शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

‘ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले’

By admin | Updated: July 9, 2015 22:19 IST

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू गझलकार बशर नवाझ साहेब यांचे गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या काव्यप्रतिभेचा साक्षात्कार घडवून देण्यासाठी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात प्रदीप निफाडकर यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा हा आदरांजलीपर संपादित अंश ----------------------औरंगाबाद म्हणजे उर्दू साहित्याची मक्का असे म्हटले तर वावगे ठरू नये. भडकल दरवाजाजवळ जुन्या काळातल्या दुमजली घरात बशरसाहेबांचा निवास. भूपेंद्र यांनी बाजार चित्रपटात गायिलेली कविता ‘करोगे याद तो याद बहोत आओगे’ ही त्यांची ओळख ठरली; पण त्या पलीकडे बशरसाहेब अजून खूप होते. सर्वसाधारण उर्दू गझलकार गाऊन गझला म्हणतात. कधी कधी हे ऐकवणे ओरडण्याची जागा घेते व ते शायरलाही कळत नाही. बशरसाहेबांचं तसं नव्हतं. ते तहदमध्ये (सरळ वाचल्यासारखे) ऐकवीत, तरन्नुम (गाऊन) मध्ये नाही. पण शब्द इतके चपखल व अर्थवाही की, ऐकणारा मुग्ध झालाच पाहिजे. सत्तरी पार केल्यानंतरही बशरसाहेबांचे न थकता मैफिली रंगविणे सुरुच होते. जेमतेम इंटर पास केलेल्या बशरसाहेबांनी पहिली गझल वयाच्या १३-१४ व्या वर्षी लिहिली आणि अलिगढला आता प्राध्यापक असलेल्या याकूब उस्मानी या मित्राला दाखविली. त्याने आश्चर्र्य व्यक्त केले. कारण साधारणत: पहिली दुसरी गझल वृत्तात चुकते; पण बशर यांची गझल वृत्तात जराही चुकली नव्हती.जब शब के भयानक सन्नाटे मेंआलम सारा सोता हैए ऐशो-तलब के मालिक सुन,एक दर्द का मारा रोता है।औरंगाबादच्याच एका मुशायऱ्यात बशरसाहेबांनी आपली ही पहिली गझल सादर केली होती.ये एहतमामे-चरागाँ बजा सही लेकिन सहर तो हो नही सकती दिये जलाने सेहा शेर स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर गेला. तेव्हाची प्रसिद्ध मासिके, साप्ताहिके पत्ता शोधत बशर यांच्या गझला मागवून घेऊ लागली. बशर यांना मुशायऱ्याची निमंत्रणे येऊ लागली. लखनौ, हैदराबाद, दिल्ली... रसिकांचे एकही गाव सुटले नाही. सर्वत्र बशर नवाज नावाजू लागले.बशरसाहेबांना डाव्या चळवळीने भुरळ घातली. रुमानी (रोमँटिक) लिहिणारे बशरसाहेब तरक्कीपसंद (सुधारणावादी) शायरी लिहू लागले. रूमानी व तरक्कीपसंदचा सुंदर गोफ त्यांनी विणला. स्वत:च्या अनुभवांना, स्वत:च्या वाचनाला बशरसाहेबांनी गुरू केले. शायरीत सर्व गोष्टी स्वच्छ आल्या पाहिजेत. सरलता हवी, सहजता हवी, वास्तवता सौंदर्य असेल तर ती सोपेपणाने सांगू शकू, असे एकेक धडे ते गिरवू लागले. डाव्या चळवळीत काम केले; पण पदांची लालसा बाळगली नाही. आपल्या शायरीच्या राज्यात मस्त फकीर! कधी कुणी ‘बाजार’साठी ‘करोगे याद’ नज्म घेतली, तर कधी कुणी ‘इश्क चाँदी है, इश्क सोना है, है जवानी तो इश्क होना है’ किंवा ‘जिये तो जिये कैसे बिन आपके’ असे बशरसाहेबांच्या शायरीचे तुकडे घेऊन गाणे रचले. साहेब स्वत:हून कुणाच्या मागे फिरले नाहीत; पण ते सांगण्यातही मस्ती नव्हती. लतादिदींनीच नव्हे, तर गुलाम अलीसारख्या गझल गायकानेही-जब तेरी राहसे होकर गुजरेआँखोसे कितने मंजर गुजरेउम्र यूँ गुजरी है, जैसे सरसेसनसनाता हुआ पत्थर गुजरेबशर साहेबांच्या अशा गझलांनी आपला अल्बम सजविला आहे.जुल्फे खुली तो मस्त घटा घीर के छा गई आँचल उडा तो एक कयामतसी आ गईअशा गझला मेहंदी हसन यांनी गायल्या. ‘स्वत:ला पूर्णपणे व्यक्त करता येईल, अशी कविता लिहिण्याची अखेरची इच्छा आहे,’ असे सांगतानाच पुनर्जन्म मानण्याच्या गोष्टी होतात; पण स्वत:ला पुनर्जन्म मिळणार नाही व मिळाला तर आपण घेणार नाही हे ठामपणे सांगणे असते आणि त्याचे कारण विचाराल तर ‘फिर आके ये फंक्शन क्यूँ करे’ असे साधे मिश्किल उत्तर असते.ख्वाब अपने हुए दुनिया के हवाले कितने खो गए इन्ही अंधेरो मे उजाले कितनेयाच अंधारात अनेक प्रकाशमान गोष्टी हरवल्या. अनेक स्वप्ने जगाच्या हवाली केली. त्या प्रवासासाठी... जो आता अखेरचा टप्पा पार करुन पल्याड गेला आहे.