शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

इंजेक्शन पखालीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:55 IST

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला.

औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अठ्ठावीस दिवसांनंतरही सुटला नाही. तो शहरभर गाजत होताच आणि विधानसभेतही गाजला. शेवटी सरकार म्हणून काही तरी केले, असे दाखविण्याची जबाबदारी असतेच आणि ती पार पाडावी लागते म्हणून मिटमिटा येथे झालेल्या पोलीस कारवाईला जबाबदार ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना महिनाभराच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आणि महानगरपालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली केली. या दोघांवरील कारवाईचे समर्थन करणे किंवा त्याचा विरोध करणे हा विषय नाही; पण यामुळे प्रश्न सुटणार आहे का? मुळात हा प्रश्न काही महिना-दोन महिन्यांत निर्माण झालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून तो सोडविण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्याला प्रशासन जेवढे जबाबदार त्यापेक्षाही जास्त नगरसेवक आणि महापौर. आपल्या कलाने काम करणारे अधिकारी औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना चालत नाहीत. शैलेशकुमार शर्मा, बलदेवसिंग, प्रकाश महाजन, ओमप्रकाश बकोरिया, सुनील केंदे्रकर या कडक आणि नियमांनुसार काम करणाºया अधिकाºयांना येथे टिकू दिले नाही. प्रकाश महाजनांच्या विरोधात तर ठराव केला गेला. मात्र, या शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसनेचे वर्चस्व आहे; पण या पाव शतकात रस्ते, पाणी, आरोग्य व दिवाबत्ती, अशा मूलभूत सेवा ते देऊ शकले नाहीत. धार्मिक तेढ तीव्र करून जनभावना चाळवायच्या आणि सत्तेचा सोपान चढायचा ही पद्धत त्यांनी अंगीकारली. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मार्क्सने उगीच म्हटले नाही. कारण महिनाभर कचºयाचे ढीग लागूनही या शहराची जनता गुंगीत आहे. असे असताना हा प्रश्न तातडीने सोडवा, असे फर्मान ‘मातोश्री’वरूनही निघाले नाही. कचºयाचा नुसताच प्रश्न नाही, तर त्याला आर्थिक व राजकीय कंगोरे आहेत. कचºयाचा निपटारा करणाºया यंत्रणेत बहुतांश नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. ते जोपासण्याच्या अट्टहासात हे कचºयाचे शहर बनले. हा कचरा शहराच्या कोणत्याही भागात नको आहे. कारण जिकडे कचरा डेपो जाणार त्या भागातील जमिनीचे दर कोसळतात आणि शहरालगतच्या जमिनी या राजकीय हितसंबंधात जशा अडकल्या तशा मतपेटीच्या दबाव तंत्राचाही त्यांच्यावर प्रभाव आहे. कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या परदेश वाºया झाल्या. देशातील प्रयोगदेखील पाहिले; पण दौºयाच्या नावाखाली ही फक्त मौजमजा होती. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी होती, हे उघड झाले. प्रश्न पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही सोडवायचा नाही. कारण तो सुटला तर यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. नियमांवर बोट ठेवून काम करणारा कोणताही आयुक्त नगरसेवकांना नको असतो. सरकारने केलेली कारवाई हा देखावा आहे. आजार हेल्याला आणि इंजेक्शन पखालीला, एवढेच म्हणता येईल.