शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दया

By admin | Updated: June 2, 2015 23:49 IST

मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले - मनुष्य समाजामध्ये वावरत असताना समाजातील त्याची ओळख ही त्याच्या स्वभावावरून ठरत असते. एखाद्याने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर समाजामध्ये त्याला ‘डॉक्टर’ म्हणून ओळखले जाते. परंतु ही झाली बाह्य ओळख. त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांनी जी ओळख निर्माण होते तीच खरी ओळख. सामान्यत: संसारात सत्ता, संपत्ती, संतती प्राप्त होण्यालाच धन्यता समजले जाते. परंतु अध्यात्मिक दृष्टीने खरे धन्य कोण, याचे उत्तर संत तुकाराम महाराज सांगतात -धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरी।।ज्यांच्या अंत:करणा दया आहे तेच खरे या संसारात धन्य आहेत, तीच त्यांची खरी ओळख आहे. दया हा एक अत्यंत महत्त्वाचा सद्गुण आहे. संत कबीर महाराज तर ‘दया धर्म का मूल है।’ असे सांगतात. कायद्यामध्येसुद्धा ‘दयेचा अर्ज’ याला खूप महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज दैवी संपत्तीमध्ये या दयेचा विस्तार असा करतात की,आता दया ते ऐसी। पूर्णचंद्रीका जैसी।निवविता न कडसी। साने थोर।।पौर्णिमेचे चांदणे गारवा देताना जसे लहान थोर पाहात नाही तशी ही दया मनुष्यामध्ये कोणताही भेद पाहात नाही. मनुष्याच्या जीवनामधील देहभाव जावा, ब्रह्मभाव प्राप्त व्हावा आणि दयाभावामध्ये संपूर्ण जीवनाचा प्रवास चालावा.स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील एक प्रसंग असा आहे की, त्यांच्यावर त्यांच्याच जवळच्या एका शिष्याने विषप्रयोग केला. ते बेशुद्ध झाले. इतर शिष्यांनी त्या विष प्रयोग केलेल्या शिष्याला पकडले व एका खांबाला बांधून ठेवले. काही वेळानंतर स्वामीजी शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडले व पाहिले की त्या शिष्याला खांबाला बांधले आहे, तेव्हा इतर शिष्य म्हणू लागले, स्वामीजी यानेच तुमच्यावर विष प्रयोग केला व म्हणून त्याला बांधले आहे. याला काय शिक्षा द्यायची ते सांगा. स्वामीजींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि सर्व शिष्यांना सांगितले, जे बांधले आहे ते सोडा. कारण मी या जगात बांधायला नाही तर जे बांधलेले आहेत त्यांना सोडायला आलो आहे. यालाच दया म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अशा दयावान महात्म्याचा मी स्वत: ऋणी आहे.तो पुरूष वीरराया।मूर्तीमंत जाण दया।मी उदयजतांचि तया।ऋणिया लाभे।।।१६/१६२अशी दया मनुष्याने अंत:करणात आणावी. उन्हाळ्याते मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर ही दया म्हणजेच भगवंताची खरी पूजा होय व तिनेच भगवंत संतुष्ट होतील.