शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

विधान परिषदांचे औचित्य संपुष्टात?

By रवी टाले | Updated: May 28, 2018 01:19 IST

विधान परिषदांचे एकूणच औचित्य अन् उपयोगितेबद्दल नव्याने चर्चा सुरू व्हायला हवी.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. निवडणूक म्हटली, की कुणी तरी जिंकणार अन् कुणी तरी पराभूत होणार; पण या निवडणुकीत हमखास विजय झाला तो धनशक्तीचा! गत काही दशकांपासून विधान परिषद निवडणुकीत लक्ष्मीदर्शनास अपरंपार महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रारंभी ते लपूनछपून चालायचे; मात्र अलीकडे त्यामध्ये कुणालाही काहीही वावगे वाटत नाही. यावेळीही धनशक्तीचा खेळ खुलेआम खेळला गेला आणि त्यामुळेच काही निकाल धक्कादायक लागले. पक्षीय बलाबलाच्या विपरीत निकाल लागल्याने त्यास धक्कादायक संबोधायचे एवढेच; अन्यथा धनशक्तीच्या प्रभावामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होणार, याची पूर्वकल्पना राजकारणाशी काडीचाही संबंध नसलेल्यांनाही होतीच!वास्तविकत: घटनाकारांनी ज्येष्ठांचे सभागृह म्हणून विधान परिषदेची कल्पना केली होती. निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग असावा, जे जनतेतून थेट निवडून येऊ शकत नाहीत असे विभिन्न क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांना कायदेमंडळात प्रवेश मिळावा, हा विधान परिषदेच्या गठनामागील हेतू होता. दुर्दैवाने त्याला कधीच हरताळ फासला गेला आहे.या पाशर््वभूमीवर, विधान परिषदांचे एकूणच औचित्य अन् उपयोगितेबद्दल नव्याने चर्चा सुरू व्हायला हवी. देशातील एकूण २९ राज्यांपैकी केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू-काश्मीर या सातच राज्यांमध्ये सध्या विधान परिषदा अस्तित्वात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममध्ये विधान परिषदेच्या गठनास हिरवी झेंडी दिली आहे. राजस्थान व ओरिसाही विधान परिषदेची तयारी करीत आहेत.तामिळनाडूत पुन्हा एकदा विधान परिषदेचे गठन करण्याचा कायदा संसदेने २०१० मध्येच मंजूर केला होता; मात्र अद्यापही ती विधान परिषद अस्तित्वात आलेली नाही. पंजाबमध्येही माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी विधान परिषदेच्या पुनरुज्जीवनाचा मनोदय व्यक्त केला होता; मात्र ते होऊ शकले नाही. दुसरीकडे २००७ मध्ये विधान परिषदेचे पुनरुज्जीवन केलेल्या आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास विधान परिषद पुन्हा भंग करण्याचा मनोदय तेलुगू देसम पक्षाने व्यक्त केला होता. अद्याप तरी त्या पक्षाने तसे काही केलेले नाही.थोडक्यात, विधान परिषदांच्या आवश्यकतेसंदर्भात एकवाक्यता दिसत नाही. तसे नसते तर एकूण २९ राज्यांपैकी केवळ सातच राज्यांमध्ये ते सभागृह अस्तित्वात नसते आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये त्या सभागृहाच्या पुनरुज्जीवनावरून राजकीय वितंडवाद झाला नसता. दुसरी गोष्ट म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओरिसा यांसारख्या अनेक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नसल्याने त्या राज्यांचे काही अडले अशातलाही भाग नाही. तशीही घटनाकारांना अभिप्रेत असलेली ज्येष्ठांचे सभागृह ही विधान परिषदांची ओळख कधीच पुसल्या गेली आहे. मग केवळ धनदांडग्यांची राजकारणातील सोय, अशी नवी ओळख निर्माण झालेल्या विधान परिषदा हव्या तरी कशाला?- रवी टाले

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदnewsबातम्या