शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

असहिष्णुतेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 04:12 IST

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीला विशिष्ट दिशा मिळवून देणाऱ्या उद्योग समूहाचा अत्यंत नेमस्त असा वारससुद्धा जेव्हां देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी जाहीर चिंता व्यक्त करतो, तेव्हां त्याची तरी संबंधित लोक गंभीर दखल घेणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे. ग्वाल्हेर येथील ‘सिंदीया स्कूल’च्या वर्धापन-दिन सोहळ्यात आधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी वाढत्या असहिष्णुतेचा विषय छेडला आणि नंतर रतन टाटा यांनी त्यांची री ओढली. पण केवळ तितकेच झाले नाही. समारंभानंतर पत्रकारांनी टाटांना छेडले असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ही असहिष्णुता कोठून येते हे सारेच जाणतात असे सूचक उद्गार काढून समाजात साऱ्यांनी एकोप्याने राहाण्याची गरज असताना, गोळ्या घालून लोकांना ठार मारले जाते, त्यांना वेठीस धरले जाते असेही ते म्हणाले. देशात लोकशाही आहे व लोकशाहीत चर्चा, वादविवाद आणि असहमती यांनाही सारखेच स्थान असले तरी असहिष्णुतेला अजिबात स्थान नाही, असेही रतन टाटा म्हणाले. याआधीही देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या संदर्भात आणि विरोधात देशभर मोठी चर्चा घडून आली होती. अनेक संवेदनशील लोकानी निषेध म्हणून त्यांना प्राप्त झालेले सरकारी सन्मान परतही केले होते. पण त्या काळी अशा लोकांची थट्टा केली गेली व काहींनी तर त्यांना थेट देशद्रोह्यांच्याच पंक्तीत नेऊन बसविले होते. आता तेच लोक रतन टाटांनादेखील देशद्रोही ठरविणार आहेत का? केन्द्रातील सत्ताबदलानंतर समाजातील एक वर्ग कानात वारे शिरल्यागत वागू लागला आहे. कोणालाही कोणतेही लेबल लावू लागला आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना कोणीही हटकायला वा अडवायला तयार नाही. मध्येच कधीतरी पंतप्रधानांनी संदिग्ध स्वरुपाचे आवाहन करण्याने काहीही साध्य झालेले नाही हेच टाटांच्या विधानावरुन स्पष्ट होते.