शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

फक्त गुरगुरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:18 IST

जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली.

जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली. त्यांची ही डरकाळी असेल तर प्रश्न येतो की, त्यात रावेरची जागा जिंकण्याचा निर्धार का नाही? लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे. शिवसेनेचे एक आमदार त्या मतदारसंघातील आहेत. तरी जिंकण्याचा विश्वास त्यांना का वाटत नाही, हा गहन प्रश्न आहे. त्यामुळे ही डरकाळी नव्हे तर केवळ गुरगुरणे होते, असाच याचा अर्थ काढावा लागेल. शिवसेनेच्या मुख्यालयातून डरकाळी फुटली, की त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण महाराष्टÑभर उमटतात, असा शिवसैनिकांचा समज आहे. आता संपर्कप्रमुख नियुक्त झाले असल्याने ते आपल्या मतदारसंघात जाऊन बैठका, आढावा घेतात. जळगावात संजय सावंत आले आणि त्यांच्या उपस्थितीत गुलाबरावांनी ‘शिवतीर्था’सारखे जोरदार भाषण केले. सावंत आणि जळगावातील संभाव्य उमेदवार आर.ओ.पाटील हे उपस्थित असल्याने त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. रावेरचे संपर्कप्रमुख विलास पारकर हजर नसल्याने त्यांनी तेथील संघटनस्थितीविषयी फारसे उत्साहवर्धक वक्तव्य केले नाही. आता संपूर्ण जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण, किशोर पाटील हे पाचोरा तर चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असताना सेनेने या तीन जागा राखल्या. हे तिन्ही मतदारसंघ पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्यूल्यानुसार सेनेकडेच होते. तिन्ही ठिकाणी सेनेचे उमेदवार यापूर्वी निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षसंघटन, गावपातळीवर पोहोचलेले काम, सहकारी व ग्रामपातळीवरील संस्थांवर असलेले वर्चस्व याचा लाभ सेनेला झाला. पण उर्वरित ७ मतदारसंघात सेनेला यश मिळालेले नाही. चिमणराव पाटील (पारोळा) व चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांनी चांगली लढत दिली. ही पार्श्वभूमी असताना लोकसभा निवडणुकीत यशाचे गणित कोणत्या आधारावर मांडले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. युतीचे राजकारण सुरु झाल्यापासून सेनेने जळगाव व रावेर या दोन्ही जागा कधी लढलेल्या नाहीत. हे नजरेआड करुन चालणार नाही. खान्देशातील धुळे आणि नंदुरबारची स्थिती फार वेगळी राहणार नाही. बबनराव थोरात आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री व धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न असले तरी दोन्ही मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुकीला सक्षम उमेदवार मिळविण्यापासून सेनेला तयारी करावी लागत आहे. ऐनवेळी उमेदवाराने नकार देणे, त्याच त्या उमेदवाराला परत तिकीट देणे असे प्रकार घडत असताना जिंकणे-पाडण्याची भाषा करण्यापेक्षा संघटन मजबुतीला सेनेने महत्त्व देणे श्रेयस्कर ठरणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना