शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

राजा उदार झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:01 IST

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा असून जगातील असंख्य भाषांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. अशा या माय मराठीच्या समृद्धीसाठी शासन ते नागरिक सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नात मराठी साहित्य संमेलनाचेही मोठे योगदान आहे. मराठीचा हा गौरव सोहळा दरवर्षी न चुकता आयोजित केला जातो. परंतु या भव्य आयोजनाला कोटीच्या वर खर्च येतो. शासन मात्र दरवेळी २५ लाखांचे अनुदान देऊन आपली सुटका करून घेत होते. महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरत नाहीत. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला होता. अखेर सरकारने या प्रस्तावाची दखल घेत मराठीच्या या गौरव सोहळ्यासाठी आपली तिजोरी उघडली असून २५ लाखांचे अनुदान आता दुप्पट म्हणजे ५० लाख इतके केले आहे. शासनाची ही उदारता खरच अभिनंदनीय आहे. शासनाच्या या निर्णयाला आणखी एक महत्त्वाचा कंगोरा आहे. तो म्हणजे, इंग्रजी ही जागतिक पातळीवरची ज्ञानभाषा आहे आणि आता तर ती बाजारपेठेची भाषा झाली आहे. परिणामी इंग्रजीचा वापर प्रचंड वाढला आहे. याचा फटका मराठीला बसत आहे. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता कमी पडत आहे. मुळात कोणतीही भाषा टिकणे आणि तिचा विकास होणे म्हणजे काय, तर संभाषण, वाचन, लेखन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही आघाड्यांवर मराठीला अग्रेसर करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अनेकदा संमेलनाच्या आयोजनावरून आणि अंतर्गत राजकारणावरून टीकाही होत असते. परंतु म्हणून मराठीसाठी हे संमेलन घेत असलेले कष्ट नजरेआड करता येत नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते, परंतु तेव्हा ते तितक्या क्षमतेने घडले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा याच्या केवळ गप्पाच झाल्या. शासनानेही घोषणा खूप केल्या पण जेव्हा गोष्ट पैशांची आली तेव्हा मात्र बहाणे शोधले. पण, साहित्य संमेलनाने मराठीची पताका कायम फडकत ठेवली. कधी झुणका-भाकर खाऊन तर कधी फाटक्या चादरी पांघरून सारस्वतांनी मराठीचा भविष्यातील प्रवास समृद्ध कसा होईल, यासाठी अखंड खस्ता खाल्ल्या. उशिरा का होईला शासनाला याची जाणीव झाली आणि शासनाने संमेलनाचे अनुदान दुप्पट केले. त्यासाठी शासनाचे मनस्वी अभिनंदन...