शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

भागवतांचे बौद्धिक, केंद्राला संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:26 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो. मात्र यंदा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या उद्बोधनाला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अगदी शेतकरी समस्येपासून देशाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक बदलांवर भाष्य करणा-या सरसंघचालकांनी आपल्या विशेष शैलीतून केंद्र शासनाला योग्य आणि समर्पक भाषेत संकेत दिले आहेत. वेळीच जागे व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, ही त्यांच्या बौद्धिकाची अप्रत्यक्ष दिशा होती. सत्ताधा-यांनी या भाषणाचा नेमका काय अन्वयार्थ लावला हे येणारा काळ सांगेलच. मात्र संघधुरिणांना सरसंघचालकांच्या भाषणातील नेमकी तळमळ कळली आहे आणि यावर मंथन होणार, हे निश्चित. सत्ताबदलानंतर झालेला हा चौथा विजयादशमी उत्सव ठरला आणि अगोदरच्या तीनही वेळी सरसंघचालकांनी सरकारची जाहीरपणे पाठच थोपटली होती. अगदी नोटाबंदीच्या मुद्यावरदेखील संघ सरकारच्या पाठीमागे उभा असल्याचे दिसत होते. मात्र यावेळी डॉ. भागवत यांच्यावर जाहीरपणे सरकारला चिमटे काढण्याची वेळ आली. याचाच अर्थ त्यांना भविष्यातील धोका स्पष्टपणे दिसतो आहे हे जाणवले. नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय राबविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये वाढली होती. मात्र त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, विविध पातळ्यांवर सरकारविरोधात उपस्थित होणारे प्रश्न, महागाईचे वाढते शेपूट यामुळे जनतादेखील हैराण झाली आहे. निर्णय धाडसी असला तरी त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही हे संघातील संघटनांचेदेखील मत बनले. २०१९ ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. देशात जर संघाला आपला अजेंडा राबवून घ्यायचा असेल तर या निवडणुकांत २०१४ ची पुनरावृत्ती अत्यावश्यक आहे. मात्र आर्थिक पातळीवर ढासळता आलेख हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो याची संघाला जाणीव आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यामुळेच वेळ आली तर शासनाने खर्चाचे ओझे उचलावे, मात्र बळीराजाला फायदा होईल असे किमान आधारभूत मूल्य निश्चित करावे, हे त्यांचे भाष्य कोट्यवधी शेतकºयांचे रुदन मांडत होते. या उद्बोधनात सरसंघचालकांनी संघाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरदेखील भाष्य केले. मात्र देशाची दशा आणि त्यांच्या भाषणाची दिशा केंद्राला गंभीरतेने घ्यावी लागणार आहे. सरसंघचालकांचा संकेतार्थ स्वीकारत केंद्र शासन आणि थिंकटँक आता जर शहाणे झाले नाहीत, तर आगामी निवडणुकांत भाजपसमोरील प्रवास निश्चितच मोठ्या अडथळ्यांचा राहू शकतो हे निश्चित.