शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कन्हैया व हार्दिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 03:45 IST

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे.

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे. कदाचित त्यामुळेच सरकारच्या लेखी दोघे ‘राष्ट्रद्रोही’ आहेत. तरीही दोघांच्या मागे बऱ्यापैकी जनसमर्थन आहे. फरक इतकाच की हार्दिक पटेल याला लाभलेल्या समर्थनाला कोणताही नेमका आणि विशिष्ट चेहरा वा तोंडावळा नाही पण कन्हैयाकुमार त्या बाबतीत नशिबवान आहे. भले तो डाव्या चळवळीतून पुढे आला असला वा त्या मार्गाने जाऊ इच्छित असला तरी त्याला देशातील समस्त विरोधी पक्षांचे, विचारवंतांचे, बुद्धिमंतांचे, साहित्यिकांचे आणि कलाकारांचेही समर्थन प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच कारावासातून त्याची तत्काळ मुक्ततादेखील होऊ शकली आहे. पण या सर्व बाबतीत हार्दिक पटेल अत्यंत कमनशिबीच समजला पाहिजे. देशद्रोहाच्या आरोपाखाली गेल्या कित्येक महिन्यांपासून तो कारागृहात खिचपत पडला आहे. पण त्याच्याकरिता सहानुभूतीचा एखादा शब्ददेखील अद्याप कोणी उच्चारलेला नाही. आता तर काय म्हणे सूरतच्या कारागृहात त्याच्याजवळ मोबाईलची बॅटरी आणि चार्जर (मोबाईल नव्हे) सापडले म्हणून त्याच्या विरुद्ध सूरतच्या न्यायालयात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला गेला आहे. देशातील सर्व कारागृहे अत्यंत खतरनाक अशा गुंडांसाठी कशी नंदनवने आहेत याच्या सुरस आणि सुरम्य कथा नेहमीच प्रसिद्ध होत असतात. त्यांच्याकडे केवळ मोबाईल फोन किंवा त्याहून सक्षम संदेशवहन यंत्रणाच असतात असे नव्हे तर अत्यंत खतरनाक अशी प्राणघातक हत्त्यारेही असतात. पण त्यांना त्यासाठी कधी शिक्षा झाली आहे असे ऐकिवात येत नाही. हार्दिकच्या विरोधात मात्र चपळाईने कारवाई केली जाते. देशद्रोहाचा ठपका ठेवण्याइतपत त्याचा गुन्हा काय, तर त्याने गुजरात राज्यातील पाटीदार म्हणजे पटेल समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आणि मोठे आंदोलन उभे केले. अगदी अलीकडे राजस्थान-हरयाणा-पंजाब आदि राज्यांमध्ये मोठ्या संख्येत असलेल्या जाट समाजानेही आरक्षणासाठीच उग्र आणि अत्यंत हिंसक आंदोलन छेडले होते. देशाच्या राजधानीलाच त्यांनी वेठीस धरले होते. परंतु जाटच कशाला देशाच्या बव्हंशी राज्यांमध्ये कोणती ना कोणती जात, पोटजात वा उपजात आरक्षणाची मागणी करीत असते व प्रसंगी त्यातून हिंसाचारही घडून येत असतो. पण त्यासाठी आजतागायत कोणालाही देशद्रोही म्हणून संबोधले गेलेले नाही. हार्दिक मात्र देशद्रोही ठरवला गेला आहे. त्याची कुणालाही कणव येत नाही. पंतप्रधान गुजरातचे, हार्दिक त्याच राज्यातला तेव्हां परस्पर काट्याने काटा निघत असेल तर कशाला उगाच मध्ये पडा असा विचार करुन एकाही पक्षाला वा नेत्याला हार्दिकचा कळवळा येत नसेल तर मग कोणीही समानतेचा व समान दृष्टीकोनाचा दावा करु नये हेच बरे. पुन्हा हा प्रश्न जर-तरचा नाही. हार्दिकचे आंदोलन धगधगत होते तेव्हांच बिहारच्या निवडणुकीचे वातावरणही तप्त होत होते आणि नितीश-लालू आदिंनी हार्दिकला त्यांचा हार्दिक पाठिंबा जाहीर केला होता!