शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

योजनेच्या पूर्ततेपूर्वीच देखभालीसाठी रडारड

By किरण अग्रवाल | Updated: February 27, 2022 11:36 IST

Issue of maintenance before the plan is completed : स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधी वास्तविकतेचे भान का बाळगत नाहीत, असा प्रश्न उपस्थित व्हावा.

- किरण अग्रवाल

अकोला जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनांच्या देखभालीचा खर्च कुणी करावा यावरून घमासान करण्याऐवजी हा खर्च भरून काढण्यासाठी शासनाकडे डोळे लावण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्याच उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवता येतील यावर चर्चा करता आली असती; पण याही विषयात पक्षीय राजकारणाचेच प्रदर्शन बघावयास मिळाले.

 

पैशाचे सोंग आणता येत नाही, त्यामुळे वास्तविकता व व्यवहार्यता पाहून योग्य निर्णय घेतले नाहीत, तर आहे त्या अडचणीत वाढ होण्याचीच शक्यता असते. प्रस्तावित नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेने जो निर्णय घेतला त्याकडेही याचसंदर्भाने बघता यावे. कारण या संस्थेची आर्थिक नादारी काही लपून राहिलेली नाही.

 अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट व तेल्हारा या तालुक्यांतील विविध गावांसाठीच्या पाच नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे जल जीवन मिशनअंतर्गत पूर्ण करण्यात येत असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेण्यावरून गेल्या सर्वसाधारण सभेत घमासान झाले. प्रश्न पाण्याचा असला तरी या योजनांच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चाला पैसा आणायचा कुठून हा या वादामागील मूळ विषय होता. अखेर मतदान होऊन अटी- शर्तींसह म्हणजे राज्य सरकारकडून खर्च घेण्याच्या तरतुदीने ठराव मंजूर झाला; परंतु या विषयातही अनावश्यकरीत्या नको तितके राजकारण पेटल्याचे दिसून आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधी वास्तविकतेचे भान का बाळगत नाहीत, असा प्रश्न उपस्थित व्हावा.

 

अकोला महापालिकेतील सत्ताधारी माेर्णा नदीचे सौंदर्यीकरण व वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासारख्या विषयात स्वारस्य घेत असताना अकोला जिल्हा परिषदेतील विरोधक पाणीपुरवठा योजनांचा देखभाल खर्च आपल्या माथी ओढवून घेताना दिसले. खरे तर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या या अगोदरच्या सहा योजनांचाच खर्च करताना जिल्हा परिषदेच्या नाकीनऊ येत आहेत. मध्यंतरी त्यामुळे अकोट तेल्हाऱ्याची पाणीपुरवठा योजना बंद पडून तेथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली होती. अशात पुन्हा नव्याने पाच योजनांचा खर्च करायचा, तर त्यासाठी पैसे आणायचे कुठून हा जिल्हा परिषदेपुढील प्रश्न आहे. पाण्यासारख्या मूलभूत विषयावर जबाबदारी झटकून जिल्हा परिषदेला हात वर करता येऊ नयेत हे खरेच; परंतु पैसेच नसतील तर जबाबदारी घेऊन अपश्रेयाचे धनी होण्यात कोण स्वारस्य ठेवणार?

 

जिल्हा परिषद सदस्यांना दरवर्षी मिळणाऱ्या फंडातून काही अत्यावश्यक कामांचा खर्च भागविण्याची वेळ अकोला जिल्हा परिषदेवर आली आहे. सेसच्या फंडातून पाणीपुरवठा खात्यातील कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागत आहेत. कारण उत्पन्न कमालीचे घटले आहे. साध्या पाणीपुरवठ्याचीच वसुली बघितली तर ती अवघी सुमारे सहा टक्के होत आहे; पण ही वसुली करून देण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी भांडताना किंवा प्रयत्न करताना दिसून येत नाही; पण जिल्ह्यातील नवीन योजनांच्या देखभालीचा खर्च शासनाकडून घ्यायचा म्हटला, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य तो भार स्थानिक जिल्हा परिषदेवर टाकू पाहतात, तेव्हा त्यात पक्षीय राजकारण डोकावल्याखेरीज राहत नाही. अखेर त्याच पक्षीय राजकारणातून भाजपाने सत्ताधारी ‘वंचित’ला साथ देत अटी- शर्तींवर ठराव मंजूर करून घेतला.

 

मुद्दा असा की, खर्चाची जबाबदारी कोणी उचलायची यावरून डोकेफोड करताना आर्थिक समस्यांचे भान का बाळगले जात नाही? तिकडे तुलनेने सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काही पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीज देयके शासनाकडून माफ करवून घेतली जात असताना अकोल्याच्या नादार जिल्हा परिषदेतील विरोधकांना येथील योजनांच्या देखभाल खर्चाचा बोजा आपल्यावरच राहू देण्यात राजकीय शहाणपण वाटले असेल, तर ते आत्मघातकीच म्हणायला हवे.

 सारांशात, जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अंतिमतः अकोला जिल्हा परिषदेलाच स्वीकारावी लागणार असली तरी ती निभावण्यासाठीच्या आर्थिक जुळवाजुळवीची व्यवस्थाही उभारायला हवी. योजना स्वीकारली; पण ती चालवता येत नाही, असे व्हायला नको.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना