शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

हित की अनहित?

By admin | Updated: May 24, 2016 04:13 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळे आता बाजार समित्यांच्या ‘जाचा’तून मुक्त करण्याचा निर्णय म्हणे राज्य सरकारने घेतला आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार

राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळे आता बाजार समित्यांच्या ‘जाचा’तून मुक्त करण्याचा निर्णय म्हणे राज्य सरकारने घेतला आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या संदर्भात याआधी अनेकवार वक्तव्ये केली आहेत. शेतकरी त्याच्या कष्टातून जे काही उत्पादन त्याच्या शेतातून काढतो, त्याचा खरा मोबदला त्याला कधीच मिळत नाही, पण ज्यांचे काहीही कष्ट नसतात ते व्यापारी, दलाल आणि बाजार समित्यांचे पुढारी मात्र गब्बर होत जातात ही तक्रार काही अलीकडची नाही. त्याचबरोबर शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरम्यान किंवा त्यांच्या आड कोणीही असता कामा नये हा विचारदेखील काल-परवाचा नाही. अर्थात या तक्रारी किंवा शेतकऱ्यांना बाजार समित्यांचा येणारा अनुभव अवास्तव आहे असेही नाही. वस्तुत: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमखास बाजारपेठ मिळावी आणि त्याच्या उत्पादनाला बाजारभावाप्रमाणे रास्त किंमत मिळावी यासाठीच तर खरे बाजार समित्यांचा अवतार उदयास आला. बाजार समित्यांचा कायदा तयार करताना त्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक व्हावी असा काही हेतू नव्हता. केवळ बाजार समित्यांचा कायदाच कशाला सरकार जे काही कायदे करीत असते, त्या कायद्यांचा अंतिम हेतू जनतेच्या भल्याचाच असतो. देशात अग्रेसर ठरलेली आणि केन्द्रालाही अनुकरणीय वाटलेली रोजगार हमी योजना जेव्हां महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हां तिचा हेतू कठीण परिस्थितीत छोटे शेतकरी आणि शेतमजूर यांची उपासमार होऊ नये असा होता की भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना नवे कुरण मिळावे असा होता? याचा अर्थ योजना मूलत: चांगलीच असते पण तिची अंमलबजावणी चुकीच्या लोकांच्या हाती गेली की तिचे पोतेरे व्हायला वेळ लागत नाही. आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तेच झाले आहे. राजकारण्यांनी आपले अड्डे बनविलेल्या या समित्यांची शेतकऱ्यांच्या हिताकडे डोळेझाक होत असेल तर तो दोष योजनेचा की तिची अंमलबजावणी करणाऱ्यांचा? शेतकऱ्यांनी उत्पादिलेला माल ग्राहकाच्या हाती जाईपर्यंत त्याच्या किंमतीत दुप्पट वा प्रसंगी त्याहून अधिक वाढ होते व त्यामुळे शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकाच्या हाती अशा काही योजना अधूनमधून राबविल्या जातात. पण एक वेगळा उपक्रम या पलीकडे त्यांच्याकडे बघता येत नाही कारण त्यांना शाश्वत स्वरुप प्राप्त होऊ शकत नाही, आजवर शकलेलेही नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करायचा झाल्यास बाजार समित्यांच्या व्यवहारात भले कितीही खोट असली तरी त्यांना तीच सोयीची वाटत असते. गेली काही वर्षे संरक्षणविषयक उत्पादनांच्या खरेदीत दलाल असावेत की नसावेत असा वाद सुरु आहे. दलाल म्हणजे कुणी साऱ्यांना लुटायला बसलेला खलपुरुष अशीच मांडणीदेखील केली जात होती. परंतु आता नव्या सरकारचा या बाबतीतला दृष्टीकोन बदलला आहे. जर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या व्यवहारात दलाल चालू शकतो तर शेतीमालाबाबत त्याचे उच्चाटन हा विचार तार्किक वाटत नाही. तरीही सरकारची तशी भूमिका असेल तर बाजार समित्यांचा अवतार समाप्त करण्याआधी ठोस पर्यायी व्यवस्था निर्माण करणे अगत्याचे ठरते. व्यवहारात उत्पादक-शेतकरी थेट नाते ही परिकल्पना ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.