शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

ही तर कुरापतच !

By admin | Updated: July 5, 2016 03:42 IST

भारतीय राज्यघटनेने जी स्वातंत्र्ये, अधिकार वा हक्क दिले आहेत, त्यांचा सत्तेच्या राजकारणासाठी विधिनिषेधशून्यरीत्या गैरवापर करण्याकडील कल गेल्या काही वर्षांत वाढत चालल्याने

भारतीय राज्यघटनेने जी स्वातंत्र्ये, अधिकार वा हक्क दिले आहेत, त्यांचा सत्तेच्या राजकारणासाठी विधिनिषेधशून्यरीत्या गैरवापर करण्याकडील कल गेल्या काही वर्षांत वाढत चालल्याने आधीच स्फोटक बनलेल्या सामाजिक परिस्थितीत भर पडण्याचा धोका अशा राजकारणामुळे कसा वाढू शकतो, हे दर्शवणारी दोन ताजी उदाहरणे पुढे आली आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ या पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यानी केलेले ताजे वक्तव्य आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या ‘ख्रिस्ताचे हिंदुत्व’ या पुस्तकावरून उद्भवलेला वाद. गेल्या आठवड्यात ‘राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण संघटनेने (एनआयए) ‘इसिस’चे दहशतवादी असल्याच्या संशयावरून हैदराबादेत काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आणि इतरांची अजून चौकशी सुरू आहे. ज्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत पुरविण्यात येईल, असे ओवेसी यांनी जे जाहीर केले आहे, त्याला भाजपाने आक्षेप घेऊन ओवेसी यांची घोषणा ते ‘देशद्रोही’ असल्याची ग्वाही देते, तेव्हा ‘एनआयए’ने त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वरकरणी, ओवेसी यांची ग्वाही आक्षेपार्ह वाटू शकत नाही. जिथे सरकारने स्वत: २६/११च्या हल्ल्यातील आरोपी कसाब यालाही वकील पुरवला, तिथे ‘एनआयए’ने अटक केलेल्या तरुणांना कायदेशीर मदत देण्यात आक्षेपार्ह काय आणि तो ‘देशद्रोह’ कसा काय ठरतो? पण ओवेसी यांची ग्वाही तेवढी निर्व्याज व सरळ नाही. ‘भारतात या मुस्लीम तरुणांना न्याय मिळणार नाही, तेव्हा त्यांना मदत करण्याची गरज आहे’, हा ओवेसींचा युक्तिवाद त्यांच्या ग्वाहीत दडलेला आहे. अर्थात ओवेसी अप्रत्यक्षरीत्या करू पाहात असलेल्या या युक्तिवादात तथ्यांश आहे, हेही नाकारता येणार नाही. मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण हे अशा ‘अन्याया’चे ठळक उदाहरण म्हणून मुस्लीम समाज मानतो. त्यामुळेच ओवेसी अशी ग्वाही देतात, तेव्हा त्याचे प्रतिध्विनी मुस्लीम समाजात उमटत असतात. तसे ते उमटत राहावेत, त्यांचा आवाज वाढत जावा, अशीच ओवेसी यांची रणनीती आहे; कारण ‘या हिंदूंच्या देशात मुस्लिमांवर अन्याय होतो’, हीच भूमिका घेऊन ते राजकारण करीत आले आहेत. ‘हा देश हिंदूंचा आहे, हे आमचे म्हणणे मोदी सरकार सत्तेवर आल्याने सिद्ध झाले आहे, म्हणून मी मोदी यांचे अभिनंदन करतो’, असे २०१४ सालच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात भाषण करताना ओवेसी यांनी सांगितले होते. दुसऱ्या बाजूस ओवेसी यांची ही ग्वाही ‘देशद्रोही’ ठरवण्याचा भाजपाचा पवित्राही तेवढाच मतलबी आहे. ‘ओवेसी यांची ही मागणी राजकीय स्वरूपाची आहे, न्यायालयात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक आरोपीला योग्य ती कायदेशीर मदत मिळवून देणे हा न्याययंत्रणेतील न्यायदान प्रक्रियेचा अविभाज्य भाग असल्याने अटक झालेल्या तरुणांना सरकार सर्वतोपरी कायदेशीर मदत देईल’, अशी भूमिका घेऊन भाजपाला ओवेसींंचा प्रतिवाद करता आला असता. पण तसे केल्यास ओवेसींना ‘देशद्रोही’ ठरविता आले नसते. त्यामागे सामाजिक ध्रुवीकरणाचा उद्देश आहे व भाजपाने त्यापायीच वर्षभर ‘देशद्रोह’ हा परवलीचा शब्द बनवला आहे. थोडक्यात ओवेसी व भाजपा या दोघानाही न्यायदानाशी, कायदेशीर प्रक्रियेशी काहीही देणेघेणे नाही. कोणतेही निमित्त शोधून कुरापत काढून सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणणे, हेच या दोघांचेही समान उद्दिष्ट आहे. नेमक्या याच उद्देशाने ‘ख्रिस्ताचे हिंदुत्व’ या बाबाराव सावरकर यांच्या जुन्या व आज कोणाच्या आठवणीत नसलेल्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करून ते बाजारात विक्रीला आणण्याचा खटाटोप करण्यात आला आहे. बाबारावांचे हे पुस्तक बाजारात आहे, तेव्हा ज्यांना ते वाचण्यात रस आहे, ते वाचतील, नाही तर पुस्तकाचे गठ्ठे पडून राहतील, इतकी तटस्थ भूमिका खरे तर घेतली गेली पाहिजे. पण देशात ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा अर्थ एकीकडे ‘स्वैराचार’ व दुसरीकडे ‘गैरवापर’ या दोन टोकांत लावला जात आहे. स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी प्रगल्भ, जागरूक व जबाबदार नागरिकांचा समाज असावा लागतो. तोच देशात नाही. त्यामुळे एखाद्याचे ‘स्वातंत्र्य’ हे दुसऱ्याला अडचणीचे वाटू लागते. मी जे स्वातंत्र्य उपभोगू शकतो, तसेच ते दुसऱ्यालाही उपभोगता आले पाहिजे’, अशा उदार दृष्टिकोनाचाच अभाव असल्याने बाबाराव सावरकर यांच्या पुस्तकाचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात जाऊन पोचले आहे. मात्र हे जुने पुस्तक येत्या फेब्रुवारीत प्रसिद्ध करून बाजारात आणणे, हाही ओवेसी यांच्याप्रमाणेच कुरापत काढण्याचा प्रयत्न आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. राहिला प्रश्न ‘ख्रिस्त हा हिंदूच होता’, या त्या पुस्तकातील आशयाचा. निव्वळ वैचारिक वेडेपणा म्हणूनच तो सोडून द्यायला हवा; कारण अशा बिनबुडाच्या भाकडकथांचा प्रतिवाद करणे म्हणजे त्यांना अधिमान्यता देणे ठरेल..