शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हित की अनहित?

By admin | Updated: May 24, 2016 04:13 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळे आता बाजार समित्यांच्या ‘जाचा’तून मुक्त करण्याचा निर्णय म्हणे राज्य सरकारने घेतला आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार

राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळे आता बाजार समित्यांच्या ‘जाचा’तून मुक्त करण्याचा निर्णय म्हणे राज्य सरकारने घेतला आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या संदर्भात याआधी अनेकवार वक्तव्ये केली आहेत. शेतकरी त्याच्या कष्टातून जे काही उत्पादन त्याच्या शेतातून काढतो, त्याचा खरा मोबदला त्याला कधीच मिळत नाही, पण ज्यांचे काहीही कष्ट नसतात ते व्यापारी, दलाल आणि बाजार समित्यांचे पुढारी मात्र गब्बर होत जातात ही तक्रार काही अलीकडची नाही. त्याचबरोबर शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरम्यान किंवा त्यांच्या आड कोणीही असता कामा नये हा विचारदेखील काल-परवाचा नाही. अर्थात या तक्रारी किंवा शेतकऱ्यांना बाजार समित्यांचा येणारा अनुभव अवास्तव आहे असेही नाही. वस्तुत: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमखास बाजारपेठ मिळावी आणि त्याच्या उत्पादनाला बाजारभावाप्रमाणे रास्त किंमत मिळावी यासाठीच तर खरे बाजार समित्यांचा अवतार उदयास आला. बाजार समित्यांचा कायदा तयार करताना त्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक व्हावी असा काही हेतू नव्हता. केवळ बाजार समित्यांचा कायदाच कशाला सरकार जे काही कायदे करीत असते, त्या कायद्यांचा अंतिम हेतू जनतेच्या भल्याचाच असतो. देशात अग्रेसर ठरलेली आणि केन्द्रालाही अनुकरणीय वाटलेली रोजगार हमी योजना जेव्हां महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हां तिचा हेतू कठीण परिस्थितीत छोटे शेतकरी आणि शेतमजूर यांची उपासमार होऊ नये असा होता की भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना नवे कुरण मिळावे असा होता? याचा अर्थ योजना मूलत: चांगलीच असते पण तिची अंमलबजावणी चुकीच्या लोकांच्या हाती गेली की तिचे पोतेरे व्हायला वेळ लागत नाही. आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तेच झाले आहे. राजकारण्यांनी आपले अड्डे बनविलेल्या या समित्यांची शेतकऱ्यांच्या हिताकडे डोळेझाक होत असेल तर तो दोष योजनेचा की तिची अंमलबजावणी करणाऱ्यांचा? शेतकऱ्यांनी उत्पादिलेला माल ग्राहकाच्या हाती जाईपर्यंत त्याच्या किंमतीत दुप्पट वा प्रसंगी त्याहून अधिक वाढ होते व त्यामुळे शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकाच्या हाती अशा काही योजना अधूनमधून राबविल्या जातात. पण एक वेगळा उपक्रम या पलीकडे त्यांच्याकडे बघता येत नाही कारण त्यांना शाश्वत स्वरुप प्राप्त होऊ शकत नाही, आजवर शकलेलेही नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करायचा झाल्यास बाजार समित्यांच्या व्यवहारात भले कितीही खोट असली तरी त्यांना तीच सोयीची वाटत असते. गेली काही वर्षे संरक्षणविषयक उत्पादनांच्या खरेदीत दलाल असावेत की नसावेत असा वाद सुरु आहे. दलाल म्हणजे कुणी साऱ्यांना लुटायला बसलेला खलपुरुष अशीच मांडणीदेखील केली जात होती. परंतु आता नव्या सरकारचा या बाबतीतला दृष्टीकोन बदलला आहे. जर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या व्यवहारात दलाल चालू शकतो तर शेतीमालाबाबत त्याचे उच्चाटन हा विचार तार्किक वाटत नाही. तरीही सरकारची तशी भूमिका असेल तर बाजार समित्यांचा अवतार समाप्त करण्याआधी ठोस पर्यायी व्यवस्था निर्माण करणे अगत्याचे ठरते. व्यवहारात उत्पादक-शेतकरी थेट नाते ही परिकल्पना ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.