शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भेसळविरोधी कायद्याची आता अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 06:24 IST

भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप होणार असा कायदा केला, त्याबद्दल अभिनंदन, पण आता हा कायदा लवकरात लवकर अमलात यावा यासाठी प्रयत्न करा. जे कोणी अशा धंद्यात दोषी आढळतील त्यांना जन्मठेप द्या, तरच या कायद्याची भीती निर्माण होईल.

छोट्या मुलापासून म्हाताऱया व्यक्तीपर्यंत सगळ्यांसाठी दूध हे आवश्यक असणारे पेय. दूध, दही, तूप या गोष्टी छानछौकीच्या नाही तर गरजेच्या आहेत. ज्या गोरगरिबांना प्रोटीन म्हणून काजू, बदाम परवडत नाहीत अशांना दुधाचाच काय तो आधार. कितीही महाग झाले तरी प्रत्येक कुटुंबाला दूध घ्यावेच लागते. याच गरजेचा फायदा घेऊन दुधाच्या भेसळीचा खुलेआम गोरखधंदा सुरु आहे. जनतेच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता, खऱया दुधाचा एक थेंबही न टाकता शंभर टक्के बनावट दूध बनवणाऱ्या टोळ्या राज्यात सक्रिय आहेत.

युरिया आणि आरोग्यास अपायकारक असणारी केमिकल्स वापरुन दूध बनवले जात आहे. दुधात पाणी मिसळणे तर अगदीच सामान्य बाब झाली आहे. या भेसळीचे ना कोणाला भय ना लाज ! देशाने धवलक्रांती केली, पण वाटप होणाऱया दुधापैकी ६५ टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले यासारखे दुर्दैव दुसरे नाही. कसल्या धवल क्रांतीच्या गप्पा मारतो आपण? दुधाचे भाव ४० पासून १०० रुपये लिटरपर्यंत गेले. मात्र शेतकºयाला २५ रुपयांचा भाव मिळावा म्हणून आंदोलन करावे लागते. तरीही तेवढा भाव सगळ्यांनाच मिळत नाही. दुधाचे फायदे आजवर फक्त व्यापारी, दूध संघ आणि शासकीय दूधडेअऱ्यांनी लाटले. शेतकऱयांकडून २० ते २२ रुपये लिटरने दूध घ्यायचे, ‘प्रोसेसिंग चार्ज’च्या नावाखाली पाचपट दराने ते बाजारात विकून नफेखोरी करायची ही दुष्ट वृत्ती बनली आहे, जी घातक आहे. दुधात भेसळ करणे, हा सरळसरळ गुन्हा असताना देखील हे थांबवण्यासाठी सरकार हतबल आहे. मागच्या सरकारने अमूक केले म्हणून आता आपण काही करू शकत नाही असे म्हणणे हे भेसळखोरांची पाठराखण करणे आहे. सरकारने ठरवले तर ते काहीही करू शकतो याची असंख्य उदाहरणे याच राज्याने पाहिलेली आहेत. ठरवले तर एका रात्रीतून भेसळखोरांच्या मुसक्या आवळत येतील, पण त्यासाठी केवळ कायदे कामाचे नाहीत. गरज आहे शासकीय इच्छाशक्तीची. आपल्याकडे कायदे नाहीत असे नाही.

टपऱ्यांवरती वापरुन चोथा झालेला चहा वाळवून त्याला पुन्हा रंग देऊन विकणे, मुंबईत रेल्वेच्या दुतर्फा घाण पाण्यात पालक, मेथी अशा पालेभाज्या पिकवणे, तांदळात प्लॅस्टिकच्या काड्या, शेंगदाण्यात विटेचे तुकडे, तुरीच्या डाळीत लाखेची डाळ अशी भेसळ वाढू लागली. तेव्हा यावर वचक बसावा आणि जनतेच्या आरोग्याचा बाजार थांबावा यासाठी केंद्र शासनाने विचारपूर्वक २००६ साली अन्न सुरक्षा व मानके कायदा केला. ‘शेतीपासून ताटापर्यंत’ भेसळ होऊ नये यासाठीच्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा हा कायदा आहे. भेसळखोर पकडले तर त्यांना शिक्षा होईल, पण भेसळच होऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. आपण इन्कमटॅक्स रिटर्न भरतो त्याचप्रमाणे या कायद्यात दरवर्षी ५ एप्रिलला विक्रेत्यांनी कोणता माल, कोठून घेतला, कुठे विकला, किती घेतला व किती विकला असे सगळे तपशील देण्याचे बंधन या कायद्यात आहे. मात्र, कोणीही असे तपशील दिले नाहीत आणि कोणी विचारलेही नाही. आपल्याकडे २०११ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. अन्न सुरक्षेविषयीच्या जगभरातील पहिल्या दहात हा कायदा असताना त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा कोणालाही नीट करावी वाटली नाही. गुन्हा घडू नये म्हणून आणलेला तो कायदा यशस्वीपणे राबवला असता तर आज भेसळीला माफियांचे स्वरूप आले नसते, पण ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. त्यामुळे भेसळ करणारे पकडले की जामीन घेऊन काही तासात पुन्हा गुन्हे करायला मोकळे होतात. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभेत फौजदारी कायद्यातल्या पाच कलमात दुरुस्ती करण्याचे विधेयक आले. त्यात भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल व आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची दुरुस्ती फौजदारी कायद्यात केली गेली. आपले स्वत:चे कायदे मजबूत असताना अन्न व नागरी पुरवठा आणि औषध प्रशासन विभागाला फौजदारी कायद्यात बदल करावा वाटला यातच सगळे काही आले. उशिरा का होईना हे केल्याबद्दल सरकार व अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट अभिनंदनास पात्र आहेत. आता फक्त कडक अंमलबजावणी करून त्यांनी जनतेची शाब्बासकी मिळवावी.

टॅग्स :milkदूध