शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

फक्त गुरगुरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:18 IST

जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली.

जळगावची जागा आम्ही जिंकणार आणि रावेरची पाडणार, अशी डरकाळी शिवसेनेची मुलूखमैदान तोफ असलेले सहकार राज्यमंत्री, उपनेते गुलाबराव पाटील यांनी फोडली. त्यांची ही डरकाळी असेल तर प्रश्न येतो की, त्यात रावेरची जागा जिंकण्याचा निर्धार का नाही? लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्ष बाकी आहे. शिवसेनेचे एक आमदार त्या मतदारसंघातील आहेत. तरी जिंकण्याचा विश्वास त्यांना का वाटत नाही, हा गहन प्रश्न आहे. त्यामुळे ही डरकाळी नव्हे तर केवळ गुरगुरणे होते, असाच याचा अर्थ काढावा लागेल. शिवसेनेच्या मुख्यालयातून डरकाळी फुटली, की त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण महाराष्टÑभर उमटतात, असा शिवसैनिकांचा समज आहे. आता संपर्कप्रमुख नियुक्त झाले असल्याने ते आपल्या मतदारसंघात जाऊन बैठका, आढावा घेतात. जळगावात संजय सावंत आले आणि त्यांच्या उपस्थितीत गुलाबरावांनी ‘शिवतीर्था’सारखे जोरदार भाषण केले. सावंत आणि जळगावातील संभाव्य उमेदवार आर.ओ.पाटील हे उपस्थित असल्याने त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. रावेरचे संपर्कप्रमुख विलास पारकर हजर नसल्याने त्यांनी तेथील संघटनस्थितीविषयी फारसे उत्साहवर्धक वक्तव्य केले नाही. आता संपूर्ण जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण, किशोर पाटील हे पाचोरा तर चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असताना सेनेने या तीन जागा राखल्या. हे तिन्ही मतदारसंघ पूर्वीच्या युतीच्या फॉर्म्यूल्यानुसार सेनेकडेच होते. तिन्ही ठिकाणी सेनेचे उमेदवार यापूर्वी निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षसंघटन, गावपातळीवर पोहोचलेले काम, सहकारी व ग्रामपातळीवरील संस्थांवर असलेले वर्चस्व याचा लाभ सेनेला झाला. पण उर्वरित ७ मतदारसंघात सेनेला यश मिळालेले नाही. चिमणराव पाटील (पारोळा) व चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांनी चांगली लढत दिली. ही पार्श्वभूमी असताना लोकसभा निवडणुकीत यशाचे गणित कोणत्या आधारावर मांडले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. युतीचे राजकारण सुरु झाल्यापासून सेनेने जळगाव व रावेर या दोन्ही जागा कधी लढलेल्या नाहीत. हे नजरेआड करुन चालणार नाही. खान्देशातील धुळे आणि नंदुरबारची स्थिती फार वेगळी राहणार नाही. बबनराव थोरात आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री व धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न असले तरी दोन्ही मतदारसंघात पक्षसंघटन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुकीला सक्षम उमेदवार मिळविण्यापासून सेनेला तयारी करावी लागत आहे. ऐनवेळी उमेदवाराने नकार देणे, त्याच त्या उमेदवाराला परत तिकीट देणे असे प्रकार घडत असताना जिंकणे-पाडण्याची भाषा करण्यापेक्षा संघटन मजबुतीला सेनेने महत्त्व देणे श्रेयस्कर ठरणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना