शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

जय हो प्रभादेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 04:32 IST

नावात काय आहे? असे कितीही वेळा म्हटले तरी, नावातच सर्वकाही आहे

नावात काय आहे? असे कितीही वेळा म्हटले तरी, नावातच सर्वकाही आहे, याची प्रचिती नेहमीच येत असते़ नावाला इतिहास चिकटून येतो़ त्यामुळे नाममाहात्माला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे़ आपण मराठी माणसे इतरांना नावे ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलो, तरी विशिष्ट नावाच्या आग्रहासाठी आपण आंदोलने, मोर्चेही काढतो़ आजपासून आणखी एक नामांतर मुंबईकरांच्या वाट्याला आले आहे़ तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचे रेल्वे स्थानक असलेल्या ‘एल्फिन्स्टन रोड’चे ‘प्रभादेवी’ असे नामकरण करण्यात आले आहे़ इंग्रजांच्या राजवटीत १८५३ ते १८६० या काळात गव्हर्नरपदी असलेल्या एल्फिन्स्टन यांचे नाव १८६७ साली बनलेल्या रेल्वे स्थानकाला देण्यात आले होते़ या स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी १९९०मध्ये शिवसेनेने केली होती़ ती पूर्ण होण्यास २८ वर्षांचा कालावधी जावा लागला़ प्रभादेवीचा इतिहास १२व्या शतकातला आहे़ काळानुसार परिसर बदलत गेला तरी प्रभादेवीची ओळख मात्र कायम राहिली़ काही महिन्यांपूर्वी ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानक गाजले ते येथे घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे़ तब्बल २३ जणांना प्राण गमवावे लागले होते़ त्यानंतर लष्कराच्या मदतीने नवा पूल तयार करण्यात आला़ मात्र त्यानंतरही शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या या व इतर अनेक रेल्वे स्थानकांवर डागडुजी करून ती तशीच सुरू ठेवण्यात आली आहेत. ‘प्रभादेवी’ हे नाव देण्यात आले असले तरी येथील पायाभूत सुविधांची चर्चा घडतच राहणार याविषयी दुमत असण्याचे कारण नाही़ इंग्रजांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले पूल आजही तग धरून आहेत; आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतर बांधलेल्या अनेक पुलांची अवस्था खिळखिळी झाली आहे हे़ त्यामुळे नामकरण करण्यासोबतच दर्जेदार सुविधांचाही विचार व्हायला हवा़ खरेतर, नाव बदलून काही फरक पडत नाही, याचीही अनेक उदाहरणे आहेत़ ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’चे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले़ काही आक्षेपानंतर ते ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले़ आता लोक ‘व्हीटी’ऐवजी ‘सीएसटी’ असे संबोधतात़ वांद्रे-वरळी सी लिंकचे नाव ‘स्वर्गीय राजीव गांधी सागरी सेतू’ असे ठेवण्यात आले़ पण तसा उल्लेख होताना दिसत नाही़ मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेला ‘यशवंतराव चव्हाण दु्रतगती महामार्ग’ असे नाव देण्यात आले़ अगदी क्वचित लोकांना याची आता माहिती असेल़ बहुतेक जण ‘एक्स्प्रेस-वे’ असाच उल्लेख करतात़ त्यामुळे नाव बदलून एखाद्या पक्षाला, गटाला खूश करता येते़ त्यापलीकडे फारसा फरक पडत नाही़ आता ‘प्रभादेवी’प्रमाणे ‘चर्नी रोड’चे नाव ‘गावदेवी’, ‘दादर’चे नाव ‘चैत्यभूमी’, ‘ग्रँट रोड’चे नाव ‘आॅगस्ट क्रांती’ करावे, अशी मागण्यांची यादी आहे़ तूर्त नावापेक्षा दर्जेदार सुधारणा आणि सुविधा यांचा गांभीर्याने विचार झाला तर तो लोकांना हवा आहे़ आज लोकांना ऐतिहासिक नावासोबत कर्तृत्वाचा भूगोलही हवा आहे़ नाहीतर लोक बदललेल्या नावालाही नावे ठेवतात हे नक्की़