शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शिक्षणातील ‘कौशल्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:47 IST

आम्ही विकास आणि रोजगाराच्या कितीही वल्गना करीत असलो तरी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे.

रोजगार हा आजचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आम्ही विकास आणि रोजगाराच्या कितीही वल्गना करीत असलो तरी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे. केंद्र असो वा राज्य सरकार रोजगार वाढीच्या दिशेने फारसे काही करू शकलेले नाही हे त्यामागील मुख्य कारण समजले जात असले तरी रोजगारक्षम कौशल्याचा अभावसुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. जगातील एका नामवंत कंपनीने केलेल्या व्यापक सर्वेक्षणात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे वास्तव समोर आले होते. भारताचा विचार केल्यास ४८ टक्के कंपन्यांना ही अडचण जाणवते आहे. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर स्कील डेव्हलपमेंटचा अहवालही अत्यंत बोलका आहे. आपल्या देशातील शिक्षित बेरोजगारांपैकी ३४ टक्के बेरोजगार हे रोजगारास पात्रच नसतात, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. ही परिस्थिती बदलत बेरोजगारीच्या समस्येवर मात करायची असेल तर रोजगाराभिमुख कौशल्याधारित शिक्षण चांगला पर्याय ठरू शकतो. त्या अनुषंगाने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नागपुरात बोलताना विद्यापीठांना दिलेला सल्ला मोलाचा आहे. स्थानिक तरुणांना लाभदायी ठरतील असे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार केले पाहिजेत, असे मत मांडतानाच वर्षानुवर्ष विद्यापीठांमधील अभ्यासक्रम अद्ययावत होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज आपली विद्यापीठे म्हणजे पदवीधर बेकारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पदवीधर तर होतात पण त्यांना रोजगार मिळत नाहीत. कुठल्याही क्षेत्राचा विकास होत असताना तेथील लोकांना नोकºयांच्या संधी मिळायला हव्यात आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तातडीने अभ्यासक्रम बदलले पाहिजेत. आनंदाची बाब अशी की त्यांच्या या आवाहनाला नागपूर विद्यापीठाने लागलीच प्रतिसाद देत १०० नवीन अभ्यासक्रमांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. विशेष म्हणजे मनुष्यबळ पुरविण्याकरिता विद्यापीठातर्फे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेतले जाणार आहे. भंडाºयात तांदूळ प्रक्रिया, गोंदियात वन्यजीव संवर्धन, वर्धेत खादी उद्योगासाठी पाठ्यक्रम सरू करण्याची विद्यापीठाची योजना स्वागतार्ह आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी समजली जाते. या अनुषंगाने येथील महाविद्यालयांमध्ये व्याघ्र पर्यटन, वन्यजीव व्यवस्थापन यावरील अभ्यासक्रम असतील. मंत्रिमहोदयांनी केलेले आवाहन आणि विद्यापीठाने त्याला दिलेला प्रतिसाद बघता येणाºया काही वर्षात विदर्भातील चित्र वेगळे असेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. पण हा केवळ फार्स ठरू नये. एरवी विदर्भात अनेक उद्योग खेचून आणल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात काय? बुटीबोरीतील कारखाने बंद आहेत. मिहानमध्ये १०२ कंपन्यांना जागा देण्यात आली होती. मात्र केवळ ३५ कंपन्या सुरू झाल्या. त्यातही काही बंद पडल्या. सत्ताधाºयांनी याकडेही लक्ष द्यावे.

टॅग्स :jobनोकरी