शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजचा अग्रलेख: जीएसटीचा बकासूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 07:43 IST

बरोबर पाच वर्षांपूर्वी, १ जुलै २०१७ ला मध्यरात्री संसदेचे दरवाजे उघडून, विशेष ऐतिहासिक अधिवेशन घेऊन लागू केलेल्या गुडस् ॲन्ड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे प्रत्येकालाच ओळखीचा झालेला आहे.

बरोबर पाच वर्षांपूर्वी, १ जुलै २०१७ ला मध्यरात्री संसदेचे दरवाजे उघडून, विशेष ऐतिहासिक अधिवेशन घेऊन लागू केलेल्या गुडस् ॲन्ड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे प्रत्येकालाच ओळखीचा झालेला जीएसटी नावाचा कर देशवासीयांची काय काय ऐतिहासिक परीक्षा घेणार आहे कोण जाणे. मुळात देशभर एकच कर म्हणून वाजतगाजत आणलेल्या जीएसटीत इतके टप्पे आहेत व त्यात इतक्यावेळा बदल झाले आहेत की, त्याचा गुंता सनदी लेखापालांनाही सुटेना. अभ्यासक्रमात स्वतंत्र विषयच नव्हे, तर या एका कराचा अभ्यास पीएच.डी. मिळवून देऊ शकेल, इतके चमत्कार पाच वर्षांत जीएसटीने केले आहेत. 

आता तांदूळ, गहू, पीठ, डाळी, मांस-मच्छी, दही, लस्सी, लोणी वगैरे पॅकबंद वस्तू, एलईडी बल्ब, शाई, सगळ्या प्रकारची कटलरी, हॉटेल-हॉस्पिटलमधील महाग खोल्या, इतकेच कशाला, बँकेच्या चेकबुकवरही लावलेला जीएसटी हा आणखी नवा चमत्कार आहे. आकाशाला भिडलेल्या महागाईत या नव्या करांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळे सत्ताधारी नेते जीएसटीचे समर्थन करताना सांगत होते की, यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर कर लागणार नाही, केवळ ऐषाेरामाच्या गोष्टींवर कराने तिजोरी भरली जाईल. आता सारे उलटे होताना दिसत आहे. स्वयंपाकघरावर जितका कराचा बोझा आहे, तितका इतर चैनीच्या वस्तूंवर नाही. वित्तमंत्री निर्मला सीतारामन आता कशाकशावर कर लावला, याची यादी करण्याऐवजी कशाकशावर राहिला, याची नोंद करतील आणि कदाचित आता कर नसलेल्या सेवा, वस्तू त्यांना सापडणारही नाहीत. 

आता एरव्ही खर्चाशिवाय पोस्टाने घरपोच पाठविल्या जाणाऱ्या चेकबुकवर बँका शुल्क आकारणार आणि सरकार त्यावर जीएसटी वसूल करणार. कोरोना महामारीच्या दोन-अडीच वर्षांच्या संकटातून कसाबसा सावरत असलेला सामान्य माणूस आधीच पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजीच्या महागाईने मेटाकुटीला आला आहे. त्याच्या व्यथा-वेदना समजून घेण्याऐवजी नव्या करांनी त्याची पिसे काढणे सुरू आहे. जीएसटी लागू असलेल्या वस्तूंच्या नव्या यादीमुळे केवळ ग्राहकच संतापलेले आहेत, असे नाही. अन्नधान्य, पीठ किंवा डाळींच्या २५ किलोपेक्षा कमी वजनाच्या नॉनब्रँडेड मालाच्या विक्रीवर जीएसटी लागू करण्याच्या विरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी शनिवारी बंद पाळला. त्यावर सरकारने केलेला खुलासा अधिक संतापजनक आहे. २५ किलोंपेक्षा अधिक वजनाचा माल किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून खरेदी करून आणला व तो सुटा विकला, तर त्यावर जीएसटी लागणार नाही. हा खुलासा म्हणजे किरकाेळ व्यापाऱ्यांचा अक्षरश: छळ आहे. 

अर्थसंकल्प जाहीर करताना आपले सरकार भलतेच लोककल्याणकारी असल्याचे दाखवायचे, रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करप्रणालीबाहेर ठेवायच्या, दुसऱ्या दिवशी माध्यमांमधून सरकारचे प्रचंड कौतुक करून घ्यायचे, जनकल्याणकारी सरकार ही आपली प्रतिमा उजळून घ्यायची आणि नंतर मागच्या दाराने, चोरूनलपून हळूहळू एकेक वस्तू, सेवा कराच्या जाळ्यात आणायची, हा खेळ आता जनतेच्या लक्षात यायला लागला आहे. बकासुरासारखाच हा जीएसटी समोर दिसेल ती वस्तू व सेवा आपल्या कवेत घेतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी असताना, त्याचे लाभ सामान्य ग्राहकांपर्यंत पोहाेचू दिले नाहीत. त्यातून सरकारी तिजोरीत किती पैसा आला, याचे आकडे कधीच कळू दिले नाहीत. इंधन दरवाढीने सामान्यांचे बजेट कोलमडून पडले असताना, आता त्यांच्यावर, विशेषत: मध्यमवर्गीयांवर नवे ओझे  लादण्यात आले आहे. 

महागाईने कंबरडे मोडले, आपणच सत्तेवर आणलेले रोज नव्याने खिसा रिकामा करीत असल्याच्या बुक्क्यांचा मार तोंड दाबून हा वर्ग सहन करतो आहे. परंतु, तरीही रस्त्यावर आंदोलन वगैरे होईल, असे अजिबात नाही. या वर्गाला गुंतवून ठेवण्यासाठी धर्म, धार्मिक विखार असे अनेक मुद्दे आहेत व क्षणिक संतापानंतर तो त्यातच गुंतून राहतो. दुबळ्या विरोधकांनी टीका वगैरे केली, तर सरकार आधी तिच्याकडे ढुंकून पाहणार नाही. पाहिलेच तर देशाचा विकास विराेधकांना पाहवत नाही म्हणून टीका करतात, असा बचाव केला जाईल किंवा आधीच्या सरकारची उदाहरणे दिली जातील. थोडक्यात, महागाईत होरपळणाऱ्या देशवासीयांबद्दल सरकारला दया आली, हृदय पाझरले तरच काही दिलासा मिळण्याची आशा आहे. सरकारला अशी दया येते का पाहणे एवढेच सामान्यांच्या हातात आहे. 

टॅग्स :GSTजीएसटी