41 IST

राज्याच्या सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करून, एक प्रमुख आश्वासन अंशत: पूर्ण केले खरे; पण तिकडे केंद्रात वस्तू व सेवा कर

राज्याच्या सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करून, एक प्रमुख आश्वासन अंशत: पूर्ण केले खरे; पण तिकडे केंद्रात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात आणण्याचे आश्वासन देत सत्तारुढ झालेल्या त्याच पक्षाला, जीएसटीचे अडून बसलेले घोडे पुढे दामटणे शक्य होत नसल्याने, एलबीटीचे त्रांगडे राज्य सरकारच्या गळ्यातील फास होऊन बसण्याची शक्यता दिसू लागली आहे. एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण करताना, वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांना त्यामधून वगळण्यात आल्याने, व्यापारी-उद्योजक वर्ग पूर्णत: खूश झालेला नाही. दुसरीकडे एलबीटीमधून होणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत, सरकारकडून जाहीर झालेली अनुदानाची रक्कम कमी असल्यामुळे महापालिकाही नाराज आहेत. एलबीटीची जागा घेण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने उभी न केल्यामुळे, महापालिकांना अनुदान देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागणार आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने, ही जबाबदारी सरकारला चांगलीच जड जाणार आहे. महापालिकांसाठी जाहीर करण्यात आलेली अनुदानाची रक्कम, काही अपवाद वगळता, त्या-त्या महापालिकेच्या एलबीटी उत्पन्नाच्या तुलनेत बरीच कमी आहे. एलबीटी रद्द केल्याने होणारे महापालिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी मुद्रांक शुल्कापोटी मिळणारी रक्कम पालिकांकडे वळविण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. त्याशिवाय मूल्यवर्धित करावर अधिभार आकारणे, उलाढाल कर नावाने नवाच कर सुरू करणे, इत्यादी पर्यायही सरकारसमोर होते. पण तिजोरी रिती असलेल्या सरकारसाठी हा पर्याय कायमस्वरुपी असू शकत नाही. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना एलबीटी रद्द करणे, म्हणजे गलथान प्रशासन आणि भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध झालेल्या महापालिकांचा धोंडा स्वत:हून गळ्यात अडकवून घेणे ठरणार आहे. एलबीटी रद्द करताना, राज्य सरकारची आशा जीएसटीवर केंद्रित झाली होती. वस्तू व सेवांवरील नाना प्रकारचे अप्रत्यक्ष कर संपवून, त्याऐवजी एकाच कराची एकाच ठिकाणी वसुली करणे आणि केंद्र व प्रत्येक राज्य सरकारला पूर्वनिर्धारित प्रमाणात हिस्सा देणे, ही जीएसटीमागील संकल्पना! त्यामुळे जीएसटी लागू होताना एलबीटी आपोआपच रद्द झाला असता आणि जीएसटीच्या हिश्शामध्ये राज्य सरकारला एलबीटीची रक्कम परत मिळाली असती, जी पुढे महापालिकांना वाटता आली असती. दुर्दैवाने संसदेतील रोधामुळे सध्या तरी जीएसटीचेच देऊळ पाण्यात दिसत आहे. त्यामुळे किती दिवस राज्याला एलबीटीचे ओझे खांद्यावर वागवावे लागेल हे सांगता येत नाही.