शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
4
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
5
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
6
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
7
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
8
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
9
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
10
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
11
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
12
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
13
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
14
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
15
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
16
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
17
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
18
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
19
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
20
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
Daily Top 2Weekly Top 5

इकलाखची हत्त्या ‘धर्माज्ञेनुसार’ ?

By admin | Updated: October 21, 2015 04:13 IST

उत्तर प्रदेशातील दादरीच्या अहमद इकलाखच्या घरी गोमांस दडविले असल्याची फसवी घोषणा करायला काही गुन्हेगारांनी त्या गावच्या पुजाऱ्याला धमकावले आणि त्याने ती मंदिरावरच्या

उत्तर प्रदेशातील दादरीच्या अहमद इकलाखच्या घरी गोमांस दडविले असल्याची फसवी घोषणा करायला काही गुन्हेगारांनी त्या गावच्या पुजाऱ्याला धमकावले आणि त्याने ती मंदिरावरच्या ध्वनीक्षेपकावरून करताच या गुन्हेगारांचा जमाव इकलाखच्या घरावर चालून गेला आणि त्याने इकलाखला दगडांनी ठेचून ठार मारले. हा सारा प्रकार गोमांस दडवून ठेवण्याच्या अफवेतून म्हणजे गैरसमजातून झाला अशी उपरती त्या गुन्हेगारांनी व त्यांच्या पाठिराख्या पक्ष व संघटनांनी जाहीर केली. पण इकलाख मारला गेला तो गेलाच. त्याच्या धर्मबांधवांनी आपले गाव सोडले आणि साऱ्या नोएडा परिसरातच त्यामुळे धार्मिक दहशत कायम झाली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांचे सरकार आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी आहे असे म्हणून संघ वा भाजपाला खुनाच्या या अपराधातून स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. कारण उत्तर प्रदेशातच नव्हे तर साऱ्या देशात सध्या धर्माचे जे उन्मादी वातावरण उभे केले जात आहे आणि त्याला अल्पसंख्यकांविषयीच्या द्वेषाची जोड दिली जात आहे त्या साऱ्यामागे संघ परिवाराशी संबंध असलेल्या संस्था व संघटनाच आहेत हे आता शाळकरी मुलांनाही समजणारे आहे. नेमक्या याच स्थितीत पांचजन्य या संघाच्या मुखपत्राने या साऱ्यावर कडी करीत ‘गोमांस खाणाऱ्याची हत्त्या करण्याची धर्माज्ञा वेदांनीच देऊन ठेवली असल्याचे’ सांगून इकलाखची हत्त्या नुसती वैधच नव्हे तर धार्मिकही आहे असे सांगून टाकले आहे. पांचजन्यच्या या आगाऊपणामुळे मूळचे धास्तावलेले संघ परिवाराचे लोक मागे सरल्याचे व त्याच्या भूमिकेपासून आपण लांब असल्याचे आता सांगू लागले आहेत. वेदांमध्ये आणखी खोलवर गेल्यास त्यात गोमांसाचा व त्याच्या यज्ञादिकातच नव्हे तर धार्मिक सोहळ््यात कसा वापर होत असे तेही आढळणारे आहे. मात्र पांचजन्यने तिकडे दुर्लक्ष करून आपल्याला सोईची ठरतील तेवढीच सूक्ते आधाराला घेतली आहेत. आपली चंबळ नदी ही पूर्वी चर्मण्वती म्हणून ओळखली जायची. तिचे ते नाव कोणा रंतीनाथ नावाच्या राजाने यज्ञात केलेल्या पशुंच्या अगणित हत्त्येतून (म्हणजे त्यांच्या रक्त व मांसातून निर्माण झालेल्या प्रवाहातून) मिळाले ही कथाही आपल्या पुराणात आहे. (पाहा, पं. