शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 04:12 IST

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक

आता रतन टाटादेखील तेच बोलले आहेत, तेव्हां त्यांनाही देशद्रोहांच्या पंक्तीत नेऊन बसवायचे की काय? ्नत्यांच्यासारखा देशातील एक यशस्वी उद्योगपती आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीला विशिष्ट दिशा मिळवून देणाऱ्या उद्योग समूहाचा अत्यंत नेमस्त असा वारससुद्धा जेव्हां देशातील वाढत्या असहिष्णुतेविषयी जाहीर चिंता व्यक्त करतो, तेव्हां त्याची तरी संबंधित लोक गंभीर दखल घेणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे. ग्वाल्हेर येथील ‘सिंदीया स्कूल’च्या वर्धापन-दिन सोहळ्यात आधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी वाढत्या असहिष्णुतेचा विषय छेडला आणि नंतर रतन टाटा यांनी त्यांची री ओढली. पण केवळ तितकेच झाले नाही. समारंभानंतर पत्रकारांनी टाटांना छेडले असता त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ही असहिष्णुता कोठून येते हे सारेच जाणतात असे सूचक उद्गार काढून समाजात साऱ्यांनी एकोप्याने राहाण्याची गरज असताना, गोळ्या घालून लोकांना ठार मारले जाते, त्यांना वेठीस धरले जाते असेही ते म्हणाले. देशात लोकशाही आहे व लोकशाहीत चर्चा, वादविवाद आणि असहमती यांनाही सारखेच स्थान असले तरी असहिष्णुतेला अजिबात स्थान नाही, असेही रतन टाटा म्हणाले. याआधीही देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या संदर्भात आणि विरोधात देशभर मोठी चर्चा घडून आली होती. अनेक संवेदनशील लोकानी निषेध म्हणून त्यांना प्राप्त झालेले सरकारी सन्मान परतही केले होते. पण त्या काळी अशा लोकांची थट्टा केली गेली व काहींनी तर त्यांना थेट देशद्रोह्यांच्याच पंक्तीत नेऊन बसविले होते. आता तेच लोक रतन टाटांनादेखील देशद्रोही ठरविणार आहेत का? केन्द्रातील सत्ताबदलानंतर समाजातील एक वर्ग कानात वारे शिरल्यागत वागू लागला आहे. कोणालाही कोणतेही लेबल लावू लागला आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांना कोणीही हटकायला वा अडवायला तयार नाही. मध्येच कधीतरी पंतप्रधानांनी संदिग्ध स्वरुपाचे आवाहन करण्याने काहीही साध्य झालेले नाही हेच टाटांच्या विधानावरुन स्पष्ट होते.