शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

दया

By admin | Updated: June 2, 2015 23:49 IST

मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला ‘डॉक्टर’ म्हणून ओळखले जाते. परंतु ही झाली बाह्य ओळख. त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांनी जी ओळख निर्माण होते तीच खरी ओळख. सामान्यत: संसारात सत्ता, संपत्ती, संतती प्राप्त होण्यालाच धन्यता समजले जाते. परंतु अध्यात्मिक दृष्टीने खरे धन्य कोण, याचे उत्तर संत तुकाराम महाराज सांगतात -धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरी।।ज्यांच्या अंत:करणा दया आहे तेच खरे या संसारात धन्य आहेत, तीच त्यांची खरी ओळख आहे. दया हा एक अत्यंत महत्त्वाचा सद्गुण आहे. संत कबीर महाराज तर ‘दया धर्म का मूल है।’ असे सांगतात. कायद्यामध्येसुद्धा ‘दयेचा अर्ज’ याला खूप महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज दैवी संपत्तीमध्ये या दयेचा विस्तार असा करतात की,आता दया ते ऐसी। पूर्णचंद्रीका जैसी।निवविता न कडसी। साने थोर।।पौर्णिमेचे चांदणे गारवा देताना जसे लहान थोर पाहात नाही तशी ही दया मनुष्यामध्ये कोणताही भेद पाहात नाही. मनुष्याच्या जीवनामधील देहभाव जावा, ब्रह्मभाव प्राप्त व्हावा आणि दयाभावामध्ये संपूर्ण जीवनाचा प्रवास चालावा.स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग असा आहे की, त्यांच्यावर त्यांच्याच जवळच्या एका शिष्याने विषप्रयोग केला. ते बेशुद्ध झाले. इतर शिष्यांनी त्या विष प्रयोग केलेल्या शिष्याला पकडले व एका खांबाला बांधून ठेवले. काही वेळानंतर स्वामीजी शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडले व पाहिले की त्या शिष्याला खांबाला बांधले आहे, तेव्हा इतर शिष्य म्हणू लागले, स्वामीजी यानेच तुमच्यावर विष प्रयोग केला व म्हणून त्याला बांधले आहे. याला काय शिक्षा द्यायची ते सांगा. स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि सर्व शिष्यांना सांगितले, जे बांधले आहे ते सोडा. कारण मी या जगात बांधायला नाही तर जे बांधलेले आहेत त्यांना सोडायला आलो आहे. यालाच दया म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अशा दयावान महात्म्याचा मी स्वत: ऋणी आहे.तो पुरूष वीरराया।मूर्तीमंत जाण दया।मी उदयजतांचि तया।ऋणिया लाभे।।।१६/१६२अशी दया मनुष्याने अंत:करणात आणावी. उन्हाळ्याते मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर ही दया म्हणजेच भगवंताची खरी पूजा होय व तिनेच भगवंत संतुष्ट होतील.