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोश) पण ती आता उगाळण्यात अर्थ नाही. कारण कधीकाळी लिहिले गेलेले व अपौरुषेय मानले गेलेले आपले वेद आणखीही बरेच काही सांगणारे आहेत. मात्र ते वाचले जात नसल्यामुळेच त्यातली सत्ये वा गृहीते आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. मुळात सगळ््याच प्राचीन धर्मग्रंथात व धर्मांच्या इतिहासात अशा आज्ञा आहेत. रोमने चौथ्या शतकात ‘सगळ््या स्वतंत्र विचारांच्या स्त्रिया चेटकिणी असून त्या मृत्यूदंडास पात्र आहेत’ अशी आज्ञा काढली होती. तर कुराण शरीफ या इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथाने आणि त्यावर लिहिल्या गेलेल्या हदीस या धर्मभाष्याने ‘मुसलमान, ख्रिश्चन व ज्यू हे किताबी ग्रंथांचे पालन करणारे (ज्यांचा धर्मग्रंथ एकच आहे असे) लोक सोडून जगातले बाकीचे सगळेच वध्य असल्याचे’ म्हटले आहे. यातल्या ख्रिश्चनांनी व ज्यूंनी त्यांचे धर्मग्रंथ जुने झाल्यामुळे कुराण शरीफानुसार ते दुरुस्त करून घ्यावे आणि कर देऊन जिवंत राहण्याचा अधिकार प्राप्त करावा अशी सूटच तेवढी त्यांना दिली आहे. बाकी बौद्ध, हिंदू, जैन व अन्य धर्माचे लोक केवळ वध्यच आहेत अशी आज्ञा त्यात केली आहे. पांचजन्यच्या सांगण्यानुसार भारतातील वैदिकांनी वेदातल्या ‘त्या’ आज्ञेचे पालन करायचे तर त्याच न्यायाने जगभरच्या मुसलमानांना कुराण शरीफ व हदीस यांच्या उपरोक्त आज्ञांचे पालन करण्याचाही अधिकार प्राप्त होतो. अल् कायदा, तालिबान किंवा इसीस या धर्मांध संघटनांचे दावे आणि त्यांनी चालविलेल्या अन्य व स्वधर्मीयांच्या कत्तली याहून वेगळ््या नसल्याने त्या धर्माच्या आज्ञेत बसणाऱ्याच आहेत. पांचजन्यवाल्यांना आपल्या हिंदू वैदिकांमध्येही अशी तालिबानी व अल् कायदासारखी खुनी प्रवृत्ती निर्माण करायची आहे काय? त्यातून पांचजन्य हे संघाचे मुखपत्र असून संघ आपल्या भूमिका त्याद्वारे गेली कित्येक दशके मांडत आला आहे. त्यात जे छापून येते ते संघाचे मत असल्याचे संघाचे स्वयंसेवक,पाठीराखे, चाहते व नेतेही आजवर मानत आले. पांचजन्यमध्ये हा लेख प्रकाशीत झाल्यानंतर ‘आम्ही त्या भूमिकेपासून दूर आहोत’ असे या संघटनांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. मात्र तेवढे म्हणणे संघ वा भाजपासाठी पुरेसे नाही. त्या म्हणण्यामागे जो रक्तरंजित विचार उभा आहे त्याबाबतही त्यांनी बोलले पाहिजे व आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पांचजन्य या नियतकालिकाच्या संपादकपदावर एकेकाळी अटलबिहारी वाजपेयींसारखा सोज्वळ व सर्वसमावेशक वृत्तीचा विचारी संपादक राहिला आहे. आताचे त्याचे स्वरुप वाजपेयींच्या नावाला व त्यांनी घडविलेल्या इतिहासाला नुसते खाली आणणारेच नाही तर काळिमा फासणारेही आहे. धर्मातली जुनी वचने वर्तमानाला लागू करण्याचा प्रयत्न हा नुसता सनातनीच नाही तर धर्मांध असल्याचा पुरावा आहे. पांचजन्यसारखे संघाचे मुखपत्र म्हणविणारे नियतकालिक तो प्रयत्न आज करीत असेल तर त्याची शहानिशा अपराधी वृत्तीचा पुरस्कार करणारे पत्र अशीच करणे भाग आहे.