शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

भागवतांचे बौद्धिक, केंद्राला संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:26 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो. मात्र यंदा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या उद्बोधनाला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अगदी शेतकरी समस्येपासून देशाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक बदलांवर भाष्य करणा-या सरसंघचालकांनी आपल्या विशेष शैलीतून केंद्र शासनाला योग्य आणि समर्पक भाषेत संकेत दिले आहेत. वेळीच जागे व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, ही त्यांच्या बौद्धिकाची अप्रत्यक्ष दिशा होती. सत्ताधा-यांनी या भाषणाचा नेमका काय अन्वयार्थ लावला हे येणारा काळ सांगेलच. मात्र संघधुरिणांना सरसंघचालकांच्या भाषणातील नेमकी तळमळ कळली आहे आणि यावर मंथन होणार, हे निश्चित. सत्ताबदलानंतर झालेला हा चौथा विजयादशमी उत्सव ठरला आणि अगोदरच्या तीनही वेळी सरसंघचालकांनी सरकारची जाहीरपणे पाठच थोपटली होती. अगदी नोटाबंदीच्या मुद्यावरदेखील संघ सरकारच्या पाठीमागे उभा असल्याचे दिसत होते. मात्र यावेळी डॉ. भागवत यांच्यावर जाहीरपणे सरकारला चिमटे काढण्याची वेळ आली. याचाच अर्थ त्यांना भविष्यातील धोका स्पष्टपणे दिसतो आहे हे जाणवले. नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय राबविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये वाढली होती. मात्र त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, विविध पातळ्यांवर सरकारविरोधात उपस्थित होणारे प्रश्न, महागाईचे वाढते शेपूट यामुळे जनतादेखील हैराण झाली आहे. निर्णय धाडसी असला तरी त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही हे संघातील संघटनांचेदेखील मत बनले. २०१९ ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. देशात जर संघाला आपला अजेंडा राबवून घ्यायचा असेल तर या निवडणुकांत २०१४ ची पुनरावृत्ती अत्यावश्यक आहे. मात्र आर्थिक पातळीवर ढासळता आलेख हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो याची संघाला जाणीव आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यामुळेच वेळ आली तर शासनाने खर्चाचे ओझे उचलावे, मात्र बळीराजाला फायदा होईल असे किमान आधारभूत मूल्य निश्चित करावे, हे त्यांचे भाष्य कोट्यवधी शेतकºयांचे रुदन मांडत होते. या उद्बोधनात सरसंघचालकांनी संघाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरदेखील भाष्य केले. मात्र देशाची दशा आणि त्यांच्या भाषणाची दिशा केंद्राला गंभीरतेने घ्यावी लागणार आहे. सरसंघचालकांचा संकेतार्थ स्वीकारत केंद्र शासन आणि थिंकटँक आता जर शहाणे झाले नाहीत, तर आगामी निवडणुकांत भाजपसमोरील प्रवास निश्चितच मोठ्या अडथळ्यांचा राहू शकतो हे निश्चित.