शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

हातावर तुरी!

By admin | Updated: February 13, 2017 23:33 IST

सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या शेतमालांच्या यादीमध्ये कापूस, सोयाबीन, ऊस, धान, कांदे, टोमॅटो, तूर आणि हरभरा यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या शेतमालांच्या यादीमध्ये कापूस, सोयाबीन, ऊस, धान, कांदे, टोमॅटो, तूर आणि हरभरा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वर्षभरापूर्वी तूर डाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. एवढी की अनेकांच्या जेवणातून ‘वरण’ हा प्रकारच गायब झाला होता. परिणामी, सरकारने तूर डाळीचे ‘रेशनिंग’ करण्याचा निर्णय घेतला, तर राजकीय पक्षांनी स्वस्त तूर डाळ विक्रीची केंद्रे उघडून मतांची दुकानदारी थाटली. तूर डाळीचे गगनाला भिडलेले भाव बघून, शेतकऱ्यांनी पुढील वर्षीही भाव चढाच राहील असे गृहीत धरले आणि तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविले. सुदैवाने पाऊसही चांगला झाला आणि तुरीचे उत्पादनही एकरी तीन ते चार क्विंटल झाले; मात्र दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या हातावर पुन्हा एकदा तुरीच पडल्या आहेत. गतवर्षी तुरीचे दर ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. उपलब्ध आकडेवारीच्या विश्लेषणावरून, यावर्षी तुरीला ५,८०० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र तुरीला यावर्षी प्रतिक्विंटल केवळ ४,६२५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला असून, ४२५ रुपये बोनस दिला जाणार आहे. शेतकऱ्यासाठी तोच एक मोठा धक्का होता आणि आता तर हमीदरापेक्षाही कमी दराने तूर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांची बाजारात होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने ‘नाफेड’मार्फत खरेदी सुरू केली खरी; परंतु ‘नाफेड’ची केंद्रे जिल्हाभरात एक किंवा दोनच आहेत आणि त्यातही तूर खरेदी करताना प्रतवारीचे निकष लावले जात आहेत. ‘एफएक्यू’ प्रतीच्या तुरीलाच ‘नाफेड’ हमीदर देणार आहे. शेतकऱ्याला प्रतवारीमध्ये सरसकट हा दर मिळत नाही. परिणामी, ‘नाफेड’च्या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरीकडे निश्चलनीकरणामुळे तूर विक्रीची रोकड थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ज्या बँकेमध्ये ही रक्कम जमा होते, ती बँक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वळती करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे ‘हातावर तुरी देणे’ या वाक्प्रचाराचा शेतकऱ्याला नव्याने अर्थ उमगला आहे. तुरीचे उत्पादन वाढविणे हे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. महापालिका क्षेत्रांचे जाऊ द्या; परंतु प्रामुख्याने शेतकरी मतदार असलेल्या जिल्हा परिषदा निवडणुकांच्या प्रचारातही तुरीच्या भावाचा मुद्दा कुठेच दिसत नाही.