शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवाचे औचित्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:25 IST

भारताची कृषी संस्कृती फार प्राचीन आहे. अनुभवातून निर्माण झालेले कृषिविषयक ज्ञान परंपरागतरीत्या एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होत गेले.

भारताची कृषी संस्कृती फार प्राचीन आहे. अनुभवातून निर्माण झालेले कृषिविषयक ज्ञान परंपरागतरीत्या एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होत गेले. पिढी दर पिढीगणिक ते अधिकाधिक समृद्ध होत गेले. परिणामी भारतीय कृषी क्षेत्रही खूप समृद्ध झाले. त्यामुळेच अगदी गत शतकाच्या प्रारंभापर्यंत, भारतात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ हा विचार प्रबळ होता. पुढे निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला, लोकसंख्यावाढीमुळे शेतीचे छोटे तुकडे होऊ लागले, पाश्चात्त्य देशांमध्ये तेथील परिस्थितीनुरूप विकसित झालेले तंत्रज्ञान थोपल्याने पारंपरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि पावसावर अवलंबून असलेली शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरू लागली. उत्पादन अन् उत्पन्नाचे गणित हुकले आणि शेतकºयांचा कर्जबाजारीपणा वाढू लागला. त्यावर मात करण्यासाठी देशात कृषी विद्यापीठे सुरू झाली, तिथे संशोधन होऊ लागले, नवनवे वाण शोधल्या जाऊ लागले, शेतीपयोगी अवजारे वाढली. हे सर्व ज्ञान, तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवनवीन व्यवस्था निर्माण झाल्या. कृषी महोत्सव हा त्याच व्यवस्थेचा एक भाग! राज्यात आजवर कृषी महोत्सव प्रामुख्याने कृषी विद्यापीठांच्या पातळीवरच होत असत. विद्यापीठांची भौगोलिक कार्यक्षेत्रे मोठी असल्याने सर्वच शेतकरी अशा महोत्सवापर्यंत पोहचू शकत नव्हते. ही बाब हेरून आता राज्य शासनाने कृषी महोत्सव जिल्हा पातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पातळीवरील राज्यातील पहिला कृषी महोत्सव नुकताच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पार पडला. या महोत्सवात विविध शासकीय व निमशासकीय संस्था, खासगी कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी कंपन्या, बचत गट यांची तब्बल ४०० दालने होती. विविध निविष्ठांसंदर्भातील माहितीसोबतच, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेण्याची संधी या निमित्ताने शेतकºयांना मिळाली. शेती प्रक्रिया उद्योग व जलव्यवस्थापन, यावर अशा महोत्सवातून भर दिला जाणार असल्याने शेतीविषयक साक्षरता वाढविण्यास मोलाची मदत होणार आहे. आपल्यासारखाच पाच-दहा एकराचा मालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेतो, ही अनुभूती पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसाठी नवी उमेद देणारी ठरणार आहे. यापुढे नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती केली तरच, ‘समृद्ध शेती व उन्नत शेतकरी’ हा संकल्प प्रत्यक्षात येईल. त्यासाठी असे महोत्सव निश्चितपणे उपयुक्त आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी शेतकºयाला केंद्रस्थानी ठेवूनच झाली पाहिजे. महोत्सवाचा ‘इव्हेंट’ होता कामा नये!