शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारआज व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, गॅजेट्स यांचा वापर करणारे समाजात मोठ्या प्रमाणात लोक आढळतात. काहीतर अक्षरश: त्याचे व्यसनाधीन झाले आहेत. याद्वारे आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास माहितीचा भडीमार आपल्यावर होत असतो. आपल्याला मिळणारी माहिती ही आपल्या आत्म्याचे अन्न असते. अन्न साधारणपणे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे सात्विक अन्न जे आपल्या शरीराची ताकद वाढविते व दुसरे म्हणजे तामसिक अन्न जे आपली ताकद कमी करते. ज्या माहितीमुळे आपली सकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनविते मात्र ज्या माहितीमुळे आपली नकारात्मकता वाढीस लागते, ती आपल्या आत्म्याला कमजोर बनविते. आपण आपल्या शरीराची ताकद वाढविण्याबाबत जागरुक असतो पण आत्म्याची ताकद वाढविण्याबाबत जागरुक नसतो. आपण एकदा माहिती वाचली की त्याचे मनात चिंतन चालू होते व ती आपल्या मनात शिरकाव करून आपल्या मनाचा भाग बनते मग आपल्याला त्याला मनापासून वेगळे करणे कठीण होते. म्हणूनच फक्त चांगली माहिती ग्रहण करणे अत्यावश्यक असते. एखाद्या भोजन समारंभासाठी आपण गेलो तर विविध जिन्नस आपल्यासाठी उपलब्ध असतात मात्र कोणते खायचे हे आपल्यावरच अवलंबून असते. तसेच उपलब्ध माहितीपैकी कोणती माहिती आपण वाचायची व वाचायची नाही हे आपल्या हातात असते. जी माहिती आपल्याशी संबंधित नसते व बरेचदा ज्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही अशी माहिती आपण वाचत गेलो की उगाचच विचारांची गर्दी आपल्या मनात निर्माण होत असते. आपण चांगली माहिती ग्रहण केली की आपले विचार प्रगल्भ होतात, आत्म्याची शक्ती वाढते व आपोआप चांगले कर्म उदयास येतात. नकारात्मक माहितीमुळे मनात उदासिनता, उद्विग्नता, वासना, क्रोध, इर्षा, मत्सर असे दुर्गुण जागृत होतात तर सकारात्मक माहितीमुळे प्रेम, आनंद, जिव्हाळा असे सद्गुण जागृत होतात. स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर ते आपल्या विचारामुळेच शक्य होत असते म्हणूनच चांगले विचार निर्माण करायचे असेल तर चांगलीच माहिती आपल्या मनाला भरवावी लागेल.त्यामुळे आपली आध्यात्मिक व भौतिक स्तरावर प्रगती होईल. यासाठीच ज्ञानसंपदा ही पवित्र असायला पाहिजे म्हणजे आपले अज्ञान, आसक्ती, दु:ख लोप पावतील व आपले दोष क्षीण होऊन आपण आत्मज्ञानाचा साधक बनू शकू !

टॅग्स :foodअन्नspiritualअध्यात्मिक