शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

शिक्षणातील ‘कौशल्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:47 IST

आम्ही विकास आणि रोजगाराच्या कितीही वल्गना करीत असलो तरी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे.

रोजगार हा आजचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आम्ही विकास आणि रोजगाराच्या कितीही वल्गना करीत असलो तरी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे. केंद्र असो वा राज्य सरकार रोजगार वाढीच्या दिशेने फारसे काही करू शकलेले नाही हे त्यामागील मुख्य कारण समजले जात असले तरी रोजगारक्षम कौशल्याचा अभावसुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. जगातील एका नामवंत कंपनीने केलेल्या व्यापक सर्वेक्षणात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे वास्तव समोर आले होते. भारताचा विचार केल्यास ४८ टक्के कंपन्यांना ही अडचण जाणवते आहे. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर स्कील डेव्हलपमेंटचा अहवालही अत्यंत बोलका आहे. आपल्या देशातील शिक्षित बेरोजगारांपैकी ३४ टक्के बेरोजगार हे रोजगारास पात्रच नसतात, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे. ही परिस्थिती बदलत बेरोजगारीच्या समस्येवर मात करायची असेल तर रोजगाराभिमुख कौशल्याधारित शिक्षण चांगला पर्याय ठरू शकतो. त्या अनुषंगाने राज्याचे उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नागपुरात बोलताना विद्यापीठांना दिलेला सल्ला मोलाचा आहे. स्थानिक तरुणांना लाभदायी ठरतील असे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार केले पाहिजेत, असे मत मांडतानाच वर्षानुवर्ष विद्यापीठांमधील अभ्यासक्रम अद्ययावत होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आज आपली विद्यापीठे म्हणजे पदवीधर बेकारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पदवीधर तर होतात पण त्यांना रोजगार मिळत नाहीत. कुठल्याही क्षेत्राचा विकास होत असताना तेथील लोकांना नोकºयांच्या संधी मिळायला हव्यात आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तातडीने अभ्यासक्रम बदलले पाहिजेत. आनंदाची बाब अशी की त्यांच्या या आवाहनाला नागपूर विद्यापीठाने लागलीच प्रतिसाद देत १०० नवीन अभ्यासक्रमांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. विशेष म्हणजे मनुष्यबळ पुरविण्याकरिता विद्यापीठातर्फे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेतले जाणार आहे. भंडाºयात तांदूळ प्रक्रिया, गोंदियात वन्यजीव संवर्धन, वर्धेत खादी उद्योगासाठी पाठ्यक्रम सरू करण्याची विद्यापीठाची योजना स्वागतार्ह आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी समजली जाते. या अनुषंगाने येथील महाविद्यालयांमध्ये व्याघ्र पर्यटन, वन्यजीव व्यवस्थापन यावरील अभ्यासक्रम असतील. मंत्रिमहोदयांनी केलेले आवाहन आणि विद्यापीठाने त्याला दिलेला प्रतिसाद बघता येणाºया काही वर्षात विदर्भातील चित्र वेगळे असेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. पण हा केवळ फार्स ठरू नये. एरवी विदर्भात अनेक उद्योग खेचून आणल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात काय? बुटीबोरीतील कारखाने बंद आहेत. मिहानमध्ये १०२ कंपन्यांना जागा देण्यात आली होती. मात्र केवळ ३५ कंपन्या सुरू झाल्या. त्यातही काही बंद पडल्या. सत्ताधाºयांनी याकडेही लक्ष द्यावे.

टॅग्स :jobनोकरी