शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

ज्योतिर्मातंड शरदराव

By admin | Updated: May 6, 2015 05:27 IST

कुठलाही छंद सामान्यत: स्वत:च्या जिवाच्या करमणुकीसाठी जपला जात असल्याने शरदरावांचा राजकीय भविष्यवाणी वर्तवित राहण्याचा छंददेखील बहुधा ‘स्वान्त सुखाय’ याच श्रेणीतला असणार.

शरदश्चन्द्र पवार कट्टर बुद्धिप्रामाण्य आणि निरीश्वरवादी असल्याचे ऐकिवात आहे. आता एव्हढी मोठी बिरुदे धारण करणारी व्यक्ती फलज्योतिष किंवा भविष्य यासारख्या अशास्त्रीय गोष्टीवर विश्वास ठेवणारी असू शकेल, याची सुतराम शक्यता नाही. पण तरीही अधूनमधून राजकीय भविष्यवाणी वर्तविण्याचा त्यांना छंद असावा, असे अधूनमधून प्रत्ययास येत असते. कुठलाही छंद सामान्यत: स्वत:च्या जिवाच्या करमणुकीसाठी जपला जात असल्याने शरदरावांचा राजकीय भविष्यवाणी वर्तवित राहण्याचा छंददेखील बहुधा ‘स्वान्त सुखाय’ याच श्रेणीतला असणार. पण तरीही आणि अजून तरी शरदराव काहीही बोलले आणि त्याची बातमी झाली व बातमीची लगेचच खळबळ झाली, असे घडत असते. अर्थात माध्यमांनाही अशी खाद्ये लागतच असतात. सबब मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचा काडीमोड होईल व त्याचा परिणाम राज्यावर होऊन राज्याला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागेल, या त्यांच्या ताज्या भविष्यवाणीने माध्यमांना खाद्य व खळबळीला एक चांगले निमित्त मिळून गेले. शरदराव प्राय: महाराष्ट्राचे भारतीय नेते असल्याने महाराष्ट्रात दोन राजकीय कडबोळी अस्तित्वात आहेत, हे ते जाणून असणारच. या कडबोळ्यांमध्ये ती तयार होण्याआधी आणि नंतरदेखील कधीही एकजिनसीपणा नव्हता व तो यापुढेही येण्याची तशी शक्यता नाही. तरीही विश्वभरात सत्तेच्या गोंदाइतका चिकट गोंद अन्य कुठलाही नसल्याने ही कडबोळी तुटत नाहीत. बहुधा रबर तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे व्यवहारज्ञान उभयतांपाशी ओतप्रोत असावे. काँग्रेसची आघाडी असो की भाजपा-सेनेची युती असो, त्यांच्यात आता घटस्फोट होणे अगदी अटळ, असे भासण्याजोगे अनेक प्रसंग याआधी येऊन गेले. फार लांब कशाला, औरंगाबाद महापालिकेच्या अलीकडच्या निवडणुकीतही युती भंगणार म्हणून अनेकजण अगदी खात्रीपूर्वक सांगत होते. पण अखेरच्या क्षणी त्यांनी जमवून घेतले, कारण तोच तो सत्तेचा गोंद. त्यामुळे पवारांना अशा गोंदाचे मोल इतरांनी समजावून सांगावे, अशातली बाब नाही. मग तरीही त्यांनी अशी भविष्यवाणी का वर्तवावी बरे? कारण साधे आहे. पवार गेल्या काही दिवसांपासून केन्द्रात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस यांच्या सरकारांच्या बाबतीत अंमळ अधिकच कनवाळू झालेले दिसून येतात. दोघांची सरकारे टिकून राहावीत असे त्यांना मनोमन वाटत असते व त्यासाठीच फडणवीस सरकारला टेकू देण्याची उतावीळ ते दाखवित असतात. परिणामी सेनेद्वारा या सरकारची केली जाणारी डोकेदुखी त्यांना अस्वस्थ करीत असावी. आपल्या पोटच्या दोन पोरांमधली सततची हाणामारी बघून कनवाळू आई लटक्या रागाने त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देते किंवा त्यांना वेगळे करण्याचा दम भरते. या दोन्ही गोष्टी तिला मनापासून करायच्या नसतात. केवळ त्यांना भानावर आणायचे असते. त्याच भूमिकेतून पवारांनी त्यांच्या मनातील कनवाळूपणा अंमळ वेगळ्या शब्दात व्यक्त केला इतकाच याचा अर्थ. त्यात खळबळ माजण्या वा माजवण्यासारखे काय आहे?

------------------------------------------------

स्फोटक शिफारसअन्य मागासवर्गीयांना देय सवलतींकरिता वार्षिक उत्पन्नाचा सहा लाखांचा सध्याचा अडसर उंचावून तो वार्षिक साडेदहा लाख करण्यात यावा, अशी शिफारस मागासवर्गीयांसाठी कार्यरत आयोगाने केन्द्र सरकारकडे केली असून, ही शिफारस जशी मोदी सरकारच्या अडचणीत भर टाकणारी ठरू शकते, तशीच ती स्फोटकदेखील ठरू शकते. जन्माने अन्य मागासवर्गीय, पण उत्पन्नदृष्ट्या सधन लोकच सवलतींचा लाभ घेतात आणि वंचित तसेच वंचित राहतात, या निरीक्षणानंतर सरकारने मलई स्तर म्हणजे क्रीमी लेअरची संकल्पना चलनात आणली. या संकल्पनेनुसार ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, त्यांना सवलत नाकारली जाईल, असा दंडक रुजू झाला. आता हीच मर्यादा वाढवावी, अशी शिफारस आहे. याचा अर्थ ज्या पालकांचे उत्पन्न मासिक सुमारे साडेसत्त्याऐंशी हजार रुपयांपर्यंत असेल अशांच्या पाल्यांंनाही शिक्षणात आणि सरकारी नोकरीत सवलतीचा लाभ देय असेल. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी आपले सरकार सर्व ते प्रयत्न करील, हा मोदी सरकारचा वायदा असल्याने सरकारने ही शिफारस मान्य केली तर मुळात आरक्षणाच्या संदर्भात जो विरोध व्यक्त केला जात असतो, त्याची धार अधिकच वाढू शकते. वास्तविक पाहता, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जे आरक्षण आहे, त्याचा लाभ मुख्यत्वेकरून संबंधित जाती-जमातींमधील सधन बनलेले लोकच घेत असतात आणि जे जन्माने तर दुर्बल आहेतच पण सांपत्तिकदृष्ट्याही दुर्बल आहेत, ते तसेच राहतात म्हणून तिथेही मलई स्तरासारखी रचना अस्तित्वात आणावी म्हणून एक जनहित याचिका मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. परंतु हा निर्णय सर्वस्वी संसदेच्या आधीन असल्याने न्यायालयाने त्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप करण्याचे नाकारले होते. अन्य मागासांच्या सवलतींबाबत तसी अडचण नसल्याने नव्या न्यायिक लढाईची बीजेही या शिफारसीत आहेत.