शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

दया

By admin | Updated: June 2, 2015 23:49 IST

मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला ‘डॉक्टर’ म्हणून ओळखले जाते. परंतु ही झाली बाह्य ओळख. त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांनी जी ओळख निर्माण होते तीच खरी ओळख. सामान्यत: संसारात सत्ता, संपत्ती, संतती प्राप्त होण्यालाच धन्यता समजले जाते. परंतु अध्यात्मिक दृष्टीने खरे धन्य कोण, याचे उत्तर संत तुकाराम महाराज सांगतात -धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरी।।ज्यांच्या अंत:करणा दया आहे तेच खरे या संसारात धन्य आहेत, तीच त्यांची खरी ओळख आहे. दया हा एक अत्यंत महत्त्वाचा सद्गुण आहे. संत कबीर महाराज तर ‘दया धर्म का मूल है।’ असे सांगतात. कायद्यामध्येसुद्धा ‘दयेचा अर्ज’ याला खूप महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज दैवी संपत्तीमध्ये या दयेचा विस्तार असा करतात की,आता दया ते ऐसी। पूर्णचंद्रीका जैसी।निवविता न कडसी। साने थोर।।पौर्णिमेचे चांदणे गारवा देताना जसे लहान थोर पाहात नाही तशी ही दया मनुष्यामध्ये कोणताही भेद पाहात नाही. मनुष्याच्या जीवनामधील देहभाव जावा, ब्रह्मभाव प्राप्त व्हावा आणि दयाभावामध्ये संपूर्ण जीवनाचा प्रवास चालावा.स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग असा आहे की, त्यांच्यावर त्यांच्याच जवळच्या एका शिष्याने विषप्रयोग केला. ते बेशुद्ध झाले. इतर शिष्यांनी त्या विष प्रयोग केलेल्या शिष्याला पकडले व एका खांबाला बांधून ठेवले. काही वेळानंतर स्वामीजी शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडले व पाहिले की त्या शिष्याला खांबाला बांधले आहे, तेव्हा इतर शिष्य म्हणू लागले, स्वामीजी यानेच तुमच्यावर विष प्रयोग केला व म्हणून त्याला बांधले आहे. याला काय शिक्षा द्यायची ते सांगा. स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि सर्व शिष्यांना सांगितले, जे बांधले आहे ते सोडा. कारण मी या जगात बांधायला नाही तर जे बांधलेले आहेत त्यांना सोडायला आलो आहे. यालाच दया म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अशा दयावान महात्म्याचा मी स्वत: ऋणी आहे.तो पुरूष वीरराया।मूर्तीमंत जाण दया।मी उदयजतांचि तया।ऋणिया लाभे।।।१६/१६२अशी दया मनुष्याने अंत:करणात आणावी. उन्हाळ्याते मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर ही दया म्हणजेच भगवंताची खरी पूजा होय व तिनेच भगवंत संतुष्ट होतील.