शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

‘ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले’

By admin | Updated: July 9, 2015 22:19 IST

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या काव्यप्रतिभेचा साक्षात्कार घडवून देण्यासाठी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात प्रदीप निफाडकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा हा आदरांजलीपर संपादित अंश ----------------------औरंगाबाद म्हणजे उर्दू साहित्याची मक्का असे म्हटले तर वावगे ठरू नये. भडकल दरवाजाजवळ जुन्या काळातल्या दुमजली घरात बशरसाहेबांचा निवास. भूपेंद्र यांनी बाजार चित्रपटात गायिलेली कविता ‘करोगे याद तो याद बहोत आओगे’ ही त्यांची ओळख ठरली; पण त्या पलीकडे बशरसाहेब अजून खूप होते. सर्वसाधारण उर्दू गझलकार गाऊन गझला म्हणतात. कधी कधी हे ऐकवणे ओरडण्याची जागा घेते व ते शायरलाही कळत नाही. बशरसाहेबांचं तसं नव्हतं. ते तहदमध्ये (सरळ वाचल्यासारखे) ऐकवीत, तरन्नुम (गाऊन) मध्ये नाही. पण शब्द इतके चपखल व अर्थवाही की, ऐकणारा मुग्ध झालाच पाहिजे. सत्तरी पार केल्यानंतरही बशरसाहेबांचे न थकता मैफिली रंगविणे सुरुच होते. जेमतेम इंटर पास केलेल्या बशरसाहेबांनी पहिली गझल वयाच्या १३-१४ व्या वर्षी लिहिली आणि अलिगढला आता प्राध्यापक असलेल्या याकूब उस्मानी या मित्राला दाखविली. त्याने आश्चर्र्य व्यक्त केले. कारण साधारणत: पहिली दुसरी गझल वृत्तात चुकते; पण बशर यांची गझल वृत्तात जराही चुकली नव्हती.जब शब के भयानक सन्नाटे मेंआलम सारा सोता हैए ऐशो-तलब के मालिक सुन,एक दर्द का मारा रोता है।औरंगाबादच्याच एका मुशायऱ्यात बशरसाहेबांनी आपली ही पहिली गझल सादर केली होती.ये एहतमामे-चरागाँ बजा सही लेकिन सहर तो हो नही सकती दिये जलाने सेहा शेर स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर गेला. तेव्हाची प्रसिद्ध मासिके, साप्ताहिके पत्ता शोधत बशर यांच्या गझला मागवून घेऊ लागली. बशर यांना मुशायऱ्याची निमंत्रणे येऊ लागली. लखनौ, हैदराबाद, दिल्ली... रसिकांचे एकही गाव सुटले नाही. सर्वत्र बशर नवाज नावाजू लागले.बशरसाहेबांना डाव्या चळवळीने भुरळ घातली. रुमानी (रोमँटिक) लिहिणारे बशरसाहेब तरक्कीपसंद (सुधारणावादी) शायरी लिहू लागले. रूमानी व तरक्कीपसंदचा सुंदर गोफ त्यांनी विणला. स्वत:च्या अनुभवांना, स्वत:च्या वाचनाला बशरसाहेबांनी गुरू केले. शायरीत सर्व गोष्टी स्वच्छ आल्या पाहिजेत. सरलता हवी, सहजता हवी, वास्तवता सौंदर्य असेल तर ती सोपेपणाने सांगू शकू, असे एकेक धडे ते गिरवू लागले. डाव्या चळवळीत काम केले; पण पदांची लालसा बाळगली नाही. आपल्या शायरीच्या राज्यात मस्त फकीर! कधी कुणी ‘बाजार’साठी ‘करोगे याद’ नज्म घेतली, तर कधी कुणी ‘इश्क चाँदी है, इश्क सोना है, है जवानी तो इश्क होना है’ किंवा ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’ असे बशरसाहेबांच्या शायरीचे तुकडे घेऊन गाणे रचले. साहेब स्वत:हून कुणाच्या मागे फिरले नाहीत; पण ते सांगण्यातही मस्ती नव्हती. लतादिदींनीच नव्हे, तर गुलाम अलीसारख्या गझल गायकानेही-जब तेरी राहसे होकर गुजरेआँखोसे कितने मंजर गुजरेउम्र यूँ गुजरी है, जैसे सरसेसनसनाता हुआ पत्थर गुजरेबशर साहेबांच्या अशा गझलांनी आपला अल्बम सजविला आहे.जुल्फे खुली तो मस्त घटा घीर के छा गई आँचल उडा तो एक कयामतसी आ गईअशा गझला मेहंदी हसन यांनी गायल्या. ‘स्वत:ला पूर्णपणे व्यक्त करता येईल, अशी कविता लिहिण्याची अखेरची इच्छा आहे,’ असे सांगतानाच पुनर्जन्म मानण्याच्या गोष्टी होतात; पण स्वत:ला पुनर्जन्म मिळणार नाही व मिळाला तर आपण घेणार नाही हे ठामपणे सांगणे असते आणि त्याचे कारण विचाराल तर ‘फिर आके ये फंक्शन क्यूँ करे’ असे साधे मिश्किल उत्तर असते.ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने खो गए इन्ही अंधेरो मे उजाले कितनेयाच अंधारात अनेक प्रकाशमान गोष्टी हरवल्या. अनेक स्वप्ने जगाच्या हवाली केली. त्या प्रवासासाठी... जो आता अखेरचा टप्पा पार करुन पल्याड गेला आहे.