शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय दर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 04:07 IST

प्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन

- डॉ. रामचंद्र देखणेप्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन मिळाले आणि दर्शने उदयास आली. भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शने ही संकल्पना आपण नेहमीच वापरतो. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही सहा दर्शने प्रसिद्ध आहेत. यांनाच (षड्दर्शने किंवा सहा शास्त्रे) असे म्हणतात.याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनही तितक्याच आदराने स्वीकारले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात वेद आणि उपनिषदे यांचा वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाचे विविध मतप्रवाह आपापल्या विचारांचा मागोवा घेत अवतरले आणि विविध मतप्रणालीतून हे तत्त्वज्ञान अधिक विकसित झाले. काही तत्त्वे ही मूलस्वरूपी व सर्वांनी मान्य केलेली असली तरी त्यात विविधता व समृद्धी पहायला मिळते.जीवनाची विशालता, व्यापकता, खोली, संकीर्णता व अमेयता त्यामुळे लक्षात येते व जीवनसंज्ञा किती अमर्याद आणि अनंत आहे याची जाणीव होते. अशा या असीम, अनंत, विविधांगी व संकीर्ण अस्तित्वाचा बुद्धिवादी व सुसंगत रितीने अर्थ लावण्याचे जे अनेक प्रयत्न झाले तेच तत्त्वज्ञानाचे विविध दृष्टिकोन किंवा प्रणाली यांनाच दर्शने असे म्हटले गेले.ज्याच्या योगाने यथार्थतत्त्व पाहिले आणि जाणले जाते ते शास्त्र म्हणजे दर्शन होय. दर्शन हे शास्त्र आहे. आणि दर्शन ही अनुभूती आहे. मानवी जीवनात लौकिक आणि पारलौकिक तत्त्वांची अनुभूती येते आणि त्यातून यथार्थ ज्ञान होते. त्या अर्थाने ‘तत्त्वज्ञानसाधनं शास्त्रम्’ तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधक असे शास्त्र म्हणजे दर्शन होय.सर्व दर्शने ही आत्मज्ञानासाठीच प्रवृत्त झालेली आहेत. ‘आत्मानं विद्धी’ म्हणजे आत्म्याला जाणणे हेच दर्शनाचे खरे प्रयोजन आहे. आत्म्याचे ज्ञान व्हायला हवे असेल तर सर्व अनात्म पदार्थापासून आत्म्याला वेगळे करणे आवश्यक ठरते. त्यालाच आत्मानात्वविवेक असे म्हणतात. भारतीय दर्शनांनी बुद्धिवादाचा अवलंब करून हा आत्मानात्मविवेक देणारी दृष्टी दिली.विश्व, परमात्मा, लोकजीवन या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी देणारे शास्त्र दर्शनांनी उभे राहिले. युक्ती, तर्क आणि ज्ञानी पुरुषांची अपरोक्ष अनुभूती यांच्या आधारावर सर्व दर्शनांची उभारणी झालेली आहे.उपनिषदे आणि त्यातील सिद्धांताची चिंतने विविधांगाने होऊ लागली आणि त्यातूनच दर्शनांची सूत्रे निर्माण झाली आणि ही सूत्रे त्या त्या दर्शनांचे मूळ रूप मांडू लागली. ही सारी दर्शने कोणत्यातरी अज्ञेयाला उभे करून विवेचन करत नाहीत तर ज्ञेयाला जीवनसृष्टीत आणून मानवी जीवनाला आनंदाचा मार्ग दाखविण्यासाठी दर्शने सिद्ध झाली. आणि अध्यात्मशास्त्र सूत्रात मांडले गेले.