शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ज्ञानसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, गॅजेट्स यांचा वापर करणारे समाजात मोठ्या प्रमाणात लोक आढळतात. काहीतर अक्षरश: त्याचे व्यसनाधीन झाले आहेत. याद्वारे आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास माहितीचा भडीमार आपल्यावर होत असतो. आपल्याला मिळणारी माहिती ही आपल्या आत्म्याचे अन्न असते. अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे सात्विक अन्न जे आपल्या शरीराची ताकद वाढविते व दुसरे म्हणजे तामसिक अन्न जे आपली ताकद कमी करते. ज्या माहितीमुळे आपली सकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनविते मात्र ज्या माहितीमुळे आपली नकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला कमजोर बनविते. आपण आपल्या शरीराची ताकद वाढविण्याबाबत जागरुक असतो पण आत्म्याची ताकद वाढविण्याबाबत जागरुक नसतो. आपण एकदा माहिती वाचली की त्याचे मनात चिंतन चालू होते व ती आपल्या मनात शिरकाव करून आपल्या मनाचा भाग बनते मग आपल्याला त्याला मनापासून वेगळे करणे कठीण होते. म्हणूनच फक्त चांगली माहिती ग्रहण करणे अत्यावश्यक असते. एखाद्या भोजन समारंभासाठी आपण गेलो तर विविध जिन्नस आपल्यासाठी उपलब्ध असतात मात्र कोणते खायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. तसेच उपलब्ध माहितीपैकी कोणती माहिती आपण वाचायची व वाचायची नाही हे आपल्या हातात असते. जी माहिती आपल्याशी संबंधित नसते व बरेचदा ज्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही अशी माहिती आपण वाचत गेलो की उगाचच विचारांची गर्दी आपल्या मनात निर्माण होत असते. आपण चांगली माहिती ग्रहण केली की आपले विचार प्रगल्भ होतात, आत्म्याची शक्ती वाढते व आपोआप चांगले कर्म उदयास येतात. नकारात्मक माहितीमुळे मनात उदासिनता, उद्विग्नता, वासना, क्रोध, इर्षा, मत्सर असे दुर्गुण जागृत होतात तर सकारात्मक माहितीमुळे प्रेम, आनंद, जिव्हाळा असे सद्गुण जागृत होतात. स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ते आपल्या विचारामुळेच शक्य होत असते म्हणूनच चांगले विचार निर्माण करायचे असेल तर चांगलीच माहिती आपल्या मनाला भरवावी लागेल.त्यामुळे आपली आध्यात्मिक व भौतिक स्तरावर प्रगती होईल. यासाठीच ज्ञानसंपदा ही पवित्र असायला पाहिजे म्हणजे आपले अज्ञान, आसक्ती, दु:ख लोप पावतील व आपले दोष क्षीण होऊन आपण आत्मज्ञानाचा साधक बनू शकू !

टॅग्स :foodअन्नspiritualअध्यात्मिक