शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कन्हैया व हार्दिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 03:45 IST

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे.

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे. कदाचित त्यामुळेच सरकारच्या लेखी दोघे ‘राष्ट्रद्रोही’ आहेत. तरीही दोघांच्या मागे बऱ्यापैकी जनसमर्थन आहे. फरक इतकाच की हार्दिक पटेल याला लाभलेल्या समर्थनाला कोणताही नेमका आणि विशिष्ट चेहरा वा तोंडावळा नाही पण कन्हैयाकुमार त्या बाबतीत नशिबवान आहे. भले तो डाव्या चळवळीतून पुढे आला असला वा त्या मार्गाने जाऊ इच्छित असला तरी त्याला देशातील समस्त विरोधी पक्षांचे, विचारवंतांचे, बुद्धिमंतांचे, साहित्यिकांचे आणि कलाकारांचेही समर्थन प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच कारावासातून त्याची तत्काळ मुक्ततादेखील होऊ शकली आहे. पण या सर्व बाबतीत हार्दिक पटेल अत्यंत कमनशिबीच समजला पाहिजे. देशद्रोहाच्या आरोपाखाली गेल्या कित्येक महिन्यांपासून तो कारागृहात खिचपत पडला आहे. पण त्याच्याकरिता सहानुभूतीचा एखादा शब्ददेखील अद्याप कोणी उच्चारलेला नाही. आता तर काय म्हणे सूरतच्या कारागृहात त्याच्याजवळ मोबाईलची बॅटरी आणि चार्जर (मोबाईल नव्हे) सापडले म्हणून त्याच्या विरुद्ध सूरतच्या न्यायालयात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला गेला आहे. देशातील सर्व कारागृहे अत्यंत खतरनाक अशा गुंडांसाठी कशी नंदनवने आहेत याच्या सुरस आणि सुरम्य कथा नेहमीच प्रसिद्ध होत असतात. त्यांच्याकडे केवळ मोबाईल फोन किंवा त्याहून सक्षम संदेशवहन यंत्रणाच असतात असे नव्हे तर अत्यंत खतरनाक अशी प्राणघातक हत्त्यारेही असतात. पण त्यांना त्यासाठी कधी शिक्षा झाली आहे असे ऐकिवात येत नाही. हार्दिकच्या विरोधात मात्र चपळाईने कारवाई केली जाते. देशद्रोहाचा ठपका ठेवण्याइतपत त्याचा गुन्हा काय, तर त्याने गुजरात राज्यातील पाटीदार म्हणजे पटेल समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आणि मोठे आंदोलन उभे केले. अगदी अलीकडे राजस्थान-हरयाणा-पंजाब आदि राज्यांमध्ये मोठ्या संख्येत असलेल्या जाट समाजानेही आरक्षणासाठीच उग्र आणि अत्यंत हिंसक आंदोलन छेडले होते. देशाच्या राजधानीलाच त्यांनी वेठीस धरले होते. परंतु जाटच कशाला देशाच्या बव्हंशी राज्यांमध्ये कोणती ना कोणती जात, पोटजात वा उपजात आरक्षणाची मागणी करीत असते व प्रसंगी त्यातून हिंसाचारही घडून येत असतो. पण त्यासाठी आजतागायत कोणालाही देशद्रोही म्हणून संबोधले गेलेले नाही. हार्दिक मात्र देशद्रोही ठरवला गेला आहे. त्याची कुणालाही कणव येत नाही. पंतप्रधान गुजरातचे, हार्दिक त्याच राज्यातला तेव्हां परस्पर काट्याने काटा निघत असेल तर कशाला उगाच मध्ये पडा असा विचार करुन एकाही पक्षाला वा नेत्याला हार्दिकचा कळवळा येत नसेल तर मग कोणीही समानतेचा व समान दृष्टीकोनाचा दावा करु नये हेच बरे. पुन्हा हा प्रश्न जर-तरचा नाही. हार्दिकचे आंदोलन धगधगत होते तेव्हांच बिहारच्या निवडणुकीचे वातावरणही तप्त होत होते आणि नितीश-लालू आदिंनी हार्दिकला त्यांचा हार्दिक पाठिंबा जाहीर केला होता!