शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी ऊर्जानिर्मितीचा विचार हिताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:17 IST

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत.

-शिरीष मेढीकच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या दरवाढीने महागाईत आणखी तेल ओतले आहे. आजघडीला सर्वत्र वाढत्या इंधनाच्या किमतीवर चर्चा झडत असतानाच आता पर्यायी इंधनाचा विचार, नुसताच विचार नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.आपण ऊर्जा प्राप्त करण्यासाठी पेट्रोल, डिझेल, कोळसा व नैसर्गिक वायू वापरत असतो. या चौघांना एकत्रितपणे फोसील इंधन असे म्हणतात. जेवढे फोसील इंधन आपण वापरू तेवढ्या जास्त प्रमाणात कार्बन वायू तयार होतो. कार्बन हा वायू हरित गृह वायू आहे. हा वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडत नाही. परिणामी पृथ्वीवर जागतिक तापमानवाढ घडून येत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात बदल घडत आहेत व हे बदल जीवनास हानिकारक आहेत.तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटा यांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. पृथ्वीचा उगम ४५० कोटी वर्षांपूर्वी झाला व मानवाचा उदय केवळ दीड ते दोन लाख वर्षांपूर्वी झाला आहे. हजारो वैज्ञानिकांनी १९९१ ते २००० या दहा वर्षांत कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ॠीङ्म२स्रँी१ी इ्रङ्म२स्रँी१ी स्र१ङ्मॅ१ें या संशोधन प्रकल्पात हवामानातील बदल याबाबत काम केले. या संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी आपले निष्कर्ष ॠ’ङ्मुं’ उँंल्लॅी ंल्ल िएं१३ँ र८२३ीे : अ ढ’ंल्ली३ वल्लीि१ ढ१ी२२४१ी या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकात मांडले आहेत. ते असे मांडत आहेत की मानवाचा निसर्गामधील हस्तक्षेप १९५० पासून एवढा वाढला आहे की ज्या अवस्थेत निसर्ग याआधी लाखो वर्षे अस्तित्वात होता, तो निसर्ग आता अभूतपूर्व व वेगळ्याच व धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे.२०१५ च्या पॅरिस वसुंधरा परिषदेत नासाचे माजी डायरेक्टर जेम्स हॅनसेन व अन्य हवामान वैज्ञानिक सांगत होते की, विकसित व अविकसित देशांनी अनुक्रमे १० व ५ टक्के कपात दरवर्षी करावी. पण या व आधीच्या वसुंधरा परिषदांनी (१९९२ ची रियो परिषद व २००२ ची जोहान्सबर्ग परिषद) असा निर्णय घेतला नाही. म्हणूनच जेम्स हॅनसेन यांनी या परिषदेचे वर्णन ॅ१ीं३ी२३ ा१ं४ िंँ्रल्ल२३ ँ४ेंल्ल्र३८ असे केले होते. यासंदर्भात प्रमुख बदल वातावरणातील कार्बन डायआॅक्साइडच्या प्रमाणात झाला. वैज्ञानिकांनी दोन्ही ध्रुवांवर पाच-सहा किमी खणून गेल्या चार-पाच लाख वर्षांपूर्वीच्या मिळालेल्या हवेच्या नमुन्यात असे कळले की गेल्या ७० वर्षांचा काळ सोडला तर वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड कधीही २८०-३०० पीपीएमपेक्षा जास्त नव्हता. वातावरण व समुद्राचे पाणी या दोघांत कार्बन शोषून घेतला जात असे तसेच तो कधीही १८० पीपीएमपेक्षा वातावरणात कमी नव्हता. आता वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४१० पीपीएम आहे.हवामान वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, कार्बनचे वातावरणातील प्रमाण ३५० पेक्षा जास्त असेल तर पृथ्वीवरील तापमान जीवनास हानिकारक असेल. शेतीसाठी केवळ गरम हवामान असणे पुरेसे नाही, तर स्थिर व अंदाज करणे शक्य असणाºया हवामानाची आवश्यकता असते. पण हवामानात तीव्र वेगाने बदल घडून येत आहेत. वाळवंट असणाºया राजस्थानात गेली दोन वर्षे अनेक ठिकाणी अति पाऊस पडून पूर आले. मार्चमध्ये युरोपातील अनेक देशांत व अमेरिका, कॅनडा या देशांत मोठी हिमवादळे आली. जगभर वादळांची तीव्रता व वारंवारता वाढत चालली आहे.(हवामान विषयाचे अभ्यासक)