शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

इस्रायल - हमास युद्धविराम : पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:57 IST

हल्ल्यात १,१९५ इस्रायली व विदेशी नागरिक ठार झाले, तर हमास बंडखोर २५१ जणांना पकडून गाझात घेऊन गेले. त्यानंतर इस्रायली सेनादलांनी गाझापट्टीवर भीषण हल्ले चढविले.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारामुळे गाझा पट्ट्यातील विध्वंसास तात्पुरता विराम मिळाला आहे. कतार, इजिप्त आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी घडवून आणलेला हा युद्धविराम, शेकडो मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संघर्षातील तणाव कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अर्थात, पुढचा मार्ग मात्र आव्हानांनी भरलेला आहे. पूर्व जेरुसलेम आणि अल-अक्सा मशिदीसंदर्भातील वादांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या संघर्षाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नव्याने व्यापक स्वरूप धारण केले. त्या दिवशी हमासच्या सशस्त्र बंडखोरांनी अचानक इस्रायलमध्ये प्रवेश करून इस्रायली नागरिक आणि लष्करी ठिकाणांवर घातक हल्ला चढविला.

हल्ल्यात १,१९५ इस्रायली व विदेशी नागरिक ठार झाले, तर हमास बंडखोर २५१ जणांना पकडून गाझात घेऊन गेले. त्यानंतर इस्रायली सेनादलांनी गाझापट्टीवर भीषण हल्ले चढविले. तेव्हापासून आतापर्यंत हे युद्ध अविरत सुरू होते. इस्रायली हल्ल्यांमध्ये हमासच्या काही कमांडरसह शेकडो बंडखोर ठार झाले. सोबतच गाझापट्टीत महाभयंकर विध्वंस झाला. लाखो पॅलेस्टिनींची घरे नष्ट होऊन त्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला होता. त्यातच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांच्या शपथग्रहण समारंभापूर्वी ओलिसांची सुटका करा; अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असा थेट इशारा हमासला दिला होता. त्याचाही परिणाम झाल्याचे मानण्यास जागा आहे.

कोणाच्याही प्रयत्नांनी किंवा दबावाखाली का होईना, पण युद्धविराम होऊन हमासच्या ताब्यातील ओलिसांची आणि इस्रायलच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होणार, विस्थापितांना त्यांच्या हक्कांच्या जागी परतता येणार, हे महत्त्वाचे आहे. परंतु युद्धविराम टिकवण्यात अनेक आव्हाने आहेत. वर्षानुवर्षांचा परस्पर अविश्वास त्यासाठी कारणीभूत आहे. पॅलेस्टिनींना दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या सवलतीला कमजोरीचे लक्षण मानणाऱ्या कट्टर गटांचा इस्रायल सरकारवरील दबाव हा आणखी एक घटक आहे. दुसरीकडे हमासच्या नेतृत्वाला स्वत:ची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांमधील प्रतिमा राखावी लागेल.

वेगवेगळ्या कारणांस्तव मध्य-पूर्व आशियातील कोणत्याही संघर्षात रस घेणाऱ्या बाह्य घटकांच्या प्रभावामुळेही युद्धविरामास नख लागू शकते. त्यासंदर्भात विशेषतः इराण आणि अमेरिकेचे नाव घ्यावे लागते. हमासला, किंबहुना इस्रायलच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या प्रत्येक घटकाला असलेला इराणचा पाठिंबा जगजाहीर आहे. त्या माध्यमातून मध्य-पूर्व आशिया आणि इस्लामी जगताचे नेतृत्व सौदी अरेबियाकडून हिसकावून घेण्याची इराणच्या नेतृत्वाची मनीषा आहे. या सर्व कारणांमुळे कधीही ठिणगी पडून भडका उडू शकतो. युद्धविराम प्रदीर्घ काळ टिकवायचा असल्यास त्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका महत्त्वाची असेल. सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभाग अत्यंत गरजेचा आहे. अल्पकालीन मानवी मदत महत्त्वाची असली तरी संघर्षाची मुळे हाताळण्यावरही लक्ष केंद्रित करायला हवे.

गाझाची पुनर्बांधणी आणि शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन या दोन बाबी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. गाझात वीज, पाणी आणि आरोग्य या प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य द्यायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इस्रायल आणि हमाससह पॅलेस्टाइनमधील सर्व घटकांदरम्यान शांतता चर्चेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. त्याशिवाय, इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेल्या अरब राष्ट्रांनी पॅलेस्टिनी हक्कांसाठी दबाव आणतानाच, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील अंतर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्याचवेळी, दहशतवादाच्या मार्गाने इस्रायलला झुकवणे शक्य नसल्याची वस्तुस्थिती हमासला मान्य करायला लावून, व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. मूळ समस्या प्रामाणिकपणे, तातडीने हाताळल्या गेल्या नाहीत, तर युद्धविराम केवळ दीर्घकालीन संघर्षातील आणखी एक अल्पकालीन विराम ठरेल. समतोल प्रयत्न आणि सातत्यपूर्ण कृतीमुळेच न्याय्य आणि दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होऊ शकते.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय