शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

‘ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले’

By admin | Updated: July 9, 2015 22:19 IST

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या काव्यप्रतिभेचा साक्षात्कार घडवून देण्यासाठी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात प्रदीप निफाडकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा हा आदरांजलीपर संपादित अंश ----------------------औरंगाबाद म्हणजे उर्दू साहित्याची मक्का असे म्हटले तर वावगे ठरू नये. भडकल दरवाजाजवळ जुन्या काळातल्या दुमजली घरात बशरसाहेबांचा निवास. भूपेंद्र यांनी बाजार चित्रपटात गायिलेली कविता ‘करोगे याद तो याद बहोत आओगे’ ही त्यांची ओळख ठरली; पण त्या पलीकडे बशरसाहेब अजून खूप होते. सर्वसाधारण उर्दू गझलकार गाऊन गझला म्हणतात. कधी कधी हे ऐकवणे ओरडण्याची जागा घेते व ते शायरलाही कळत नाही. बशरसाहेबांचं तसं नव्हतं. ते तहदमध्ये (सरळ वाचल्यासारखे) ऐकवीत, तरन्नुम (गाऊन) मध्ये नाही. पण शब्द इतके चपखल व अर्थवाही की, ऐकणारा मुग्ध झालाच पाहिजे. सत्तरी पार केल्यानंतरही बशरसाहेबांचे न थकता मैफिली रंगविणे सुरुच होते. जेमतेम इंटर पास केलेल्या बशरसाहेबांनी पहिली गझल वयाच्या १३-१४ व्या वर्षी लिहिली आणि अलिगढला आता प्राध्यापक असलेल्या याकूब उस्मानी या मित्राला दाखविली. त्याने आश्चर्र्य व्यक्त केले. कारण साधारणत: पहिली दुसरी गझल वृत्तात चुकते; पण बशर यांची गझल वृत्तात जराही चुकली नव्हती.जब शब के भयानक सन्नाटे मेंआलम सारा सोता हैए ऐशो-तलब के मालिक सुन,एक दर्द का मारा रोता है।औरंगाबादच्याच एका मुशायऱ्यात बशरसाहेबांनी आपली ही पहिली गझल सादर केली होती.ये एहतमामे-चरागाँ बजा सही लेकिन सहर तो हो नही सकती दिये जलाने सेहा शेर स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर गेला. तेव्हाची प्रसिद्ध मासिके, साप्ताहिके पत्ता शोधत बशर यांच्या गझला मागवून घेऊ लागली. बशर यांना मुशायऱ्याची निमंत्रणे येऊ लागली. लखनौ, हैदराबाद, दिल्ली... रसिकांचे एकही गाव सुटले नाही. सर्वत्र बशर नवाज नावाजू लागले.बशरसाहेबांना डाव्या चळवळीने भुरळ घातली. रुमानी (रोमँटिक) लिहिणारे बशरसाहेब तरक्कीपसंद (सुधारणावादी) शायरी लिहू लागले. रूमानी व तरक्कीपसंदचा सुंदर गोफ त्यांनी विणला. स्वत:च्या अनुभवांना, स्वत:च्या वाचनाला बशरसाहेबांनी गुरू केले. शायरीत सर्व गोष्टी स्वच्छ आल्या पाहिजेत. सरलता हवी, सहजता हवी, वास्तवता सौंदर्य असेल तर ती सोपेपणाने सांगू शकू, असे एकेक धडे ते गिरवू लागले. डाव्या चळवळीत काम केले; पण पदांची लालसा बाळगली नाही. आपल्या शायरीच्या राज्यात मस्त फकीर! कधी कुणी ‘बाजार’साठी ‘करोगे याद’ नज्म घेतली, तर कधी कुणी ‘इश्क चाँदी है, इश्क सोना है, है जवानी तो इश्क होना है’ किंवा ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’ असे बशरसाहेबांच्या शायरीचे तुकडे घेऊन गाणे रचले. साहेब स्वत:हून कुणाच्या मागे फिरले नाहीत; पण ते सांगण्यातही मस्ती नव्हती. लतादिदींनीच नव्हे, तर गुलाम अलीसारख्या गझल गायकानेही-जब तेरी राहसे होकर गुजरेआँखोसे कितने मंजर गुजरेउम्र यूँ गुजरी है, जैसे सरसेसनसनाता हुआ पत्थर गुजरेबशर साहेबांच्या अशा गझलांनी आपला अल्बम सजविला आहे.जुल्फे खुली तो मस्त घटा घीर के छा गई आँचल उडा तो एक कयामतसी आ गईअशा गझला मेहंदी हसन यांनी गायल्या. ‘स्वत:ला पूर्णपणे व्यक्त करता येईल, अशी कविता लिहिण्याची अखेरची इच्छा आहे,’ असे सांगतानाच पुनर्जन्म मानण्याच्या गोष्टी होतात; पण स्वत:ला पुनर्जन्म मिळणार नाही व मिळाला तर आपण घेणार नाही हे ठामपणे सांगणे असते आणि त्याचे कारण विचाराल तर ‘फिर आके ये फंक्शन क्यूँ करे’ असे साधे मिश्किल उत्तर असते.ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने खो गए इन्ही अंधेरो मे उजाले कितनेयाच अंधारात अनेक प्रकाशमान गोष्टी हरवल्या. अनेक स्वप्ने जगाच्या हवाली केली. त्या प्रवासासाठी... जो आता अखेरचा टप्पा पार करुन पल्याड गेला आहे.