शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

ते जात्यात, हे सुपात !

By admin | Updated: May 17, 2017 04:32 IST

सत्तेची हाव कधी संपत नाही. सत्ता हाती आली की प्रथम ती स्थिर करण्याचा, पुढे ती कायम करण्याचा आणि पूर्वीचा शब्द वापरायचा तर ती ‘यावश्चंद्र दिवाकरौ’

सत्तेची हाव कधी संपत नाही. सत्ता हाती आली की प्रथम ती स्थिर करण्याचा, पुढे ती कायम करण्याचा आणि पूर्वीचा शब्द वापरायचा तर ती ‘यावश्चंद्र दिवाकरौ’ टिकवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात. आपल्याला विरोध करणारे पराभूत केल्यानंतर त्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यावर त्यांचा भर असतो. सत्तेला विरोध सहन होत नाही आणि तो उघडपणे करणारे तर तिला डोळ्यासमोरही चालत नाहीत. देशात भाजपाला प्रथमच स्वबळावर बहुमत मिळाले आहे. हे बहुमत (३१ टक्क्यांचे) एकमेव मतामध्ये परिवर्तन करण्याचा त्या पक्षाचा आताचा प्रयत्न आहे. दिल्लीत राहून त्यांना डिवचणाऱ्या आप पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचेच त्याने बाकी ठेवले आहे. लालूप्रसादांच्या मागचे सुटलेले झेंगट त्याने पुन्हा त्यांच्या पाठीला लावले आहे. ममता बॅनर्जी त्यांच्या निशाण्यावर आहेत. कर्नाटकच्या सिद्ध रामय्यांवर त्यांनी चौकशा लादल्या आहेत. मुलायमसिंहांना मूक केले आहे. भुजबळांना तुरुंगात डांबून समाधान न झालेल्या त्या पक्षाने एका पवारांवरही बाण रोखून ठेवला आहे. प्रत्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्डच्या गुंत्यात अडकवायला त्याने सुब्रमण्यम स्वामींना मोकळे सोडले आहे. त्यांचा आताचा भर काँग्रेसमधील ज्या नेत्यांची प्रतिमा चांगली व प्रतिष्ठेची आहे आणि ज्यांच्यात सरकारची कुलंगडी बाहेर काढण्याची क्षमता आहे त्यांना जमीनदोस्त करण्यावर आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे कुटुंब याविरुद्ध सरकारी खात्यांनी चालविलेल्या धाडी हा त्याच मालिकेतला ताजा भाग आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या खालोखाल अर्थशास्त्रज्ञ म्हणून नाव व ख्याती मिळविलेले चिदंबरम दर आठवड्याला एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात स्तंभ लिहितात व त्यात सरकारच्या अर्थशास्त्रीय व राजकीय चुकांचा हिशेब मांडतात. त्यांच्या शब्दाला जनतेत वजन आहे. तेवढे वजन एकटे मोदी वगळले तर त्यांच्या सरकारातील एकाही मंत्र्याला अद्याप मिळविता आले नाही. शिवाय चिदंबरम हे देशातले एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि अरुण जेटली वगैरेंशी त्यांचे संबंध मैत्रीचे आहेत. त्यांना नेस्तनाबूत करणे हे सरकारला राजकीयदृष्ट्या त्याचमुळे आवश्यकही वाटत असणार. गेले काही दिवस त्यांच्याविरुद्ध कांगावा करून झाल्यानंतर आता हे धाडसत्र त्यांच्यावर लादले जात आहे. एवढ्यावर हे थांबणारे नाही. प्रियंका गांधींच्या कुटुंबावरही या सरकारचा दात आहे. नितीशकुमार आणि नवीन पटनायक हेही त्याच्या डोळ्यात सलणारे नेते आहेत. या साऱ्यांचा एकेक करून निकाल लावण्याचा सरकारचा डाव साऱ्यांना दिसणारा आहे. मात्र त्यासाठी आपल्यातील स्पर्धा व विरोध काही काळ बाजूला ठेवून एकत्र यायला मन व मेंदू यांचे जे मोकळेपण असावे लागते त्याचा या साऱ्यातच अभाव आहे. मुळात नितीशकुमार व लालूप्रसाद ते मुलायम आणि ममता या साऱ्यांची मानसिकता त्यांनी दीर्घकाळ केलेल्या काँग्रेसविरोधात मुरली आहे. डॉ. लोहियांनी यातील अनेकांच्या मनात काँग्रेस व नेहरू यांचा द्वेष कुटून भरला आहे. लोहियांना जाऊन आता पाच दशके लोटली. नेहरूंच्या पश्चात देशात १३ नेते पंतप्रधानपदावर आले. देश बदलला, त्याचे राजकारण बदलले आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या राजकारणाचे रंगही वेगळे झाले. परंतु नेहरूद्वेषाचे ते विष अजून या मंडळीच्या मनात कायम आहे. त्यापायी त्यांचा सर्वात मोठा व नैसर्गिक म्हणावा असा भाजपा हा शत्रू पक्षही त्यांना जवळचा वाटावा असे त्यांचे आताचे विपरीत राजकारण आहे. ही स्थिती भाजपाच्या राजकारणाला अनुकूल आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची आपली प्रतिज्ञा त्याने कधीचीच जाहीर केली आहे. त्याच्या त्या प्रयत्नात या बारक्या व कधीही चिरडून टाकता येतील अशा प्रादेशिक पक्षांचे व त्यांच्या पुढाऱ्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साहाय्य त्याला मिळत असेल तर ते त्याला स्वागतार्ह वाटणारेही आहे. एक गोष्ट मात्र राजकारणाच्या साध्या अभ्यासकांनी व ते प्रत्यक्ष करणाऱ्यांनीही लक्षात घ्यावी अशी आहे. काँग्रेस पक्ष व त्याचे नेते आज जात्यात असतील तर ते सुपात आहेत. ज्यांना काँग्रेसला जमीनदोस्त करता येते ते या पक्षांचे काही क्षणांत वाटोळे करू शकतात. केजरीवाल, अखिलेश, मुलायम ही त्या राजकारणाची ताजी उदाहरणे आहेत. त्यांनी मणिपूर बहुमतावाचून गिळंकृत केले आणि गोव्यातही ती किमया केली. अरुणाचल हा तशा राजकारणाचा सर्वात काळा म्हणावा असा डाग आहे. सारा देश संघमय करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नाआड येणारे सारेच उद्या असे भरडून निघणार आहेत. हे सारे प्रत्यक्ष दिसत असतानाही देशातील प्रादेशिक व अन्य पक्षांच्या पुढाऱ्यांना एकत्र येण्याची बुद्धी होत नसेल तर त्यांचा शेवट जवळ आहे एवढेच येथे बजावायचे. त्यांच्या आपसातील दुराव्यांना आणि क्षुद्र भांडणांना जनताही गेल्या तीन वर्षात कंटाळली आहे एवढे तरी त्यांनी लक्षात घ्यायचे की नाही? राजकारण हा केवळ शक्तीच्या स्पर्धेचा व त्यातील विजयाचाच खेळ नाही. तो उभे राहण्याचा व त्यासाठी लागणारी क्षमता टिकवून ती वाढवीत नेण्याचाही खेळ आहे हे ज्यांना कळत नाही त्यांना पुढारी तरी कसे म्हणायचे असते? आपल्या शेवटाला निमंत्रण देण्याचे या पक्षांचे डोहाळे त्यांचा जीव घेणारे आहेत एवढे तरी त्यांना समजावे की नाही?