शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

भेसळविरोधी कायद्याची आता अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:24 IST

भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप होणार असा कायदा केला, त्याबद्दल अभिनंदन, पण आता हा कायदा लवकरात लवकर अमलात यावा यासाठी प्रयत्न करा. जे कोणी अशा धंद्यात दोषी आढळतील त्यांना जन्मठेप द्या, तरच या कायद्याची भीती निर्माण होईल.

छोट्या मुलापासून म्हाताऱया व्यक्तीपर्यंत सगळ्यांसाठी दूध हे आवश्यक असणारे पेय. दूध, दही, तूप या गोष्टी छानछौकीच्या नाही तर गरजेच्या आहेत. ज्या गोरगरिबांना प्रोटीन म्हणून काजू, बदाम परवडत नाहीत अशांना दुधाचाच काय तो आधार. कितीही महाग झाले तरी प्रत्येक कुटुंबाला दूध घ्यावेच लागते. याच गरजेचा फायदा घेऊन दुधाच्या भेसळीचा खुलेआम गोरखधंदा सुरु आहे. जनतेच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता, खऱया दुधाचा एक थेंबही न टाकता शंभर टक्के बनावट दूध बनवणाऱ्या टोळ्या राज्यात सक्रिय आहेत.

युरिया आणि आरोग्यास अपायकारक असणारी केमिकल्स वापरुन दूध बनवले जात आहे. दुधात पाणी मिसळणे तर अगदीच सामान्य बाब झाली आहे. या भेसळीचे ना कोणाला भय ना लाज ! देशाने धवलक्रांती केली, पण वाटप होणाऱया दुधापैकी ६५ टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले यासारखे दुर्दैव दुसरे नाही. कसल्या धवल क्रांतीच्या गप्पा मारतो आपण? दुधाचे भाव ४० पासून १०० रुपये लिटरपर्यंत गेले. मात्र शेतकºयाला २५ रुपयांचा भाव मिळावा म्हणून आंदोलन करावे लागते. तरीही तेवढा भाव सगळ्यांनाच मिळत नाही. दुधाचे फायदे आजवर फक्त व्यापारी, दूध संघ आणि शासकीय दूधडेअऱ्यांनी लाटले. शेतकऱयांकडून २० ते २२ रुपये लिटरने दूध घ्यायचे, ‘प्रोसेसिंग चार्ज’च्या नावाखाली पाचपट दराने ते बाजारात विकून नफेखोरी करायची ही दुष्ट वृत्ती बनली आहे, जी घातक आहे. दुधात भेसळ करणे, हा सरळसरळ गुन्हा असताना देखील हे थांबवण्यासाठी सरकार हतबल आहे. मागच्या सरकारने अमूक केले म्हणून आता आपण काही करू शकत नाही असे म्हणणे हे भेसळखोरांची पाठराखण करणे आहे. सरकारने ठरवले तर ते काहीही करू शकतो याची असंख्य उदाहरणे याच राज्याने पाहिलेली आहेत. ठरवले तर एका रात्रीतून भेसळखोरांच्या मुसक्या आवळत येतील, पण त्यासाठी केवळ कायदे कामाचे नाहीत. गरज आहे शासकीय इच्छाशक्तीची. आपल्याकडे कायदे नाहीत असे नाही.

टपऱ्यांवरती वापरुन चोथा झालेला चहा वाळवून त्याला पुन्हा रंग देऊन विकणे, मुंबईत रेल्वेच्या दुतर्फा घाण पाण्यात पालक, मेथी अशा पालेभाज्या पिकवणे, तांदळात प्लॅस्टिकच्या काड्या, शेंगदाण्यात विटेचे तुकडे, तुरीच्या डाळीत लाखेची डाळ अशी भेसळ वाढू लागली. तेव्हा यावर वचक बसावा आणि जनतेच्या आरोग्याचा बाजार थांबावा यासाठी केंद्र शासनाने विचारपूर्वक २००६ साली अन्न सुरक्षा व मानके कायदा केला. ‘शेतीपासून ताटापर्यंत’ भेसळ होऊ नये यासाठीच्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा हा कायदा आहे. भेसळखोर पकडले तर त्यांना शिक्षा होईल, पण भेसळच होऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. आपण इन्कमटॅक्स रिटर्न भरतो त्याचप्रमाणे या कायद्यात दरवर्षी ५ एप्रिलला विक्रेत्यांनी कोणता माल, कोठून घेतला, कुठे विकला, किती घेतला व किती विकला असे सगळे तपशील देण्याचे बंधन या कायद्यात आहे. मात्र, कोणीही असे तपशील दिले नाहीत आणि कोणी विचारलेही नाही. आपल्याकडे २०११ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अन्न सुरक्षेविषयीच्या जगभरातील पहिल्या दहात हा कायदा असताना त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा कोणालाही नीट करावी वाटली नाही. गुन्हा घडू नये म्हणून आणलेला तो कायदा यशस्वीपणे राबवला असता तर आज भेसळीला माफियांचे स्वरूप आले नसते, पण ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. त्यामुळे भेसळ करणारे पकडले की जामीन घेऊन काही तासात पुन्हा गुन्हे करायला मोकळे होतात. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभेत फौजदारी कायद्यातल्या पाच कलमात दुरुस्ती करण्याचे विधेयक आले. त्यात भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल व आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची दुरुस्ती फौजदारी कायद्यात केली गेली. आपले स्वत:चे कायदे मजबूत असताना अन्न व नागरी पुरवठा आणि औषध प्रशासन विभागाला फौजदारी कायद्यात बदल करावा वाटला यातच सगळे काही आले. उशिरा का होईना हे केल्याबद्दल सरकार व अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट अभिनंदनास पात्र आहेत. आता फक्त कडक अंमलबजावणी करून त्यांनी जनतेची शाब्बासकी मिळवावी.

टॅग्स :milkदूध