शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसंस्थेतील बंड

By admin | Updated: February 18, 2016 06:48 IST

बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यातील पोलिसांनी चक्क बंड केले तेव्हां अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता

बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यातील पोलिसांनी चक्क बंड केले तेव्हां अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. पण आता त्याच्याही पलीकडचा प्रकार देश पातळीवर घडून आला असून त्यात मद्रास उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश सी.एस.कर्नन यांनी चक्क त्यांच्याच झालेल्या बदलीस स्थगिती देऊन बंडाचे निशाण हाती धरतानाच देशाच्या सरन्यायाधीशांना उघड आव्हान दिले आहे. केवळ तिथेच न थांबता आपण दलित आहोत म्हणून पहिल्यापासून आपल्याला विषमतेची वागणूक दिली जाते आहे व ज्या देशात जातीभेद पाळला जात नाही, अशा देशात आपण स्थलांतर करण्याच्या विचारात आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या शिफारसीवरुन कर्नन यांची अलीकडेच कोलकाता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. त्यावर त्यांनी आपल्या बदलीच्या आदेशाला आपल्याच न्यायालयात आपणच आव्हान दिले आणि लगेचच त्याला स्थगितीदेखील दिली! न्यायाधीशांची बदली केवळ ‘सार्वजनिक हितासाठीच’ केली जाऊ शकते या सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निवाड्याचा हवाला देऊन आपल्या बदलीमागे कोणते सार्वजनिक हित आहे, याचा खुलासा सरन्यायाधीशांकडे मागितला आहे. त्यांनी मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार अर्ज दाखल करुन आपण दलित असल्याने आपला छळ होत असल्याची तक्रार केली आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण चेन्नईच्या पोलीस आयुक्तास आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या विरोधात दलितविरोधी कारवाई प्रतिबंध कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटीज अ‍ॅक्ट) कारवाई करण्यास बजावणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले आहे. हे सारेच मोठे अभूतपूर्व आहे. गेल्या सात वर्षांपासून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करणारे न्या.कर्नन प्रथमपासूनच मोठे विवाद्य ठरले आहेत. न्यायव्यवस्थेसंबंधीच्या त्यांच्या मनातील तक्रारी वारंवार जनतेसमोर मांडण्याचा प्रघातच त्यांनी सुरु केला. त्यांनी आपल्याच एका सहन्यायाधीशाच्या संदर्भात केलेली एक जाहीर तक्रार तर अक्षरश: पोरकटपणाचीच आहे. मद्रास उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशांना कर्नन यांची भीती वाटते आणि त्यांचे वर्तन पदाला शोभेसे नसल्याने त्यांची अन्यत्र बदली करावी अशी शिफारस दोन वर्षांपूर्वी त्याच न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश आर.के.अगरवाल यांनी केली असता न्या.कर्नन यांनी उलट त्यांच्याच विरोधात हेत्वारोप केले होते. आपल्याकडे जाणीवपूर्वक क्षुल्लक कामे सोपविली जातात अशी तक्रार करुन ते गेल्या नोव्हेंबरमध्ये दीर्घ रजेवरही गेले होते. दलित असण्याने केल्या जाणाऱ्या कथित भेदाभेदाच्या तक्रारी प्रशासनात सर्रास आढळून येतात. पण त्यावर निवाडा सुनावणारी केवळ न्यायव्यवस्थाच नव्हे तर देशाचे सरन्यायाधीशच आज एका न्यायाधीशापायीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले आहेत. हे केवळ गंभीर नव्हे तर भयानक आहे.