शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर : हा खेळ अंगलट येणारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:49 IST

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणतात, घटनेचे ३७० वे कलम हे भारताने काश्मीरच्या जनतेला दिलेले पवित्र अभिवचन आहे.

-सुरेश द्वादशीवार(संपादक, नागपूर)

जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणतात, घटनेचे ३७० वे कलम हे भारताने काश्मीरच्या जनतेला दिलेले पवित्र अभिवचन आहे. या कलमाने काश्मीरची स्वायत्तता आजवर अबाधित राखली आहे. ते कलम जोवर घटनेत आहे तोवर काश्मीरची जनता आपले अधिकार व सुरक्षेबाबत आश्वस्त आहे. मेहबुबा मुफ्तींचे सरकार जी भाषा बोलते तीच काश्मिरातील नॅशनल कॉन्फरन्स हा दुसºया क्रमांकाचा मोठा व महत्त्वाचा पक्षही बोलतो. त्याचे अध्यक्ष डॉ. फारुक अब्दुल्ला व त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही वेळोवेळी याच भाषेचा उच्चार केला आहे. त्या राज्यातील तिसरा महत्त्वाचा व एकेकाळी सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्षही ३७० वे कलम कायम राखण्याच्या मताचा आहे. त्या राज्याच्या सरकारातील भाजपचा प्रवेश अलीकडचा व तोही जम्मू भागातून झाला आहे. हा पक्ष मात्र आरंभापासून या कलमाविरुद्ध भूमिका घेत आला आहे. या कलमाने दिलेली काश्मीरची स्वायत्तता जावी आणि भारतातील इतरांना काश्मिरात जाऊन कायम वसाहती करता याव्या अशी त्यामागची त्याची भूमिका आहे. नेमकी हीच भूमिका आमची स्वायत्तता घालविते असे मेहबुबा मुफ्ती व इतरांचे म्हणणे आहे. यातला आणखी एक पेच हा की, भाजप हा पक्ष मुफ्तींच्या सरकारात सहभागी आहे. त्यामुळे सरकारवर दोन्ही बाजूंनी बोलण्याची पाळी आली आहे. मुफ्ती म्हणतात, ३७० हवे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग म्हणतात, ते यथावकाश हटविले पाहिजे. केंद्रातील मोदी सरकारला काश्मीरची सत्ता हवी आणि त्याचवेळी ३७० वे कलम जायलाही हवे. ही स्थिती काश्मिरात अस्थिरता निर्माण करणारी व जनतेत अस्वस्थता उभी करणारी आहे. प्रत्यक्षात त्या कलमात काश्मिरी जनतेचा तिच्या प्रदेशातील सुरक्षित निवासच तेवढा आता महत्त्वाचा उरला आहे. भारताच्या अन्य राज्यातील आदिवासी क्षेत्रात (ट्रायबल एरियाज) इतरांना जमिनी घेण्याचा व तेथे कायम वास्तव्य करण्याचा अधिकार जसा नाही तसा तो काश्मिरातही जमिनी घेण्याचा व वास्तव्याचा अधिकार नाही. आदिवासींच्या मागासवृत्तीचा फायदा घेऊन इतरांनी त्यांची लूट करू नये म्हणून त्यांना हे संरक्षण देण्यात आले आहे. ते काश्मिरी जनतेची अल्पसंख्य स्थिती लक्षात घेऊन तेथेही दिले गेले आहे. प्रत्यक्षात हे कलम त्याच्या मूळ स्वरुपाहून अतिशय वेगळे व पातळ झाले आहे. काश्मीरचे संस्थान भारतात विलीन झाले तेव्हाच्या सामिलीकरणाच्या जाहीरनाम्यात त्या राज्याला स्वत:ची घटना तयार करण्याचा, ध्वज राखण्याचा, त्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणण्याचा अधिकार समाविष्ट होता. त्याखेरीज संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन हे विषय वगळता अन्य विषयांबाबतचे कायदे करण्याचा अधिकार काश्मीरच्या विधानसभेला राहणार होता. हे सारे आता बदलले आहे. काश्मीरला स्वतंत्र घटना नाही, ध्वज नाही आणि तेथे साधा मुख्यमंत्रीच तेवढा आहे. केंद्र सरकार संघ सूचीतील सर्वच विषयांबाबत कायदे करून ते काश्मिरात लागू करत असते. तात्पर्य, निवासाच्या सुरक्षेचा एक अधिकार सोडला तर ३७० व्या कलमात फारसे काही नाही. हे कलम काश्मिरात जमिनी घेऊन त्या थंड हवेच्या प्रदेशात हॉटेल्स बांधणाºयांच्या जास्तीचे आड येते तर भाजपला राष्ट्रीय एकात्मतेचे नाव सांगून ते कलम काढून टाकणे आवश्यक वाटते. तसाही त्या राज्यात हिंसाचाराचा डोंब आहे. तो शमवायचा तर असल्या राज्यविरोधी भूमिका घेणे केंद्र व भाजपने टाकणे गरजेचे आहे. ज्या दिवशी हे कलम जाईल त्यादिवशी काश्मीरही भारतातून जाईल अशी भाषा फारुक अब्दुल्ला यांनी उच्चारली आहे. मेहबुबा मुफ्तींचे म्हणणेही याहून वेगळे नाही. मोदी गप्प आहेत, राजनाथ बोलत नाहीत आणि सारे केंद्र सरकारच मूग गिळून बसले आहे. जनतेला आश्वस्त करण्याची गरज त्यातल्या कोणालाही वाटत नाही. दुर्दैव याचे की असे मौनच अशावेळी जास्तीचे बोलके, फसवे व डिवचणारे होते. त्यातही भाजपची एक खेळी ही की सरकार गप्प असताना त्या पक्षाचे काही कार्यकर्ते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून ३७० वे कलम रद्द करण्याची मागणी करायला त्यासमोर उभे आहेत. अशावेळी सामान्य माणसांना पडणारा प्रश्न हा की, यातले सरकार खरे की सर्वोच्च न्यायालयात गेलेले भाजपचे लोक खरे? की तुम्ही न्यायालयात जा आम्ही गप्प बसतो ही राजकीयच चालच त्या पक्षाकडून खेळली जाते? राजकारणाचे निर्णय राजकारणाने घ्यायचे असतात. ते न्यायालयांवर सोपवून त्यांचा राजकीय आखाडा करायचा नसतो. याचे साधेही भान आपल्या राजकारणाला असू नये या दुर्दैवाला काय म्हणायचे? वास्तविक न्यायालयानेही हा प्रश्न आपल्या अखत्यारितला नाही हे सरकारला बजावायचे पण त्याही क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा वाढीला लागल्या असतील तर त्यावर कोणता उपाय असतो? राजकारणाच्या या खेळखंडोब्यात काश्मीर जळत असते व तेथील जनतेला कधी शांतता लाभत नाही. परस्परविरोधी बातम्यांनी राजकारण तापत ठेवले असते व लोक त्यात भरडून निघत असतात. यातच काहींना आपण पराक्रम करीत असल्याचा भास सुखवितो तर सरकारचे मौन त्याची संशयास्पद स्थिती उघड करीत असते.(sdwadashiwar@gmail.com)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर