शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

राजाच लढाईला नकार देत असेल तर..?

By admin | Updated: March 16, 2015 00:18 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्त्या, अवकाळी पावसावर सरकारने केलेली उपाययोजना, घोषणाबाज सरकार असे

अतुल कुलकर्णी -अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा संपला. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्त्या, अवकाळी पावसावर सरकारने केलेली उपाययोजना, घोषणाबाज सरकार असे अनेक विषय विरोधकांकडे असताना काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष यापैकी एकही विषय घेऊन सरकारवर तुटून पडल्याचे चित्र सभागृहात दिसले नाही. या जागी भाजपा-शिवसेना विरोधात असती तर पहिल्या आठवड्यात त्यांनी किमान दोन-तीन दिवस तरी या विषयांवर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले असते, पण विरोधकांमध्ये ना एकजूट आहे ना सातत्य.यासाठी एकच उदाहरण पुरेसे ठरावे. टोलवरून सभागृहात चर्चा रंगली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे आणि मुंबई एन्ट्री पॉइंटवर टोल देताना जे करार केले त्यात बायबॅकची सोयच ठेवली नाही असा गौप्यस्फोट केला तेव्हा विरोधी बाकावर बसलेल्या छगन भुजबळ यांनी ते काम एमएसआरडीसीने केले असे सांगून स्वत:ची सोडवणूक करून घेतली. एमएसआरडीसीचे खाते जरी भुजबळांकडे नसले तरी ते त्यांच्याच पक्षाकडे होते. मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका त्यांच्यावर उलटवून न लावता स्वत:ची सोडवणूक करून आपल्याच पक्षातल्या दुसऱ्या सदस्याकडे बोट करून मोकळे होणारे सदस्य विरोधी बाकावर असतील तर ते एकत्र येऊन सरकारविरोधात लढणार तरी कसे?काँग्रेसमध्ये सगळेच नेते. त्यामुळे एखाद्या विषयावर वेलमध्ये उतरणे, घोषणा देणे, या गोष्टी करायच्या कोणी म्हणून सगळे एकमेकांकडे बघत बसतात. कामकाज बंद पाडणे तर फार पुढची गोष्ट. याउलट थोडी आक्रमकता विधान परिषदेत सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यात दिसते आहे. पहिल्याच आठवड्यात शेवटच्या आठवड्यासारखे वातावरण विरोधकांमध्ये आहे. सत्ताधाऱ्यांना तर हे हवेच आहे.उलट सत्ताधारी पक्षातल्या शिवसेनेचे सदस्य विरोधकांपेक्षा अधिक आक्रमक होऊन भाषण करतानाचे चित्र गेल्या आठवड्यात पहायला मिळाले. त्यात सभापतींवरील अविश्वास ठरावामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एकदाची राष्ट्रवादीला त्यांची ताकद कळू द्या, हा ठराव मंजूर करण्यासाठी ते कोणाची मदत घेतात हेदेखील महाराष्ट्राला समजू द्या, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. थोडक्यात काय; सत्ता गेली तरी याची एकमेकांविषयीची सूडभावना संपलेली नाही.त्याउलट शिवसेना अधिक हुशार निघाली आहे. सत्तेत जाऊन त्यांनी सत्तेचे सगळे लाभ मिळवणे सुरू केले आहेच शिवाय या सत्तेचा उपयोग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कसा करून घेता येईल यावर त्यांचा सगळा भर आहे. त्यांचे मंत्री सत्तेत राहून जाहीरपणे सरकारच्या विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. मेट्रो तीनचा प्रकल्प बुडवून टाकण्याची भाषा बोलली जाते आहे. ज्या शिवसेनेची सत्ता पालिकेत आहे तिथल्याच अधिकाऱ्यांनी तयार केलेला डीपी प्लॅन चुलीत टाकण्याचा सल्ला शिवसेना नेते उद्धव ठाकरे देतात तेव्हा ही दुटप्पी भूमिका उघड करण्याची तयारीदेखील काँग्रेसने केलेली नाही.मुंबईत अतिक्रमण होऊ नयेत म्हणून वॉर्ड आॅफिसरना जबाबदार धरले पाहिजे असा कायदा आला. मात्र आजवर एकाही अधिकाऱ्याला शिक्षा झाली नाही. आता तर आयुक्त सीताराम कुंटे यांनी आरे कॉलनीची अवस्था दुसऱ्या धारावीसारखी होईल असे म्हणणे म्हणजे स्वत:ची जबाबदारी झटकण्यासारखे आहे. राजा लढाईला गेला आणि विजय मिळणे शक्य नाही म्हणू लागला तर सैन्य सैरभैर होते असे हे चित्र. अतिक्रमणं होऊ नयेत म्हणून ज्यांना नेमले त्यांनी त्यांचे काम नीट केले नसेल तर तुम्ही त्यांना कोणती शिक्षा केली असा सवाल आयुक्तांसमोर उभा राहील. ज्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. तेच जर अतिक्रमणं वाढतील असे म्हणत असतील तर लोकांनी न्याय मिळेल या आशेने पहायचे तरी कोणाकडे?आयुक्तांना ही भाषा शोभत नाही आणि ते तसे का बोलले असेही त्यांना कोणी विचारतही नाही. हे चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही हे खरे !