शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

हे न्यायकक्षेत येते?

By admin | Updated: November 11, 2016 00:36 IST

एक हजार आणि पाचशे रुपयांचे चलन रद्द करण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून तिची

एक हजार आणि पाचशे रुपयांचे चलन रद्द करण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून तिची सुनावणी करण्यापूर्वी मुळात हा विषय न्यायालयाच्या कक्षेत येतो का, याचाच आधी विचार केला जाण्याची गरज आहे. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला जनहिताच्या दृष्टीने कार्यकारी स्वरुपाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. सरकारने घेतलेला निर्णय घटनेतील तरतुदींशी सुसंगत आहे अथवा नाही याची चिकित्सा करण्याचाच काय तो अधिकार न्यायालयांपाशी सुरक्षित असतो. ज्या वकिलाने प्रस्तुत जनहित याचिका दाखल केली आहे, त्याच्या म्हणण्यानुसार सरकारच्या निर्णयापायी लोकांचा जगण्याचा आणि व्यापार करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. शिवाय सरकारने पूर्वसूचना न देता अचानक निर्णय जाहीर केल्याने लोकांना त्यांच्यापाशी असलेल्या नोटा बदलून घेण्याचा पुरेसा अवधी मिळाला नाही. हे तिन्ही मुद्दे तद्दन तकलादू आहेत. सरकारने यच्चयावत सारेच चलन रद्द केले असते तर कदाचित लोकांवर उपासमारीची वेळ आली असती. तसे झालेले नाही. मोठ्या दर्शनी किंमतीच्या चलनाच्या अभावी व्यापार थबकला असेल पण पूर्ण थांबलेला नाही. अस्तित्वात असलेल्या चलनातच बनवाट चलनाची सरमिसळ झालेली असल्याने आणि अधिकृत चलन काळ्या पेशात रुपांतरित करुन त्याचे साठे दडवून ठेवण्यात आल्याने त्यांना बेसावध ठेवूनच संबंधित निर्णय घेतला जाणे गरजेचे होते. जर पूर्वसूचना दिली गेली असती तर मूळ हेतुलाच धक्का बसला असता. त्यातून ज्यांच्याकडे वैध स्वरुपातील मोठ्या दर्शनी किंमतीचे चलन उपलब्ध आहे, त्यांना ते डिसेंबरअखेर केव्हांही बदलून दिले जाणार आहे व त्यानंतर थेट ३१ मार्चअखेर काही अटीशर्तींवर ते बदलून दिले जाणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याचे तिन्ही मुद्दे अतार्किक आणि असयुक्तिक आहेत. त्यातून महत्वाचा मुद्दा म्हणजे विशिष्ट हेतूने घेतलेला हा कार्यकारी निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर अगोदरच भरमसाठ खटले प्रलंबित असताना जे प्रकरण मुळातच तथ्यहिन आहे, ते दाखल करुन घेण्यामागील तर्कसंगतीच अगम्य आहे. पण यातील अधिक मनोज्ञ बाब म्हणजे अशाच स्वरुपाची याचिका चेन्नई उच्च न्यायालयासमोर दाखल करण्याचा प्रयत्न झाला असता, सरकारचा निर्णय अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून न्यायालयाने ती लगेच फेटाळून लावली आहे.