शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पुन्हा संविधान बदलाची भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:49 IST

सा-या जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असा एका तोंडाने आपल्या घटनेचा गौरव करायचा आणि वेळ येताच दुस-या तोंडाने हे संविधान बदलू असे म्हणायचे, हा दुटप्पीपणाच नव्हे तर जनतेची धडधडीत फसवणूक करणारा प्रकार आहे.

सा-या जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असा एका तोंडाने आपल्या घटनेचा गौरव करायचा आणि वेळ येताच दुस-या तोंडाने हे संविधान बदलू असे म्हणायचे, हा दुटप्पीपणाच नव्हे तर जनतेची धडधडीत फसवणूक करणारा प्रकार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी ही फसवणूक आता नव्याने केली आहे. केंद्रीय मंत्री हा केंद्र सरकारचा प्रवक्ताही असतो. त्यामुळे हेगडे यांचे मत हे केंद्र सरकारचे मत म्हणूनच विचारात घ्यावे लागते. हेगडे यांचा सारा कटाक्ष घटनेतील धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आहे. देशात भाजपचे सरकार आहे आणि ते पूर्णपणे संघाच्या नियंत्रणात आहे. संघाचा धर्मनिरपेक्ष राजकारणाला आरंभापासून विरोध राहिला आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते तसेच राहावे व त्यात एकाच धर्माचे वर्चस्व आणि इतरांचे स्थान दुय्यम असावे ही त्यांची १९२५ पासूनची भूमिका आहे. याउलट देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव आणि नागरी समता या भूमिकांचा पाठपुरावा केला आहे. इंग्रजांविरुद्ध लढत असताना देशातील हिंदू, मुसलमान, शीख, पारशी, बौद्ध हे सारेच समाज ऐक्य भावनेने उभे राहिले पाहिजेत ही त्या लढ्याची भूमिका होती. त्याचसाठी काँग्रेस व स्वातंत्र्यलढा यांनी धर्मनिरपेक्षता हे मूल्य धोरण म्हणून स्वीकारले होते. पाकिस्तान झाल्यानंतरही भारताने धर्मनिरपेक्षता जोपासली पाहिजे असा अभिप्राय सरदार वल्लभभाई पटेलांनी कोलकात्याचे एक उद्योगपती बी.एम. बिर्ला यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रात कळविला आहे. ‘त्याखेरीज काश्मीर, पंजाब व केरळातील जनतेला भारत आपला कसा वाटेल? अरुणाचल, मेघालय, मिझोराम व नागालॅन्ड यातील जनतेचे मग काय होईल?’ असा प्रश्न त्यात त्यांनी विचारला. नेहरूंना तर सेक्युलॅरिझम हे लोकशाहीसाठी आवश्यक असेच मूल्य वाटत आले. गांधीजी जेव्हा ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असे म्हणत तेव्हाही त्यांच्या प्रार्थनेचा अर्थ तोच होता. मात्र त्यावेळी संघ नगण्य होता. शिवाय तो स्वातंत्र्याच्या लढ्यापासून दूरही होता. त्याला त्याच्या भूमिका त्याचमुळे त्या लढ्यापासून वेगळ्या राखणे जमणारे होते. आता स्थिती बदलली आहे व त्याला मानणाºया पक्षाचे सरकार देशात सत्तेवर आले आहे. आजवर दाबून ठेवलेली हिंदुत्वाची ‘उबळ’ त्याला आता उघड करता येणारी आहे. तसा इरादा त्याने वेळोवेळी बोलूनही दाखविला आहे. मात्र धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आता देशात रुजले आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी या सर्वच वर्गांना ते हवे आहे. हिंदूंमधील दलितांचा त्याविषयीचा आग्रह मोठा आहे. शिवाय संविधानावर आपली निष्ठा असल्याची बाब देशाने एवढी वर्षे सिद्ध केली आहे. नव्या पिढ्यांनीही ती आपली मानली आहे. दरदिवशी संविधानाच्या रक्षणाची प्रतिज्ञा करणारे जनतेचे मोर्चे देशात निघत आहेत. अशावेळी एका केंद्रीय मंत्र्याने संविधान बदलण्याची व त्यातील धर्मनिरपेक्षतेला आपले लक्ष्य बनविण्याची भाषा उच्चारली असेल तर ती केवळ संविधानविरोधी नाही तर इतिहासविरोधीही आहे हे त्याला सांगावे लागेल. देशातील जनमानसाचा अपमान करणारी ही भाषा आहे. या मंत्र्याला त्याचा पक्ष जाब विचारणार नाही. संघ परिवाराला तर त्याची भाषा कवितेसारखी आवडावी अशीच आहे. मात्र एखादी कविताही समाज आणि देश यात दुही निर्माण करू शकते याची जाणीव साºया सावध जनतेने राखणे गरजेचे आहे. भारत हा जगातील मुसलमान धर्माच्या लोकांचाही दुसºया क्रमांकाचा देश आहे. त्यात दोन कोटी ख्रिश्चन राहतात. शीख हा धर्मही तेवढाच मोठा आहे. या सर्व धर्मांना व त्यांच्या अनुयायांना धर्मोपासनेचे स्वातंत्र्य आपल्या घटनेने बहाल केले आहे. भारत हा मध्य आशियातील अरब देशांसारखा कोणत्याही एका धर्माचा देश नाही. तो साºया धर्मांना कवेत घेणारा व राष्टÑ ही संकल्पना धर्मकल्पनेहून श्रेष्ठ आहे असे मानणारा आहे. त्याचे हेच स्वरूप जगाला भावणारे व आवडणारे आहे.