शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
2
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
3
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
4
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
5
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
6
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
7
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
8
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
9
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
10
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
11
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
12
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
13
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
14
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
15
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
16
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
17
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
18
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
19
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
20
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप

संप, बंदचाही हंगाम असतो तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:43 AM

सध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी.

- दिलीप तिखिलेसध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी. हिंमतरावांच्या सौभाग्यवती जाम भडकल्या आहेत. किचनमध्ये आदळआपट सुरू आहे. हिंमतरावांना रोज फैलावर घेतले जात आहे. हिंमतराव बिचारे मवाळ. गुपचून ऐकून घेतात. तसंही बाजारात जाऊन भाजीपाला आण, किराण्याचे ओझे घेऊन ये, दळण आण ही रोजची कटकटीची कामं करण्यापेक्षा बायकोची बौद्धिक कटकट ऐकलेली बरी, असा माफक विचारही ते करतात.आजही नेहमीप्रमाणे सौ.चा पट्टा सुरू झाला.अहो... ऐकलंय का! ...आठ दिवसांपासून घरात ना भाजीपाला आला ना किराणा भरला. दळणही एक दिवसाचंच आहे. भाजी आणा म्हटलं तर सांगता वाहतूकदारांचा संप आहे. किराणा आणा म्हटलं तर मराठ्यांच्या बंदची सबब पुढे करता. कधी दूध उत्पादकांचे तर कधी ऊस उत्पादकांचे आंदोलन. ते संपत नाही तर आता तुम्हा राज्य कर्मचाऱ्यांचा संप. आम्ही करावे तरी काय? घर चालवायचं कसं? त्यातच हे कार्टं (आपल्या १० वर्षांच्या बंड्याला उद्देशून) दिवसभर उनाडक्या करीत राहतं. शाळेत जा म्हटलं तर म्हणतो संप आहे. मास्तरांनीच आम्हाला सुटी दिली. काय होईल या पोरांच्या शिक्षणाचे!अहो...ऐकताय ना...?पेपरात खुपसलेले हिमंतरावांचे डोके बायकोच्या या हाकेने बाहेर डोकावते.ऐकतो ना...! असे म्हणत असतानाच आपल्याला एका सरळ रेषेत दोन कान दिल्याबद्दल ते देवाचे आभार मानतात. आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बायकोचे आतापर्यंत झालेले बौध्दिक त्यांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेले असते. पण यावेळी सौ.ची चिडचिड जरा जास्तच वाढल्याचे हिंमतरावांच्या लक्षात आले. रोज होणारे संप, बंद याबद्दलचा तिचा संताप अकारण नाही हेही त्यांना पटले.सौ.ने आता खरंच बौद्धिक सुरू केले.... मला मान्य आहे...लोकशाहीत आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हे बंद, तोडफोड, जाळपोळ करण्याचे हक्क यांना कुणी दिले? दुकानदाराला आपले दुकान उघडे ठेवण्याचा हक्क आहे. हातावर पोट असणाºयांना आपला रोजचा रोजगार मिळवण्याचा हक्क आहे. मला माझे किचन चालविण्याचा हक्क आहे. हे यावेळी का विसरले जाते? जाळपोळ, तोडफोडीत कोट्यवधींचे नुकसान होते. मी तर म्हणते एवढ्या पैशात कितीतरी बेरोजगारांना रोजगार देता येऊ शकतो.हिंमतरावांनी सौ.कडे अभिमानाने पाहिले...तू म्हणते, ते शंभर टक्के खरं आहे. संप शांततेच व्हावा अशीच संपकºयांची भावना असते, पण ऐनवेळी त्यात राजकारण शिरते आणि असा उत्पात होतो. उदाहरण म्हणून सांगतो. आता काही लोकांना देवेंद्रबाबू नको असतील (मग हे लोक त्यांच्याही पक्षातील असू शकतात) तर नेतृत्वबदलासाठी आंदोलकांना हाताशी धरून मग ते असले प्रयोग करतात.हे प्रयोग यशस्वी होतात का? सौ.ची पृच्छाहिंमतराव : कधी होतात, कधी नाही.आता एक गंमत सांगतो...राज्य कर्मचाºयांचे एक शिष्टमंडळ म्हणे दिल्लीला मोदी साहेबांना भेटायले गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली. मोदी साहेब म्हणाले, देवेंद्रबाबू तुमचे ऐकत नसतील तर मी असं करतो...त्यांना येथे बोलावतो आणि मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्टÑात येतो.मग काय झाले -सौ.चा उत्सुक प्रश्न.मग काय...शिष्टमंडळाने नको..नको म्हणतच तेथून धूम ठोकली आणि तीन दिवसांचा संप अडीच दिवसातच मागे घेतला.याला म्हणतात, राजकारण..!