शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

संप, बंदचाही हंगाम असतो तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:43 IST

सध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी.

- दिलीप तिखिलेसध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी. हिंमतरावांच्या सौभाग्यवती जाम भडकल्या आहेत. किचनमध्ये आदळआपट सुरू आहे. हिंमतरावांना रोज फैलावर घेतले जात आहे. हिंमतराव बिचारे मवाळ. गुपचून ऐकून घेतात. तसंही बाजारात जाऊन भाजीपाला आण, किराण्याचे ओझे घेऊन ये, दळण आण ही रोजची कटकटीची कामं करण्यापेक्षा बायकोची बौद्धिक कटकट ऐकलेली बरी, असा माफक विचारही ते करतात.आजही नेहमीप्रमाणे सौ.चा पट्टा सुरू झाला.अहो... ऐकलंय का! ...आठ दिवसांपासून घरात ना भाजीपाला आला ना किराणा भरला. दळणही एक दिवसाचंच आहे. भाजी आणा म्हटलं तर सांगता वाहतूकदारांचा संप आहे. किराणा आणा म्हटलं तर मराठ्यांच्या बंदची सबब पुढे करता. कधी दूध उत्पादकांचे तर कधी ऊस उत्पादकांचे आंदोलन. ते संपत नाही तर आता तुम्हा राज्य कर्मचाऱ्यांचा संप. आम्ही करावे तरी काय? घर चालवायचं कसं? त्यातच हे कार्टं (आपल्या १० वर्षांच्या बंड्याला उद्देशून) दिवसभर उनाडक्या करीत राहतं. शाळेत जा म्हटलं तर म्हणतो संप आहे. मास्तरांनीच आम्हाला सुटी दिली. काय होईल या पोरांच्या शिक्षणाचे!अहो...ऐकताय ना...?पेपरात खुपसलेले हिमंतरावांचे डोके बायकोच्या या हाकेने बाहेर डोकावते.ऐकतो ना...! असे म्हणत असतानाच आपल्याला एका सरळ रेषेत दोन कान दिल्याबद्दल ते देवाचे आभार मानतात. आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बायकोचे आतापर्यंत झालेले बौध्दिक त्यांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेले असते. पण यावेळी सौ.ची चिडचिड जरा जास्तच वाढल्याचे हिंमतरावांच्या लक्षात आले. रोज होणारे संप, बंद याबद्दलचा तिचा संताप अकारण नाही हेही त्यांना पटले.सौ.ने आता खरंच बौद्धिक सुरू केले.... मला मान्य आहे...लोकशाहीत आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हे बंद, तोडफोड, जाळपोळ करण्याचे हक्क यांना कुणी दिले? दुकानदाराला आपले दुकान उघडे ठेवण्याचा हक्क आहे. हातावर पोट असणाºयांना आपला रोजचा रोजगार मिळवण्याचा हक्क आहे. मला माझे किचन चालविण्याचा हक्क आहे. हे यावेळी का विसरले जाते? जाळपोळ, तोडफोडीत कोट्यवधींचे नुकसान होते. मी तर म्हणते एवढ्या पैशात कितीतरी बेरोजगारांना रोजगार देता येऊ शकतो.हिंमतरावांनी सौ.कडे अभिमानाने पाहिले...तू म्हणते, ते शंभर टक्के खरं आहे. संप शांततेच व्हावा अशीच संपकºयांची भावना असते, पण ऐनवेळी त्यात राजकारण शिरते आणि असा उत्पात होतो. उदाहरण म्हणून सांगतो. आता काही लोकांना देवेंद्रबाबू नको असतील (मग हे लोक त्यांच्याही पक्षातील असू शकतात) तर नेतृत्वबदलासाठी आंदोलकांना हाताशी धरून मग ते असले प्रयोग करतात.हे प्रयोग यशस्वी होतात का? सौ.ची पृच्छाहिंमतराव : कधी होतात, कधी नाही.आता एक गंमत सांगतो...राज्य कर्मचाºयांचे एक शिष्टमंडळ म्हणे दिल्लीला मोदी साहेबांना भेटायले गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली. मोदी साहेब म्हणाले, देवेंद्रबाबू तुमचे ऐकत नसतील तर मी असं करतो...त्यांना येथे बोलावतो आणि मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्टÑात येतो.मग काय झाले -सौ.चा उत्सुक प्रश्न.मग काय...शिष्टमंडळाने नको..नको म्हणतच तेथून धूम ठोकली आणि तीन दिवसांचा संप अडीच दिवसातच मागे घेतला.याला म्हणतात, राजकारण..!