शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

हे न्यायकक्षेत येते?

By admin | Updated: November 11, 2016 00:36 IST

एक हजार आणि पाचशे रुपयांचे चलन रद्द करण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून तिची

एक हजार आणि पाचशे रुपयांचे चलन रद्द करण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयास आव्हान देणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून तिची सुनावणी करण्यापूर्वी मुळात हा विषय न्यायालयाच्या कक्षेत येतो का, याचाच आधी विचार केला जाण्याची गरज आहे. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला जनहिताच्या दृष्टीने कार्यकारी स्वरुपाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. सरकारने घेतलेला निर्णय घटनेतील तरतुदींशी सुसंगत आहे अथवा नाही याची चिकित्सा करण्याचाच काय तो अधिकार न्यायालयांपाशी सुरक्षित असतो. ज्या वकिलाने प्रस्तुत जनहित याचिका दाखल केली आहे, त्याच्या म्हणण्यानुसार सरकारच्या निर्णयापायी लोकांचा जगण्याचा आणि व्यापार करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. शिवाय सरकारने पूर्वसूचना न देता अचानक निर्णय जाहीर केल्याने लोकांना त्यांच्यापाशी असलेल्या नोटा बदलून घेण्याचा पुरेसा अवधी मिळाला नाही. हे तिन्ही मुद्दे तद्दन तकलादू आहेत. सरकारने यच्चयावत सारेच चलन रद्द केले असते तर कदाचित लोकांवर उपासमारीची वेळ आली असती. तसे झालेले नाही. मोठ्या दर्शनी किंमतीच्या चलनाच्या अभावी व्यापार थबकला असेल पण पूर्ण थांबलेला नाही. अस्तित्वात असलेल्या चलनातच बनवाट चलनाची सरमिसळ झालेली असल्याने आणि अधिकृत चलन काळ्या पेशात रुपांतरित करुन त्याचे साठे दडवून ठेवण्यात आल्याने त्यांना बेसावध ठेवूनच संबंधित निर्णय घेतला जाणे गरजेचे होते. जर पूर्वसूचना दिली गेली असती तर मूळ हेतुलाच धक्का बसला असता. त्यातून ज्यांच्याकडे वैध स्वरुपातील मोठ्या दर्शनी किंमतीचे चलन उपलब्ध आहे, त्यांना ते डिसेंबरअखेर केव्हांही बदलून दिले जाणार आहे व त्यानंतर थेट ३१ मार्चअखेर काही अटीशर्तींवर ते बदलून दिले जाणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याचे तिन्ही मुद्दे अतार्किक आणि असयुक्तिक आहेत. त्यातून महत्वाचा मुद्दा म्हणजे विशिष्ट हेतूने घेतलेला हा कार्यकारी निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर अगोदरच भरमसाठ खटले प्रलंबित असताना जे प्रकरण मुळातच तथ्यहिन आहे, ते दाखल करुन घेण्यामागील तर्कसंगतीच अगम्य आहे. पण यातील अधिक मनोज्ञ बाब म्हणजे अशाच स्वरुपाची याचिका चेन्नई उच्च न्यायालयासमोर दाखल करण्याचा प्रयत्न झाला असता, सरकारचा निर्णय अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून न्यायालयाने ती लगेच फेटाळून लावली आहे.