शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पगार थोडे वाढले खरे... पण महागाईने सारे गिळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 09:48 IST

सर्वात कमी वेतन मिळविणाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवली नाही तर असमानता आणि गरिबी आणखी वाढेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे!

राही भिडे, ज्येष्ठ पत्रकार

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने अलीकडे दोन अहवाल प्रसिद्ध केले आहेत. कोरोनामुळे  लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आशिया खंडात सुमारे २२ कोटी लोक बेरोजगार झाले. दोन वर्षांनंतर अजूनही अनेकांना त्यांचा गमावलेला रोजगार मिळू शकलेला नाही. या अहवालानुसार, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत मासिक वेतनामध्ये ०.९ टक्के घट होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे २१ व्या शतकात वास्तविक वेतनवाढ प्रथमच नकारात्मक पातळीवर घसरली आहे. वास्तविक उत्पादकता वाढ आणि वास्तविक वेतनवाढ यांच्यातील असमानता रुंदावत आहे. या अहवालात महागाई आणि आर्थिक मंदी या दुहेरी संकटाबद्दल सांगितले आहे. मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन बिघडले, की महागाई वाढते. परिणामी, जगभरातील वास्तविक मासिक वेतनात घट झाली आहे. या परिस्थितीसाठी रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक ऊर्जा संकटालाही जबाबदार धरले जात आहे. 

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती रशिया-युक्रेन युद्धामुळे आणखी घसरली. कमी उत्पन्न असलेल्या देशांना याचा विशेष फटका बसला. सर्वात कमी वेतन मिळवणाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवली नाही तर उत्पन्नातील असमानता आणि गरिबी आणखी वाढेल, असा इशाराही या अहवालाने दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन टप्प्यात सरकारांनी काही घोषणा केल्या. पॅकेजेस दिली; परंतु लाखो कोटी रुपयांच्या या पॅकेजेसचा किती फायदा झाला, हा संशोधनाचा भाग ठरतो. 

रोजगार निर्मितीत नवे स्टार्टअप महत्त्वाची भूमिका बजावत असतात; परंतु गेल्या दोन वर्षांत त्यांच्या पर्याप्त भांडवलात ३५ टक्के घट झाली. माल तयार आहे; परंतु उठाव नाही, अशा दुष्टचक्रात बरेच उद्योग अडकले आहेत. लोकांनी हातचे राखून खर्च करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कोणत्याही स्तरावर किमान वेतनात वाढ झाली, तर त्यात महागाई समायोजित केली जात नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, महागाईच्या वाढीनुसार पगार वाढवावा, कारण महागाईनुसार जर त्या व्यक्तीच्या पगारात वाढ झाली नाही, तर पगार वाढूनही खर्च वाढल्याने  उत्पन्नात तशी घटच होत असते. म्हणूनच महागाई वाढण्याची टक्केवारी मोजली पाहिजे आणि त्यानुसार पगार वाढला पाहिजे. 

भारतातील किमान वेतन २००६ मध्ये ४,३९८ रुपये होते, ते २०२१ मध्ये १७,०१७ रुपये प्रति महिना झाले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची ही आकडेवारी आहे. महागाईचा विचार केला असता खरी पगारवाढ २००६ मधील ९.३ टक्क्यांवरून २०२१ मध्ये ०.२ टक्क्यांवर आली आहे. अशाप्रकारे पगारवाढ आणि महागाईची सरासरी काढली असता प्रत्यक्षात  उत्पन्न घटल्याचे दिसून आले.

कोरोनानंतर भारतातही नकारात्मक वाढ दिसून आली, म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था  पुढे सरकत होती, ती घसरायला लागली आहे. कमी उत्पन्न असलेले लोक आणि कुटुंबे सर्वात जास्त प्रभावित होत आहेत, कारण बहुतेक उत्पन्न जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर खर्च केले जाते आणि जीवनावश्यक वस्तू तसेच सेवांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ होते आहे. २०१९ ते २०२१ पर्यंत उच्च-कुशल कामगारांमध्ये सुमारे १.६ टक्के रोजगार वाढ दिसून आली आहे; परंतु कमी आणि मध्यम-कुशल कामगारांमध्ये ही वाढ झालेली नाही. कोरोनामुळे नोकरी गेलेल्या महिलांना त्या नोकरीत पुन्हा सामील होणे कठीण झाले आहे. याशिवाय, लहान व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला की, त्यांचे उत्पन्नही बंद होते. त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करणे कठीण होते. अशा स्थितीत अनेक छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. 

प्रगत देशातील दरडोई उत्पन्न सुमारे चार हजार डॉलर आहे, तर विकसनशील देशांचे दरडोई उत्पन्न दरमहा अठराशे डॉलर आहे. कोरोनाच्या काळात साडेसात ते साडेनऊ कोटी लोक अत्यंत गरिबीत गेले आहेत. गरिबी आणि असमानता टाळण्यासाठी किमान पुरेसे वेतन मिळायला हवे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या राहणीमानाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कामगार वेतनासंबंधीची धोरणे मजबूत करावी लागतील. गरिबी आणि हिंसेची परिस्थिती संपवण्यासाठी प्रयत्न करणे आणि लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळणेही आवश्यक आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inflationमहागाई