शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
3
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
4
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
5
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
6
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
7
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
8
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
9
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
10
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
11
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
12
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
13
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
14
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
15
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
16
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
17
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
18
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
19
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
20
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

बालरंगभूमीला उभारी देणं ही आपलीच जबाबदारी आहे, विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:43 IST

पुणे येथे सुरू असलेल्या बालरंगभूमी संमेलनात ख्यातनाम रंगकर्मी प्रतिभा मतकरी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रतिभा मतकरी, ख्यातनाम रंगकर्मी

साठच्या दशकातील बालनाट्य चळवळीच्या तुम्ही साक्षीदार आहात, त्या काळाबद्दल काय सांगाल?

- लहान मुलांची भूमिका असलेलं नाटक म्हणजे बालनाट्य या समजुतीला छेद देण्याचं काम सुधा करमरकर आणि रत्नाकरने केलं. सुधा एका शिष्यवृत्तीच्या निमित्त अमेरिकेला गेली होती. तिथे तिने ज्या प्रकारची बालनाट्यं पाहिली तशी भव्यदिव्य नाटकं मराठी रंगभूमीवर यायला हवीत, असं तिला वाटलं. तिच्यासाठी रत्नाकरने लिहिलेल्या अस्सल भारतीय बाजाच्या ‘मधुमंजिरी’  नाटकाने बालनाट्य रंगभूमीला ऊर्जा दिली.

सुधा करमरकरने सुरू केलेल्या ‘लिट्ल थिएटर’तर्फे मी आणि रत्नाकरने ‘कळलाव्या...’ हे नाटक  केलं. त्यानंतर मात्र मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारं नेपथ्य असणारी, त्यांच्या भावविश्वाचे विषय असणारी नाटक करावीत असं आम्ही ठरवलं. ‘बालनाट्य’ या स्वत:च्या संस्थेतर्फे ‘राजकन्येची सावली हरवली’, ‘भामटे आणि कावळे’ आणि ‘एक होता मुलगा’ या तीन नाटिका बसवल्या. पहिल्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचावेत यासाठी मी  शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून या नाटिकांचे प्रयोग करण्याची परवानगी मिळवली.चिकित्सक, बालमोहन या शाळा आमचे नाट्यप्रयोग करण्यासाठी तयार झाल्या. मुंबईपाठोपाठ आम्ही पुणे, सांगली या शहरात बालनाट्यांचे प्रयोग केले. सुटसुटीत नेपथ्य आणि हॉलच्या भाड्याचा वाचलेला खर्च यामुळे आम्ही केवळ आठ आण्यांत मुलांना नाटकं दाखवू शकलो. त्या दरम्यान आम्ही ‘निम्माशिम्मा राक्षस’ रंगभूमीवर आणलं. ‘गाणारी मैना’, ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘अदृश्य माणूस’, ‘अलबत्या गलबत्या’ ही आम्ही केलेली नाटकं  प्रौढांच्याही पसंतीला उतरली.

एनएसडीमधल्या नाट्य प्रशिक्षणाचा तुमच्या कामात कसा फायदा झाला? 

नाट्यनिर्मितीच्या बहुतेक सर्व बाजू मी आणि रत्नाकरच सांभाळत असू. त्याला प्रशिक्षणाची जोड असावी असं वाटलं. रत्नाकरची बँकेत नोकरी होती, त्यामुळे मग मी  एनएसडीमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यायचं असं ठरवलं.  एनएसडीमध्ये मला नाटक या माध्यमाचा सर्वांगीण अभ्यास करता आला. दिल्लीहून परतल्यावर मी ‘धडपडे-बडबडे आणि मारकुटे मंडळी’ या बालनाट्याचं दिग्दर्शन केलं. वेळ पडेल तेव्हा या नाटकात धडपडे बाईंची भूमिकाही केली. ‘झुकझुकभाऊ इंजिनवाले’ हे नाटक लिहिलं.  राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच दुबई, मस्कत आणि अमेरिकेतही जाऊन नाट्य प्रशिक्षणवर्ग घेतले. ‘कास्प प्लॅन’ या संस्थेत काम करत असताना मला वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या समस्यांची जाणीव झाली. या मुलांना आपलंसं वाटेल असं नाटकाचं कथानक असणं गरजेचं होतं. रत्नाकरने त्यासाठी ‘बूटबैंगण’ हे नाटक लिहून दिलं. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मुलांपेक्षा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या वाट्याला येणार आयुष्य वेगळं असतं. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक चळवळ उभी करण्याचं आम्ही ठरवलं. संजय मंगला गोपाळ, हर्षदा बोरकर ही मंडळी आमच्या सोबतीस आली. आज ठाण्यात ‘वंचितांचा रंगमंच’ ही चळवळ जोमाने उभी राहिली आहे. 

बालरंगभूमीत काळानुरूप होत असलेले कोणते बदल तुम्हाला जाणवतात? 

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, एक उत्तम माणूस म्हणून त्यांचा विकास व्हावा, हा बालरंगभूमीचा उद्देश सध्या हरवताना दिसतो आहे.  अल्पकालीन नाट्यशिबिरं, मुलांना सिरीअल, चित्रपटात भूमिका मिळेल अशी दिली जाणारी खोटी आश्वासनं आणि पालकांच्या(च) उपस्थितीत होणारे नाट्यप्रयोग यामुळे बालरंगभूमीचा दर्जा खालावतो आहे.  बालरंगभूमीच्या माध्यमातून मुलांवर संस्कार व्ह्यावेत, यासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. बालरंगभूमीवर सकस आशयाची नाटकं येणं आणि त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळणं ही काळाची गरज आहे.

मुलाखत : डॉ. संतोष पाठारेsantosh_pathare1@yahoo.co.in

 

टॅग्स :Natakनाटक