शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

राजा उदार झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:01 IST

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा असून जगातील असंख्य भाषांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. अशा या माय मराठीच्या समृद्धीसाठी शासन ते नागरिक सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नात मराठी साहित्य संमेलनाचेही मोठे योगदान आहे. मराठीचा हा गौरव सोहळा दरवर्षी न चुकता आयोजित केला जातो. परंतु या भव्य आयोजनाला कोटीच्या वर खर्च येतो. शासन मात्र दरवेळी २५ लाखांचे अनुदान देऊन आपली सुटका करून घेत होते. महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरत नाहीत. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला होता. अखेर सरकारने या प्रस्तावाची दखल घेत मराठीच्या या गौरव सोहळ्यासाठी आपली तिजोरी उघडली असून २५ लाखांचे अनुदान आता दुप्पट म्हणजे ५० लाख इतके केले आहे. शासनाची ही उदारता खरच अभिनंदनीय आहे. शासनाच्या या निर्णयाला आणखी एक महत्त्वाचा कंगोरा आहे. तो म्हणजे, इंग्रजी ही जागतिक पातळीवरची ज्ञानभाषा आहे आणि आता तर ती बाजारपेठेची भाषा झाली आहे. परिणामी इंग्रजीचा वापर प्रचंड वाढला आहे. याचा फटका मराठीला बसत आहे. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता कमी पडत आहे. मुळात कोणतीही भाषा टिकणे आणि तिचा विकास होणे म्हणजे काय, तर संभाषण, वाचन, लेखन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही आघाड्यांवर मराठीला अग्रेसर करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अनेकदा संमेलनाच्या आयोजनावरून आणि अंतर्गत राजकारणावरून टीकाही होत असते. परंतु म्हणून मराठीसाठी हे संमेलन घेत असलेले कष्ट नजरेआड करता येत नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते, परंतु तेव्हा ते तितक्या क्षमतेने घडले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा याच्या केवळ गप्पाच झाल्या. शासनानेही घोषणा खूप केल्या पण जेव्हा गोष्ट पैशांची आली तेव्हा मात्र बहाणे शोधले. पण, साहित्य संमेलनाने मराठीची पताका कायम फडकत ठेवली. कधी झुणका-भाकर खाऊन तर कधी फाटक्या चादरी पांघरून सारस्वतांनी मराठीचा भविष्यातील प्रवास समृद्ध कसा होईल, यासाठी अखंड खस्ता खाल्ल्या. उशिरा का होईला शासनाला याची जाणीव झाली आणि शासनाने संमेलनाचे अनुदान दुप्पट केले. त्यासाठी शासनाचे मनस्वी अभिनंदन...