शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

इंजेक्शन पखालीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:55 IST

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला.

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला. शेवटी सरकार म्हणून काही तरी केले, असे दाखविण्याची जबाबदारी असतेच आणि ती पार पाडावी लागते म्हणून मिटमिटा येथे झालेल्या पोलीस कारवाईला जबाबदार ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना महिनाभराच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आणि महानगरपालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली केली. या दोघांवरील कारवाईचे समर्थन करणे किंवा त्याचा विरोध करणे हा विषय नाही; पण यामुळे प्रश्न सुटणार आहे का? मुळात हा प्रश्न काही महिना-दोन महिन्यांत निर्माण झालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून तो सोडविण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्याला प्रशासन जेवढे जबाबदार त्यापेक्षाही जास्त नगरसेवक आणि महापौर. आपल्या कलाने काम करणारे अधिकारी औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना चालत नाहीत. शैलेशकुमार शर्मा, बलदेवसिंग, प्रकाश महाजन, ओमप्रकाश बकोरिया, सुनील केंदे्रकर या कडक आणि नियमांनुसार काम करणाºया अधिकाºयांना येथे टिकू दिले नाही. प्रकाश महाजनांच्या विरोधात तर ठराव केला गेला. मात्र, या शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसनेचे वर्चस्व आहे; पण या पाव शतकात रस्ते, पाणी, आरोग्य व दिवाबत्ती, अशा मूलभूत सेवा ते देऊ शकले नाहीत. धार्मिक तेढ तीव्र करून जनभावना चाळवायच्या आणि सत्तेचा सोपान चढायचा ही पद्धत त्यांनी अंगीकारली. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मार्क्सने उगीच म्हटले नाही. कारण महिनाभर कचºयाचे ढीग लागूनही या शहराची जनता गुंगीत आहे. असे असताना हा प्रश्न तातडीने सोडवा, असे फर्मान ‘मातोश्री’वरूनही निघाले नाही. कचºयाचा नुसताच प्रश्न नाही, तर त्याला आर्थिक व राजकीय कंगोरे आहेत. कचºयाचा निपटारा करणाºया यंत्रणेत बहुतांश नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. ते जोपासण्याच्या अट्टहासात हे कचºयाचे शहर बनले. हा कचरा शहराच्या कोणत्याही भागात नको आहे. कारण जिकडे कचरा डेपो जाणार त्या भागातील जमिनीचे दर कोसळतात आणि शहरालगतच्या जमिनी या राजकीय हितसंबंधात जशा अडकल्या तशा मतपेटीच्या दबाव तंत्राचाही त्यांच्यावर प्रभाव आहे. कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या परदेश वाºया झाल्या. देशातील प्रयोगदेखील पाहिले; पण दौºयाच्या नावाखाली ही फक्त मौजमजा होती. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी होती, हे उघड झाले. प्रश्न पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही सोडवायचा नाही. कारण तो सुटला तर यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. नियमांवर बोट ठेवून काम करणारा कोणताही आयुक्त नगरसेवकांना नको असतो. सरकारने केलेली कारवाई हा देखावा आहे. आजार हेल्याला आणि इंजेक्शन पखालीला, एवढेच म्हणता येईल.