शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संप, बंदचाही हंगाम असतो तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:43 IST

सध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी.

- दिलीप तिखिलेसध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी. हिंमतरावांच्या सौभाग्यवती जाम भडकल्या आहेत. किचनमध्ये आदळआपट सुरू आहे. हिंमतरावांना रोज फैलावर घेतले जात आहे. हिंमतराव बिचारे मवाळ. गुपचून ऐकून घेतात. तसंही बाजारात जाऊन भाजीपाला आण, किराण्याचे ओझे घेऊन ये, दळण आण ही रोजची कटकटीची कामं करण्यापेक्षा बायकोची बौद्धिक कटकट ऐकलेली बरी, असा माफक विचारही ते करतात.आजही नेहमीप्रमाणे सौ.चा पट्टा सुरू झाला.अहो... ऐकलंय का! ...आठ दिवसांपासून घरात ना भाजीपाला आला ना किराणा भरला. दळणही एक दिवसाचंच आहे. भाजी आणा म्हटलं तर सांगता वाहतूकदारांचा संप आहे. किराणा आणा म्हटलं तर मराठ्यांच्या बंदची सबब पुढे करता. कधी दूध उत्पादकांचे तर कधी ऊस उत्पादकांचे आंदोलन. ते संपत नाही तर आता तुम्हा राज्य कर्मचाऱ्यांचा संप. आम्ही करावे तरी काय? घर चालवायचं कसं? त्यातच हे कार्टं (आपल्या १० वर्षांच्या बंड्याला उद्देशून) दिवसभर उनाडक्या करीत राहतं. शाळेत जा म्हटलं तर म्हणतो संप आहे. मास्तरांनीच आम्हाला सुटी दिली. काय होईल या पोरांच्या शिक्षणाचे!अहो...ऐकताय ना...?पेपरात खुपसलेले हिमंतरावांचे डोके बायकोच्या या हाकेने बाहेर डोकावते.ऐकतो ना...! असे म्हणत असतानाच आपल्याला एका सरळ रेषेत दोन कान दिल्याबद्दल ते देवाचे आभार मानतात. आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बायकोचे आतापर्यंत झालेले बौध्दिक त्यांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेले असते. पण यावेळी सौ.ची चिडचिड जरा जास्तच वाढल्याचे हिंमतरावांच्या लक्षात आले. रोज होणारे संप, बंद याबद्दलचा तिचा संताप अकारण नाही हेही त्यांना पटले.सौ.ने आता खरंच बौद्धिक सुरू केले.... मला मान्य आहे...लोकशाहीत आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हे बंद, तोडफोड, जाळपोळ करण्याचे हक्क यांना कुणी दिले? दुकानदाराला आपले दुकान उघडे ठेवण्याचा हक्क आहे. हातावर पोट असणाºयांना आपला रोजचा रोजगार मिळवण्याचा हक्क आहे. मला माझे किचन चालविण्याचा हक्क आहे. हे यावेळी का विसरले जाते? जाळपोळ, तोडफोडीत कोट्यवधींचे नुकसान होते. मी तर म्हणते एवढ्या पैशात कितीतरी बेरोजगारांना रोजगार देता येऊ शकतो.हिंमतरावांनी सौ.कडे अभिमानाने पाहिले...तू म्हणते, ते शंभर टक्के खरं आहे. संप शांततेच व्हावा अशीच संपकºयांची भावना असते, पण ऐनवेळी त्यात राजकारण शिरते आणि असा उत्पात होतो. उदाहरण म्हणून सांगतो. आता काही लोकांना देवेंद्रबाबू नको असतील (मग हे लोक त्यांच्याही पक्षातील असू शकतात) तर नेतृत्वबदलासाठी आंदोलकांना हाताशी धरून मग ते असले प्रयोग करतात.हे प्रयोग यशस्वी होतात का? सौ.ची पृच्छाहिंमतराव : कधी होतात, कधी नाही.आता एक गंमत सांगतो...राज्य कर्मचाºयांचे एक शिष्टमंडळ म्हणे दिल्लीला मोदी साहेबांना भेटायले गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली. मोदी साहेब म्हणाले, देवेंद्रबाबू तुमचे ऐकत नसतील तर मी असं करतो...त्यांना येथे बोलावतो आणि मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्टÑात येतो.मग काय झाले -सौ.चा उत्सुक प्रश्न.मग काय...शिष्टमंडळाने नको..नको म्हणतच तेथून धूम ठोकली आणि तीन दिवसांचा संप अडीच दिवसातच मागे घेतला.याला म्हणतात, राजकारण..!