शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नाणारकरिता एक डाव भुतांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:04 IST

पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात.

संदीप प्रधान|

अमावस्येची रात्र होती... कीर्र अंधार काजळासारखा कोपऱ्याकोपºयांत ठासून भरला होता... कौलारू घरं भेदरलेल्या मांजरासारखी चिडीचूप निपचित पडली होती... घरांच्या पडवीतील एकाकी बल्ब मांजराच्या डोळ्यासारखा अंधारात लुकलुकत होता... त्या बल्बभोवती सैरभैर चिलटं जीवाच्या आकांतानं घोंघावत होती... कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज शांततेच्या चिंध्या करत होता... गावाच्या वेशीवरील अवाढव्य पिंपळ अक्राळविक्राळ भासत होता... त्याच्या पानांची सळसळ हृदयात कापरं भरवणारी होती... पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात. हडळ झाडाखाली बसून केसांतील उवा नखानं ठेचून मारत असते. जखिण मानेला आळोखेपिळोखे देत स्वत:शी बोलत व हसत असते. खविस आपलं डोकं झाडाच्या अजस्र बुंध्यावर आपटून घेत असतो. तेवढ्यात, वेताळ तिथं येतो. सारी भुतं वेताळाभोवती गोळा होतात. वेताळ घसा खाकरतो. आताच मंत्रालयातून आलो. नाणार प्रकल्प जाणार, या वल्गना आहेत. कालच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आपण सारेच होतो. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केल्यावर हा मुंजा कोलांटउड्या मारत या पिंपळावरून त्या पिंपळावर बागडला. तेव्हाच मी म्हटलं की, माझा यावर विश्वास नाही. लागलीच मी मंत्रालयाकडं जाणारी एसटी पकडली. नाणार प्रकल्प उभा करण्याकरिता हा पिंपळ पाडला जाणार, येथील रस्ते रुंद होणार, दिवाबत्ती होणार, अहोरात्र वर्दळ वाढणार... मग, समंध कसा कुणाला त्रस्त करणार, मुंजा विहिरीपाशी पाणी काढायला येणाºयांना कसा घाबरवून सोडणार आणि हडळ सुवासिनींच्या पोटात गोळा कशी उठवणार... ते काही नाही, नाणार प्रकल्प येणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. वेताळाच्या निर्धारावर भुतांनी अचकटविचकट अंगविक्षेप करत जल्लोष केला. आपण विरोध करायचा म्हणजे करायचे तरी काय? देवचार आणि गिºहा यांनी एका सुरात प्रश्न केला. वेताळ म्हणाला की, गुजरातहून कुणी मोदी, शहा जमिनीचे व्यवहार करायला आले, तर घरातील बाया, बाप्ये यांच्या शरीरात लागलीच प्रवेश करायचा आणि खेळ सुरू करायचा. खविस तू गावातील खाटकाची पाठ सोडू नको. कुणी जमीनखरेदीला आला, तर चॉपर घेऊन त्याच्या पाठी लाग. झोटिंगा, तू गावातील सारंगाच्या शिडात हवा भर. देवचारा, तू आपल्या गावातील गंगू नाभिकाचा वस्तरा ताब्यात घे. वेताळानं प्रत्येकावर जबाबदारी सोपवली. तेवढ्यात, म्हसोबा पुढं आला आणि म्हणाला की, वेताळा ही काय आपली कामं आहेत का? मग, ते खळ्ळ-खट्याकवाले काय करणार? शिवाय, स्वाभिमानची पोरं राडे घालायला उतावीळ आहेतच. वर्षभरावर निवडणुका आल्यामुळं हे धूमशान सुरू झालंय. निवडणुका होऊ दे. नंतर सारं आपसूक शांत होईल. म्हसोबा समजावणीच्या सुरात बोलला. मागं जैतापूरवरून रान उठलं, तेव्हा आपण हवालदिल झालो होतो. आता कुणी त्याचं नाव पण काढत नाही. तेवढ्यात, झाडाखाली हालचाल दिसली. कुणीतरी मुंडी कापलेलं कोंबडं आणून झाडाखाली भिरकावून धूम ठोकली. सारी भुतं मेजवानीवर तुटून पडली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्प