शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पगार थोडे वाढले खरे... पण महागाईने सारे गिळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 09:48 IST

सर्वात कमी वेतन मिळविणाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवली नाही तर असमानता आणि गरिबी आणखी वाढेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे!

राही भिडे, ज्येष्ठ पत्रकार

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने अलीकडे दोन अहवाल प्रसिद्ध केले आहेत. कोरोनामुळे  लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आशिया खंडात सुमारे २२ कोटी लोक बेरोजगार झाले. दोन वर्षांनंतर अजूनही अनेकांना त्यांचा गमावलेला रोजगार मिळू शकलेला नाही. या अहवालानुसार, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत मासिक वेतनामध्ये ०.९ टक्के घट होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे २१ व्या शतकात वास्तविक वेतनवाढ प्रथमच नकारात्मक पातळीवर घसरली आहे. वास्तविक उत्पादकता वाढ आणि वास्तविक वेतनवाढ यांच्यातील असमानता रुंदावत आहे. या अहवालात महागाई आणि आर्थिक मंदी या दुहेरी संकटाबद्दल सांगितले आहे. मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन बिघडले, की महागाई वाढते. परिणामी, जगभरातील वास्तविक मासिक वेतनात घट झाली आहे. या परिस्थितीसाठी रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक ऊर्जा संकटालाही जबाबदार धरले जात आहे. 

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती रशिया-युक्रेन युद्धामुळे आणखी घसरली. कमी उत्पन्न असलेल्या देशांना याचा विशेष फटका बसला. सर्वात कमी वेतन मिळवणाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवली नाही तर उत्पन्नातील असमानता आणि गरिबी आणखी वाढेल, असा इशाराही या अहवालाने दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन टप्प्यात सरकारांनी काही घोषणा केल्या. पॅकेजेस दिली; परंतु लाखो कोटी रुपयांच्या या पॅकेजेसचा किती फायदा झाला, हा संशोधनाचा भाग ठरतो. 

रोजगार निर्मितीत नवे स्टार्टअप महत्त्वाची भूमिका बजावत असतात; परंतु गेल्या दोन वर्षांत त्यांच्या पर्याप्त भांडवलात ३५ टक्के घट झाली. माल तयार आहे; परंतु उठाव नाही, अशा दुष्टचक्रात बरेच उद्योग अडकले आहेत. लोकांनी हातचे राखून खर्च करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कोणत्याही स्तरावर किमान वेतनात वाढ झाली, तर त्यात महागाई समायोजित केली जात नाही. या अहवालात असे म्हटले आहे की, महागाईच्या वाढीनुसार पगार वाढवावा, कारण महागाईनुसार जर त्या व्यक्तीच्या पगारात वाढ झाली नाही, तर पगार वाढूनही खर्च वाढल्याने  उत्पन्नात तशी घटच होत असते. म्हणूनच महागाई वाढण्याची टक्केवारी मोजली पाहिजे आणि त्यानुसार पगार वाढला पाहिजे. 

भारतातील किमान वेतन २००६ मध्ये ४,३९८ रुपये होते, ते २०२१ मध्ये १७,०१७ रुपये प्रति महिना झाले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची ही आकडेवारी आहे. महागाईचा विचार केला असता खरी पगारवाढ २००६ मधील ९.३ टक्क्यांवरून २०२१ मध्ये ०.२ टक्क्यांवर आली आहे. अशाप्रकारे पगारवाढ आणि महागाईची सरासरी काढली असता प्रत्यक्षात  उत्पन्न घटल्याचे दिसून आले.

कोरोनानंतर भारतातही नकारात्मक वाढ दिसून आली, म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था  पुढे सरकत होती, ती घसरायला लागली आहे. कमी उत्पन्न असलेले लोक आणि कुटुंबे सर्वात जास्त प्रभावित होत आहेत, कारण बहुतेक उत्पन्न जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर खर्च केले जाते आणि जीवनावश्यक वस्तू तसेच सेवांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ होते आहे. २०१९ ते २०२१ पर्यंत उच्च-कुशल कामगारांमध्ये सुमारे १.६ टक्के रोजगार वाढ दिसून आली आहे; परंतु कमी आणि मध्यम-कुशल कामगारांमध्ये ही वाढ झालेली नाही. कोरोनामुळे नोकरी गेलेल्या महिलांना त्या नोकरीत पुन्हा सामील होणे कठीण झाले आहे. याशिवाय, लहान व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला की, त्यांचे उत्पन्नही बंद होते. त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करणे कठीण होते. अशा स्थितीत अनेक छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. 

प्रगत देशातील दरडोई उत्पन्न सुमारे चार हजार डॉलर आहे, तर विकसनशील देशांचे दरडोई उत्पन्न दरमहा अठराशे डॉलर आहे. कोरोनाच्या काळात साडेसात ते साडेनऊ कोटी लोक अत्यंत गरिबीत गेले आहेत. गरिबी आणि असमानता टाळण्यासाठी किमान पुरेसे वेतन मिळायला हवे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या राहणीमानाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कामगार वेतनासंबंधीची धोरणे मजबूत करावी लागतील. गरिबी आणि हिंसेची परिस्थिती संपवण्यासाठी प्रयत्न करणे आणि लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळणेही आवश्यक आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inflationमहागाई